छत्तीसगडमध्ये चकमक, 15 नक्षलवादी ठार, 5 जवान शहीद, 21 गायब

| Updated on: Apr 04, 2021 | 10:32 AM

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये काल सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. (Chhattisgarh Maoist attack: 5 jawans killed, several injured; 15 missing)

छत्तीसगडमध्ये चकमक, 15 नक्षलवादी ठार, 5 जवान शहीद, 21 गायब
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

बिजापूर: छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये काल सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. या चकमकीत 15 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. तर 5 जवान शहीद झाले आहेत. तर, 21 जण गायब झाले आहेत. (Chhattisgarh Maoist attack: 5 jawans killed, several injured; 15 missing)

काल शनिवारी सुरक्षा दल आणि पोलिसांची बिजापूरच्या तररेम जंगलात चकमक उडाली होती. यावेळी 21 जवान गायब झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी आज सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं. या चकमकीत 24 जवान जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील सात जवानांना उपचारासाठी रायपूरला नेण्यात आले आहे. तर कोबरा कमांडोच्या एका जवानाचा मृतदेह आज सकाळी आढळून आला आहे. याबाबतचं वृत्त आजतकने दिलं आहे.

सर्च ऑपरेशन अजूनही सुरू

या चकमकीत पाच जवान शहीद झाल्याचं शनिवारी सांगण्यात आलं होतं. त्यात डीआरजीचे तीन आणि सीआरपीएफच्या दोन जवानांचा समावेश होता. तसेच या चकमकीत 9 नक्षलवादी मारले गेल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, या चकमकीत 12 ते 15 नक्षलवादी मारल्या गेल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच यावेळी 20 नक्षलवादी जखमी झाले आहेत. एक महिला नक्षलवादीही ठार झाली असून नक्षलवाद्यांच्या विरोधात अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे.

आयईडी प्लांट करण्याचा प्लान

आजतकच्या वृत्तानुसार, बिजापूर, सुकमा आणि कांकेर येथे नक्षलवाद्यांकडून सातत्याने कँप लावले जात होते. या कँपमध्ये सुमारे 200 ते 300 नक्षलवादी सहभागी होत होते. तर सुरक्षा दलाच्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांचे डिव्हिजनल कमांडर छत्तीसगडच्या बिजापूर कँम्पमध्ये राहत होते. बिजापूरमध्ये आयईडी प्लांट करण्याची नक्षलवाद्यांची योजना होती, अशी माहितीही समोर येत आहे.

मोदींचं ट्विट

या घटनेनंतर डीजी सीआरपीएफ कुलदीप सिंग हे छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. घटनेची माहिती घेण्यासाठी ते छत्तीसगडला जाणार आहेत. गृहमंत्रालयाने डीजींना घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या घटनेत पाच जवान शहीद झाल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. छत्तीसगडमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. शहीद जवानांना देश कधीच विसरणार नाही, असं मोदींनी म्हटलं आहे.

तातडीची बैठक

या घटनेनंतर डीजीपी डीएम अवस्थी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलावली होती. या बैठकीत घटनेचा आढावा घेऊन पुढील रणनीती ठरवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Chhattisgarh Maoist attack: 5 jawans killed, several injured; 15 missing)

 

संबंधित बातमी:

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 15 जवान बेपत्ता

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 5 जवान शहीद

खाणी आणि खनिजांवरील नवा कायदा संसदेत मंजूर, काय आहेत मोठे बदल?

(Chhattisgarh Maoist attack: 5 jawans killed, several injured; 15 missing)