AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समलिंगी विवाहावरुन सर्वोच्च न्यायालय अन् केंद्र सरकारमध्ये रंगला सामना

Same-sex marriage hearing | देशात समलिंगी व्यक्तींच्या लग्नाला कायदेशीर मान्यता द्यायची की नाही, याबाबत सर्वोच्च न्यायालयात 18 एप्रिलपासून सुनावणी सुरू झाली. सुनावणीच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकार आणि न्यायालयात वादविवाद रंगला. यावेळी न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले.

समलिंगी विवाहावरुन सर्वोच्च न्यायालय अन् केंद्र सरकारमध्ये रंगला सामना
| Updated on: Apr 18, 2023 | 5:22 PM
Share

नवी दिल्ली : समलिंगी विवाहाच्या मुद्द्यावरून मंगळवारपासून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने सुनावणी सुरु केली. या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकारमध्ये वादविवाद रंगला. मंगळवारी घटनापीठाने सुनावणी सुरू केली तेव्हा केंद्र सरकारने आक्षेप घेतला. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले की, आम्हाला याचिकांची व्याप्ती समजून घ्यायची आहे. यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, आधी याचिकाकर्त्याने केंद्राच्या प्रश्नांचे उत्तर द्यावे. त्यावेळी सरन्यायाधीश संतापले. ते म्हणाले, न्यायालयाचे कामकाज कसे चालावे, हे आम्हाला कोणी सांगू नव्हे. यासंदर्भात आम्ही निर्णय घेऊ.

काय आहे प्रकरण

भारतात समलिंगी व्यक्तींच्या लग्नाला कायदेशीर मान्यता द्यायची की नाही, याबाबत सर्वोच्च न्यायालयात18 एप्रिलपासून सुनावणी सुरू झाली. देशातील अनेक समलिंगी जोडपी आणि LGBTQ+ समुदायासाठी काम करणारे कार्यकर्ते समलिंगी विवाहांना मान्यता मिळेल अशी अपेक्षा करत आहेत, तर दुसरीकडे केंद्र सरकार आणि धार्मिक नेत्यांनी याला विरोध केला आहे. यापूर्वी भारतीय दंडविधानातील कलम 377 नुसार समलैंगिकत गुन्हा होता. पण सर्वोच्च न्यायालयानं 6 सप्टेंबर 2018 रोजी एका ऐतिहासिक निर्णयाद्वारा तो गुन्हेगारी दर्जा काढून घेतला. आता सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, एस रवींद्र भट, पीएस नरसिम्हा आणि हिमा कोहली यांचा घटनापीठ याची सुनावणी करत आहे.

आता सरकार काय म्हणते

देशात समलिंगी विवाहाला मान्यता दिली, तर विवाहासंबंधातले अनेक कायदे बदल करावे लागणार आहे. दत्तक नियम, घटस्फोट आणि वारसाहक्काविषयीचे कायद्यांमध्ये बदल करावे लागेल. दुसरीकडे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीसारखे अनेक जण म्हणतात, ‘समलैंगिक विवाह ही ‘शहरी अभिजात’ संकल्पना नाही. ती मानवी गरज आहे. गाव किंवा छोट्या शहरात कधीही न गेलेल्या सरकारी वर्गातील लोकांनी असा मसूदा तयार केला असेल. असं विवेक अग्निहोत्री ट्विट करत म्हणाले आहे.

आयोगाचे विरोधी सूर

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (NCPCR) आता समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास विरोध केला आहे. आयोगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. समलिंगी जोडपे अनेकदा मुलं दत्तक घेतात. या कृतीला आयोगाने कडाडून विरोध केला आहे. सध्याच्या सामाजिक स्थितीत आई-वडील, स्त्री-पुरुष मुलांची जडणघडण करतात. या संगोपनाच्या विचाराला समलिंगी विवाहामुळे तडा जात असल्याचे मत आयोगाने मांडले आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.