AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 वा 8 नव्हे तब्बल 14 लेन : भारताचा सर्वात रुंद एक्सप्रेस- वे, ट्रॅफीकची कटकट नाही की रेड सिग्नलची अडचण नाही

एकीकडे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघातामुळे ३२ तासांचा ट्रॅफीक जाम झाल्याने हा प्रशस्त मार्ग कुचकामी ठरल्याचे उघडकीस आले असताना देशातील १४ लेनच्या एक्सप्रेस वेची चर्चा सुरु आहे.

5 वा 8 नव्हे तब्बल 14 लेन : भारताचा सर्वात रुंद एक्सप्रेस- वे, ट्रॅफीकची कटकट नाही की रेड सिग्नलची अडचण नाही
भारताचा सर्वात रुंद एक्सप्रेस - वे
| Updated on: Feb 05, 2026 | 11:26 PM
Share

कोणत्याही देशाची प्रगती त्याच्या रस्त्यांवरुन मोजली जाते. भारतातही रस्ते महामार्गाचे जाळे वाढत आहे. आता देशाला सर्वात मोठा एक्सप्रेस-वे मिळाला आहे. या एक्सप्रेसवेला पाहून लोक परदेशातील महामार्ग विसरुन जातील इतका तो भव्य आहे. हा एक्सप्रेस-वे पाच किंवा आठ पदरीनसून चक्क १४ पदरी आहे. हा भारतातला सर्वात रुंद एक्सप्रेस -वे म्हटला जात आहे. या हायवेवर वाहनाने कोणत्याही ट्रॅफीक विना सुसाट वेगाने धावत असतात. आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास काही मिनिटांत संपतो.

आपण चर्चा करत आहोत दिल्ली -मेरठ एक्सप्रेस -वे ची. ज्याला आता भारताचा सर्वात रुंद एक्सप्रेस-वे मानला जातो.याच्या १४ लेन असल्याने हा एक्सप्रेस-वे केवळ देशातच नाही तर जगभरात चर्चेत आला आहे. दिल्लीतील सराय काले खां येथून सुरु होत हा महामार्ग मेरठ येथे जातो. हा एक्सप्रेस-वे सुमारे ९६ किमीचा आहे. याचा सर्वात रुंद भाग दिल्ली ते गाझियाबादच्या डासना पर्यंत आहे. येथे हा संपूर्ण १४ लेनमध्ये विस्तारतो. यातील सहा मार्गिका हायस्पीड एक्सप्रेस वे साठी आहेत. जेथे वाहनांचा कमाल वेग १०० ते १२० किमी प्रति तास ठेवता येतो. दोन्ही ४ – ४ लेनमध्ये स्थानिक ट्रॅफीक आणि नॅशनल महामार्ग जातो. त्यामुळे एक्सप्रेस आणि लोकल ट्रॅफीकचे आपसात अडथळ होत नाही.

तासांचा प्रवास आता मिनटांत

एके काळी दिल्ली ते मेरठ हे अंतर कापण्यासाठी तीन ते चार तास लागायचे. गाझियाबाद आणि आजूबाजूच्या भागात भयानत ट्रॅफीक जाम लागायचेय परंतू हा एक्सप्रेस -वे सुरु झाल्यानंतर प्रवास आता ४५ ते ५० मिनिटांत पूर्ण होतो. सिग्नल फ्री कॉरिडॉर असल्याने प्रवाशांना रेड सिग्नल किंवा ट्रॅफीक जामचा त्रास होत नाही.ज्यामुळे वेळ आणि इंधन दोन्हींची बचत होते.

स्मार्ट, सुरक्षित आणि पर्यावरण अनुकूल

दिल्ली-मेरठ एक्सप्रेस-वे ला भविष्यातील वाहनांची संख्या पाहून डिझाईन केले आहे. रस्त्यांच्या कडे पिलर्सवर व्हर्टिकल गार्डन तयार केल्याने हिरवाई मनाला थंडावा देते. रात्री उजेडासाठी सोलर लायटिंगची सोय केली आहे. हा देशातील पहिला एक्सप्रेस वे आहे जेथे महामार्गाच्या दोन्ही कडेला सायकल ट्रॅक आणि फुटपाथ तयार केले आहेत. या शिवाय टोल प्लाझावर ANPR तंत्रज्ञान असल्याने गाड्यांना न थांबवता कारचा टोल वसुल होतो.

मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला
वाहतूक कोंडीला नेहरूच जबाबदार म्हणू नका; अंबादास दानवेंचा खोचक टोला.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.