AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिरा चाटल्यामुळे खरंच मृत्यू होतो का? काय आहे नेमकं सत्य? तुम्हालाही ऐकून बसेल धक्का

अनेक ठिकाणी आपण असं ऐकतो, की हिरा चाटल्यामुळे माणसाचा ताबडतोब मृत्यू होतो? परंतु हे खरं आहे का? खरच असं होतं का? या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

हिरा चाटल्यामुळे खरंच मृत्यू होतो का? काय आहे नेमकं सत्य? तुम्हालाही ऐकून बसेल धक्का
diamondImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 01, 2026 | 9:35 PM
Share

असं म्हटलं जातं की तुम्ही जर हिऱ्याला चाटलं तर लगेच तुमचा मृत्यू होतो. पूर्वीपासून हे सातत्यानं आपल्या मनावर बिंबवलं जात आहे, अनेकदा अशा पद्धतीचा इशारा देखील दिला जातो. मात्र खरच असं होतं का? हिऱ्याला चाटल्यामुळे खरच मृत्यू होतो का? आतापर्यंत अशा किती घटना घडल्या आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. हिऱ्याला चाटल्यामुळे मृत्यू होतो असा दावा जरी करण्यात येत असला तरी देखील जेव्हा तुम्ही या घटनेकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पहाता तेव्हा तुम्हाला कळतं की हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे, हिऱ्याला चाटल्यामुळे कधीही कोणाचा मृत्यू होत नाही. ही एक दंत कथा आहे, ज्याचं खूपच नाटकीय पद्धतीने वर्णन करण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात या मागचं नेमकं सत्य काय आहे?

वैज्ञानिक दृष्टीकोनातून सांगायचं झाल्यास हिरा हा 99.95 टक्के कार्बन पासून बनलेला असतो. कार्बन हा पृथ्वीवरील एक घटक आहे, जो विविध माध्यमांमध्ये हवा, पाणी एवढंच नाही तर मानवी शरीरामध्ये देखील आढळून येतो. तसेच हिरे हे रासायनिक स्वरुपात देखील निष्क्रिय असतात, याचाच अर्थ असा की कोणत्याही रासायनिक पदार्थांसोबत त्याची प्रक्रिया होत नाही, हे कारण आहे, ज्यामुळे तुम्ही जर हिऱ्याला स्पर्श केला किंवा त्याला जर जिभेनं चाटलं तर तुमचा मृत्यू होत नाही. हिऱ्यामधून कोणतेही विषारी पदार्थ उत्सर्जित होत नाहीत.

जगातील सर्वात कठीण पदार्थ

हिरा हा जगातील सर्वात कठीण पदार्थ आहे. मात्र तुम्ही जर हिऱ्याला चाटलं तर तुमचा मृत्यू होत नाही, मात्र तुम्ही जर हिऱ्याला गिळलं तर मात्र तुमचा मृत्यू होण्याची शक्यता असते, कारण हिऱ्याला टोक असतात, या टोकांमुळे तुमच्या पोटातील पेशींना इजा पोहचून अंतर्गत रक्तस्त्रावाचा धोका वाढतो, अशा परिस्थितीमध्ये तुमचा मृत्यू होऊ शकतो. मात्र प्राचीन काळात अनेक ठिकाणी हिरा चाटल्यामुळे मृत्यू होतो, असा उल्लेख आढळून येतो, मात्र या सर्व कथा आहेत.

Follow Us
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान.
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते.
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मालमत्तेवर पोलिसांचा छापा
भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मालमत्तेवर पोलिसांचा छापा.
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल.
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला.
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन.
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला.
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, मातोश्रीचं टेन्शन वाढताच...
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, मातोश्रीचं टेन्शन वाढताच....