AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थाली बजाव महागाई भगाओ, Congress कडून महागाई मुक्त भारत अभियान जाहीर

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या नेतृत्त्वात झालेल्या बैठकीत काँग्रेसनं महागाई मुक्त भारत अभियान (Mehngai Mukt Bharat Abhiyan ) जाहीर केलं आहे. काँग्रेसकडून 31 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.

थाली बजाव महागाई भगाओ, Congress कडून महागाई मुक्त भारत अभियान जाहीर
काँग्रेसचं महागाई विरोधात आंदोलन Image Credit source: Twitter : Youth Congress
| Edited By: | Updated on: Mar 26, 2022 | 3:54 PM
Share

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकांपूर्वी स्थगित करण्यात आलेली पेट्रोल आणि डिझेलची (Petrol Diesel) दरवाढ आता पुन्हा सुरु झालीय. पेट्रोल आणि डिझेलसह गॅसच्या (LPG Gas) किमती देखील वाढल्या आहेत. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसनं (Congress) महागाई विरोधात आंदोलन सुरु करण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या नेतृत्त्वात झालेल्या बैठकीत काँग्रेसनं महागाई मुक्त भारत अभियान (Mehngai Mukt Bharat Abhiyan ) जाहीर केलं आहे. काँग्रेसकडून 31 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसनं थाली बजाव महगाई भगावचा नारा दिला आहे.

काँग्रेसचं महागाई मुक्त भारत अभियान

नवी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेसच्या मुख्य कार्यालयातील बैठकीनंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 31 मार्चला काँग्रेसकडून महागाई विरोधात देशभरात आंदोलन करण्यात येईल. महागाईच्या विरोधात काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये काँग्रेसकडून थाली बजावं मंहगाई भगाव चा नारा देण्यात आला आहे.

जिल्हास्तरावर होणार आंदोलन

काँग्रेसकडून महागाई विरोधातील आंदोलन देशभर करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हास्तरावर देखील आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2 ते 4एप्रिल जिल्हास्तरावर आंदोलन होणार आहे. काँग्रेसकडून महागाई मुक्त भारत अभियान सुरु करण्यात येणार आहे. हे अभियान 31 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान सुरु राहिल

राज्यांच्या राजधानीत आंदोलन

महागाई मुक्त भारत अभियान काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलं आहे. या आंदोलानाची सुरुवात 31 मार्चला होणार आहे. तर, समारोप 7 एप्रिलला होणार आहे. काँग्रेसकडून देशातील राज्यांच्या राजधानीच्या शहरांमध्ये 7 एप्रिलला आंदोलन करण्यात येणार आहे. प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आजच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात येणार आहे.

इतर बातम्या:

Supreme Court : दिव्यांगांसाठी खुशखबर, दिव्यांगही IPSसाठी अर्ज करू शकतात, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Russia Ukraine War: पुतीन यांच्याशी चर्चा केल्यानंतर रशियाच्या संरक्षण मंत्र्याला आला हृदयविकाराचा झटका, नेमकं काय झालं?

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.