AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CWC Meeting : ‘देशाला मिळालेलं स्वातंत्र्य जनतेला सोबत घेऊन वाचवू’, काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपली, कोणत्या मुद्द्यांवर खल?

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपली आहे. सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीत पाच राज्यातील पराभवावर चिंतन करण्यात आलं. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या बैठकीला राहुल गांधी, प्रियंका गांधी, पी. चिदंबरम, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे सर्व महत्वाचे नेते उपस्थित होते.

CWC Meeting : 'देशाला मिळालेलं स्वातंत्र्य जनतेला सोबत घेऊन वाचवू', काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपली, कोणत्या मुद्द्यांवर खल?
काँग्रेस कार्यकारिणी बैठकImage Credit source: ANI
| Updated on: Mar 13, 2022 | 7:21 PM
Share

नवी दिल्ली :पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) झालेल्या दारूण पराभवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित काँग्रेस कार्यकारिणीची बैठक (Congress Working Committee) संपली आहे. सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीत पाच राज्यातील पराभवावर चिंतन करण्यात आलं. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या बैठकीला राहुल गांधी, प्रियंका गांधी, पी. चिदंबरम, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे सर्व महत्वाचे नेते उपस्थित होते. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये काँग्रेसला आलेलं अपयश आणि पंजाबमधील गमवावी लागलेली सत्ता, या पार्श्वभूमीवर या बैठकीत मोठा खल झाला. तसंच ‘देशाच्या जनतेसोबत मिळून जे स्वातंत्र्य मिळवलं होतं, ते स्वातंत्र्य जनतेसोबत मिळूनच वाचवू’, असाही एक मुद्दा या बैठकीत उपस्थित झाला.

नवी दिल्लीमध्ये पार पडलेल्या काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत सोनिया गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे तीन मोठे नेते बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत. तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटोनी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांचा मुलगा अनिल के. अँटोनी यांनी ट्विटरद्वारे तशी माहिती दिलीय.

काँग्रेस हाच सर्वात विश्वासार्ह विरोधी पक्ष – शशि थरुर

आज देशात काँग्रेस हाच सर्वात विश्वासार्ह विरोधी पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये नवसंजिवनी निर्माण करणं गरजेचं असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशि थरुर रविवारी म्हणाले. याबाबत थरुर यांनी एक ट्वीट करत आकड्यांचं गणितही समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. थरुर यांनी केलेल्या ट्वीटनुसार देशभरात काँग्रेसचे 753 आमदार आहेत. तर भाजपचे आमदार काँग्रेसपेक्षा दुप्पट असून त्यांची संख्या 1 हजार 443 इतकी आहे. त्या पाठोपात तिसऱ्या क्रमांकावर तृणमूल काँग्रेस आणि चौथ्या क्रमांकावर आम आदमी पक्ष आहे. 

इतर बातम्या :

‘मोदींचा मुकाबला राहुलच करु शकतात!’ अशोक गेहलोत म्हणतात, ‘राहुल यांनी काँग्रेस अध्यक्ष व्हावं’

‘फडणवीसांच्या ऐकण्यात आणि पाहण्यात काहीतरी दोष’, संजय राऊतांचा पलटवार; खोटं न बोलण्याचाही सल्ला!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.