AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीमध्ये 21 वर्षे झालं की दारु पिता येणार, नियम बदलण्याचं कारण काय?, केजरीवालांना सल्ला कोणी दिला?

दिल्लीमध्ये दारु पिण्यासाठीचे कायदेशीर वय 25 वर्षांवरुन 21 वर्ष करण्यात आल्यामुळे देशभरात दिल्ली सरकारच्या या निर्णयाची चर्चा होत आहे. (delhi government liquor drinking age)

दिल्लीमध्ये 21 वर्षे झालं की दारु पिता येणार, नियम बदलण्याचं कारण काय?, केजरीवालांना सल्ला कोणी दिला?
सांकेतिक फोटो
| Updated on: Mar 23, 2021 | 5:29 PM
Share

दिल्ली : दिल्लीमध्ये दारु पिण्यासाठीचे कायदेशीर वय 25 वर्षांवरुन 21 वर्षं करण्यात आल्यामुळे देशभरात दिल्ली सरकारच्या या निर्णयाची चर्चा होत आहे. एका समितीने केलेल्या शिफारशीनुसार दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला. हा निर्णय लागू झाल्यानंतर दिल्लीमध्ये दारू विक्रीसंदर्भातील नियम आणखी कडक होणार असल्याचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सांगितले आहे. (Delhi government made 21 year as legal age for liquor drinking what is reason behind it)

अनेक राज्यामध्ये दारू पिण्याचे वय 21 वर्षे

फक्त दिल्लीमध्येच दारु पिण्यासाठीचे कायदेशीर वय हे 21 वर्षे आहे असे नाही. तर देशातील गोवा, झारखंड, तेलंगाना आणि उत्‍तर प्रदेश या राज्यामध्येसुद्धा 21 वर्षे वय असलेल्यांना दारू पिण्यासाठी कायदेशीर मान्यता आहे. राजस्थान आणि पुदुच्चेरी येथे तर हे वय 18 वर्षे इतके आहे.

दारु पिण्यासाठी वय ठरवताना विशेष समिती

मागील काही दिवसांपासून दिल्लीमध्ये दारू पिण्यासाठीचे वय बदलले जाऊ शकते अशी चर्चा होती. मात्र, दिल्ली सरकारने हा निर्णय तडकाफडकी घेतलेला नाही. तर एका समितीने दिल्ली सरकारला दारू पिण्याचे वय 21 वरुन 18 करण्याचा सल्ला दिला होता. दिल्ली सरकारने मागील वर्षात सप्टेंबर महिन्यात दारू विक्री आणि दारुचे सेवन याविषयी सूचना देण्यासाठी ही समिती नेमली होती. एक्साईज कमिशनर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली होती. याच समितीने दिलेल्या शिफारशीवरुन दारु पिण्याचे वय 25 वरुन 21 वर्षे करण्यात आलेय.

दारू पिण्याचे वय कमी करण्यासाठी याचिका

दारू पिण्यासाठीचे वय कमी करण्याचा निर्णय हा जरी दिल्ली सरकारने घेतला असला तरी, याआधी 2018 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात यासंबंधी एक याचिका करण्यात आली होती. कुश कालरा नावाच्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली होती. कालरा यांनी या याचिकेत दिल्लीमध्ये मतदान करण्याचे वय हे 18 वर्षे आहे; मग दारू पिण्याचे वय हे 21 वर्षे का?, असा सवाल केला होता. तसेच, या याचिकेत दिल्ली एक्साईज अ‌ॅक्ट 2009 कायद्यातील कलम 23 रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली होती. कलम 23 नुसार दारू पिण्याचे वय हे 21 वर्षे होते. हेच कलम रद्द करण्याची मागणी याचिकेत केली होती. या याचिकेनंतर सरकारने न्यायालयासमोर आपली बाजू मांडली होती. यावेळी दारु पिण्याचे वय कमी केले तर त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. युवकांवर त्याचा वाईट प्रभाव पडेल, असे सरकारने सांगितले होते. मात्र, शेवटी या मागणीसंदर्भात एक समिती स्थापन करुन पुढील निर्णय घेऊ असे सांगितले सरकारने सांगितले होते.

दारुतून दिल्ली सरकारला कोटींची कमाई

मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये दारू पिणाऱ्यांचे प्रमाण बरेच आहे. सरकारने दारू पिण्याचे वय 21 वर्षे केल्यामुळे यामध्ये आणखी भर पडू शकते. सन 2019-20 मध्ये दिल्ली सरकारला दारुविक्रीमधून तब्बल 5400 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. दरम्यान, दिल्ली सरकारच्या या निर्णयामुळे सरकारच्या महसुलात आणखी भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे सरकारच्या या धोरणावर अनेकांनी टीकासुद्धा केलीआहे.

इतर बातम्या :

45 वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस, केंद्रीय कॅबिनेटची घोषणा

Video : बिहारमध्ये RJD कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज, तेजस्वी आणि तेजस्वी यादव पोलिसांच्या ताब्यात

‘फडणवीस मुंबईतून लक्ष ठेवतायत; शरद पवार, गृहमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केला तरी सत्य लपणार नाही’

(Delhi government made 21 year as legal age for liquor drinking what is reason behind it)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.