AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Draupadi Murmu : द्रोपदी मुर्मूच भारताच्या नव्या राष्ट्रपती, कसा मिळवला सहज विजय?

सकाळपासून या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू होती. दोन्ही उमेदवारांचं भवितव्य मतभेटीत 18 तारखेला बंद चालू होतं. आज त्याचा निकाल लागलेला आहे.

Draupadi Murmu : द्रोपदी मुर्मूच भारताच्या नव्या राष्ट्रपती, कसा मिळवला सहज विजय?
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Jul 21, 2022 | 8:07 PM
Share

नवी दिल्ली : आदिवासी समाजाच्या महिला द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) याच भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती (15th President of India) ठरल्या आहेत. द्रोपदी मुर्मू यांनी यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांच्यावरती सहज विजय प्राप्त केला आहे. आत्ताच राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल हाती आला आहे,  सकाळपासून या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू होती. दोन्ही उमेदवारांचं भवितव्य मतभेटीत 18 तारखेला बंद चालू होतं. आज त्याचा निकाल लागलेला आहे. मुर्मू यांच्यासाठी भाजपने देशभरात जोर लावला होता. त्यासाठी त्यांनी अनेक पक्षांना मतदानासाठी आवाहन केलं होतं. विरोधी पक्षातील काही पक्षांनीही त्यांना या निवडणुकीत मतदान केलं आहे. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत मोठी मदत झाली आहे. आदिवासी महिलेला प्रथमच संधी मिळत आहे, असे सांगत शिवसेनेही या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवारालाच पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातूनही मुर्मू यांना चांगली मतं मिळाली आहे.

एएनआय वृत्तसंस्थेचं ट्विट

काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केलं

द्रौपदी मुर्मू यांना क्रॉस व्होटिंगद्वारे आतापर्यंत 104 आमदार आणि 17 खासदारांचा पाठिंबा मिळाला आहे. आतापर्यंत 16 राज्यांतील 104 आमदारांनी क्रॉस व्होटिंग करून द्रौपदी मुर्मूंना मतदान केले आहे.

एएनआय वृत्तसंस्थेचं खासदारांबाबतचं ट्विट

तिसऱ्या फेरीत पारडं फिरलं

तिसर्‍या फेरीच्या मतमोजणीत त्यांना राष्ट्रपती होण्यासाठी आवश्यक असलेली 50 टक्के मते मिळाली आहेत. तिसर्‍या फेरीतील मतमोजणीबाबत बोलायचे झाले तर त्यात एकूण 1,333 मते पडली. ज्याचे मूल्य 1,65,664 होते. त्यापैकी मुर्मू यांना 812 मते मिळाली. तर यशवंत सिन्हा यांना 521 मते मिळाली.

सिन्हा यांनीही दिल्या शुभेच्छा

यशवंत सिन्हा यांनी द्रौपदी मुर्मूंचे विजयी अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले की मी द्रौपदी मुर्मूंचे विजयासाठी अभिनंदन करतो. भारताला आशा आहे की त्या कोणत्याही भीतीशिवाय किंवा पक्षपात न करता संविधानाच्या संरक्षक म्हणून काम करतील, अशा शुभेच्छा प्रतिस्पर्धी उमेदवार यशवंत सिन्हा यांनी दिल्या आहेत. मुर्मू यांच्या रुपाने देशाला आज नव्या राष्ट्रपती मिळाल्या आहे. भारतीय संविधानात हे पद अत्यंत मानाचे पद आहे. या पदावरील व्यक्तिकडून कोणत्याही पक्षपाताशिवाय देशहिताच्या कामगिरीची अपेक्षा केली जाते.

Follow Us
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले हिंदुत्त्व...
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
Sachin Ahir | ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! सचिन अहिर यांनी ठणकावू सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
Sachin Ahir Exclusive| 6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
Nalasopara Rain Updates | मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या लोकल
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना नेमका काय इशारा?
राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया...
Sudhir Mungantiwar | राम मंदीर कथित गैरव्यवहारवर सुधीर मुनगंटीवार यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, योगी आदित्यनाथ...
56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी
Sudhir Mungantiwar | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! तब्बल एवढ्या हजार कोटींची कर्जमाफी; एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सुधीर मुनगंटीवार
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
समुद्र खवळला! तब्बल 4.33 मीटर उंच लाटा... व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून...
Kalyan News | कल्याणमध्ये पावसाचा कहर!; घरात शिरलं पाणी, गुडघाभर पाण्यातून नागरिकांची जीवघेणी कसरत
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने
यांच्या डोक्यात एकच कीडा, त्यांना... संजय शिरसाटांच्या त्या विधानाने खळबळ, नेमका रोख कोणाकडे?