AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पश्चिम बंगाल सरकारने स्पष्टीकरण द्यावे, राष्ट्रपतींच्या अपमानावरून धर्मेंद्र प्रधान यांची मागणी

Dharmendra Pradhan : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. यावर आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भाष्य केले आहे.

पश्चिम बंगाल सरकारने स्पष्टीकरण द्यावे, राष्ट्रपतींच्या अपमानावरून धर्मेंद्र प्रधान यांची मागणी
dharmendra Pradhan newsImage Credit source: Google
| Updated on: Mar 07, 2026 | 10:51 PM
Share

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. सिलीगुडीतील बागडोग्रा येथील गोसाईपूर येथे आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सिलीगुडी उपविभागातील विधाननगर भागात पोहोचल्या होत्या. याठिकाणी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध नाराजी व्यक्त केली. सुरुवातीला आयोजकांनी विधाननगरमध्ये परिषद आयोजित करण्याची घोषणा केली होती, परंतु त्यानंतर चार वेळा स्थळ बदलण्यात आले. यावरून राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली होती. या संपूर्ण घटनेवर पंतप्रधान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाल्या राष्ट्रपती?

गोसाईपूर येथे पार पडलेली आंतरराष्ट्रीय संथाल परिषद याआधी विधाननगरमध्ये आयोजित करण्यात आली होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने बागडोगरा विमानतळाजवळील गोंसाईपूरमध्ये बैठक आयोजित करण्याची परवानगी दिली होती. यानंतर राष्ट्रपती विधाननगर मध्ये गेल्या होत्या. यावेळी त्यांनी म्हटले की, ‘प्रशासनाच्या मनात काय होते हे मला माहित नाही; त्यांनी मला येथे आणले नाही. मी त्यांना सांगितले की मला कोणतीही समस्या दिसत नाही. मी बंगालची मुलगी आहे, तरीही मला इथे येऊ दिले जात नाही. ममता माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहे; मला माहित नाही, कदाचित ती माझ्यावर रागावली असेल.’

धर्मेंद्र प्रधान यांनी काय म्हटले?

यावर बोलताना शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले की, ‘दार्जिलिंग दौऱ्यादरम्यान माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केलेल्या चिंता या प्रशासनाच्या संवेदनशीलतेतील आणि देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाबद्दलच्या आदरातील अत्यंत दुर्दैवी त्रुटी दर्शवतात. राष्ट्रपतींनाच व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त करावी लागते, ही बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या वर्तनावर आणि तयारीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करते.’

पश्चिम बंगाल सरकारने अशी परिस्थिती कशी निर्माण झाली याचे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. राष्ट्रपती पदाबद्दलचा अनादर किंवा निष्काळजीपणा हा देशाच्या प्रतिष्ठेलाच धक्का देणारा आहे. घटनात्मक पदांची पवित्रता राजकारणापेक्षा नेहमीच वर असली पाहिजे. आदिवासी समाजाचा सन्मान करण्यासाठी असलेल्या प्रसंगी संवेदनशीलता, आदर आणि योग्य समन्वय दिसायला हवा. माननीय राष्ट्रपतींना निराशा व्यक्त करावी लागेल अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी