AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Babri Verdict | 28 वर्षांच्या बाबरी खटला निकालानंतर निवृत्त, न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार यादव यांची कारकीर्द

बाबरी विद्ध्वंस प्रकरणाचा (Babri Demolition Case) निकाल देणारे सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे (CBI Special Court) न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार यादव (Surendra Kumar Yadav) आज निवृत्त होत आहेत.

Babri Verdict | 28 वर्षांच्या बाबरी खटला निकालानंतर निवृत्त, न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार यादव यांची कारकीर्द
| Updated on: Sep 30, 2020 | 1:20 PM
Share

लखनौ : बाबरी विद्ध्वंस प्रकरणाचा (Babri Demolition Case) निकाल देणारे सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे (CBI Special Court) न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार यादव (Surendra Kumar Yadav) आज निवृत्त होत आहेत. त्यांनी आपली निवृत्तीच्या आधी या ऐतिहासिक प्रकरणावर निकाल सुनावला (CBI special court judge Surendra Kumar Yadav retired after Babri verdict). या प्रकरणी न्यायमूर्ती एस. के. यादव यांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.

सुरेंद्र कुमार यादव मागील वर्षी 30 सप्टेंबरलाच निवृत्त होणार होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने 19 जुलै रोजी त्यांच्या कार्यकाळात वाढ केली. त्यानुसार बाबरी मशीद विद्ध्वंस प्रकरणाचा निकाल सुनावणीपर्यंत हा कार्यकाळ वाढवण्यात आला. उत्तर प्रदेश सरकारने देखील अधिसुचना काढत न्यायमूर्ती यादव यांचा कार्यकाळ वाढवला होता.

न्यायमूर्ती एस. के. यादव मुळचे जौनपूरचे रहिवासी

सुरेंद्र कुमार यादव पूर्व उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव रामकृष्ण यादव आहे. सुरेंद्र कुमार यादव 31 वर्षांचे असतानाच राज्य न्याय सेवेत निवडले गेले. त्यांनी सर्वात प्रथम फैजाबादमध्ये अॅडिशनल मुंसिफ पदावर कामाला सुरुवात केली. त्यांचा हा प्रवास पुढे गाजीपूर, हरदोई, सुल्तानपूर, इटावा, गोरखपूरमार्गे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ जिल्ह्याच्या न्यायमूर्तींपर्यंत पोहचला.

न्यायमूर्ती यादव यांच्याकडून सुरक्षेची मागणी

दरम्यान, या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, न्यायमूर्ती यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत सुरक्षा व्यवस्थेची मागणी केली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला यादव यांच्या सुरक्षेच्या मागणीकडे लक्ष देण्यास सांगत याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. तसेच दोन आठवड्यांमध्ये सरकारला यावर उत्तर देण्याचे निर्देश दिले होते.

संबंधित बातम्या :

Babri Case | बाबरी विद्ध्वंस पूर्वनियोजित नव्हे, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, अडवाणींसह सर्व आरोपी दोषमुक्त

Babri Masjid Demolition : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी 28 वर्षात नेमकं काय घडलं?

Saamana Editorial : “बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा अभिमान”, सामनातून बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा

संबंधित व्हिडीओ :

CBI special court judge Surendra Kumar Yadav retired after Babri verdict

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.