महिला कायद्याचा हत्यार म्हणून वापर करतात ?अतुल सुभाष प्रकरणानंतर पुन्हा चर्चा सुरु

बंगलुरु येथील इंजिनिअऱ अतुल सुभाष यांनी पत्नीचा छळा कंटाळून आपले जीवन संपविल्याने महिला हुंडाबळी आणि घरगुती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा हत्यार म्हणून वापर करतात असा आरोप होत आहे. महिलांना या कायद्यात जास्त संरक्षण दिले आहे. परंतू पुरुषांना या कायद्यात कोणतेही संरक्षण नसून पुरुषांची बाजू देखील ऐकून घेतली जावी असे म्हटले जात आहे...

महिला कायद्याचा हत्यार म्हणून वापर करतात ?अतुल सुभाष प्रकरणानंतर पुन्हा चर्चा सुरु
| Updated on: Jan 06, 2025 | 3:10 PM

बंगलुरु येथील इंजिनिअर अतुल सुभाष यांनी पत्नी निकीता सिंघानिया यांच्या जाचाला कंटाळून स्वत:ला संपवल्याचे प्रकरण गेल्या महिन्यात खूपच चर्चेत आले होते. या प्रकरणानंतर महिला त्यांना मिळालेल्या कायदेशीर अधिकाराचा दुरुपयोग करतात का ? यावर चर्चा सुरु झाली आहे. या प्रकरणात मागे सर्वोच्च न्यायालयाने महिलांच्या संबंधित दोन कायद्यांचा दुरुपयोग केला जात असल्याची टिप्पणी केली होती. यात आयपीसी कलम ४९८ (अ )आणि घरगुती अत्याचार विरोधी कायद्याचा उल्लेख केला होता. या दोन कायद्याच्या विरोधात जनमानस का आहे ते पाहूयात… सर्वोच्च न्यायालयाने महिलांच्या,संदर्भातील दोन कायद्यांना सर्वाधिक दुरुपयोग होणारे कायदे म्हटले होते. यात आयपीसी कलम ४९८ (अ ) आणि घरगुती अत्याचार कायद्याचा सर्वाधिक गैरवापर करणारे कायदे म्हटले होते. न्यायमूर्ती बी.आर.गवई, न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने पोटगीच्या संदर्भात सुनावणी करताना ही टिप्पणी केली होती. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा