इराण -अमेरिकेमध्ये मध्यस्थी तर केली, पण आता पाकिस्तानवर हातात कटोरं घेण्याची वेळ, तब्बल 200 अब्ज रुपयांचा फटका

अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाच्या 40 व्या दिवशी युद्धविराम झाला. या युद्धविरामासाठी पाकिस्तानने पुढाकार घेतला होता. मात्र आता पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या असून, तब्बल 200 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

इराण -अमेरिकेमध्ये मध्यस्थी तर केली, पण आता पाकिस्तानवर हातात कटोरं घेण्याची वेळ, तब्बल 200 अब्ज रुपयांचा फटका
Shahbaz Sharif
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 26, 2026 | 9:49 PM

अमेरिका इराण आणि इस्त्रायलमध्ये तब्बल 40 दिवस युद्ध सुरू होतं. शेवटी 40 व्या दिवशी अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला. या युद्धविरामासाठी पाकिस्तानने मध्यस्थी केली, मात्र आता हादरवणारी माहिती समोर आली आहे, अमेरिका आणि इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानला तब्बल 200 अब्ज रुपयांचं नुकसान झालं आहे. पाकिस्तामध्ये आधीच महागाईचा आगडोंब उसळला आहे. वारंवार पाकिस्तानला कर्ज घेण्याची गरज पडत आहे, अशातच आता पाकिस्तानला तब्बल 200 अब्ज रुपयांचं नुकसान झालं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये 40 दिवस युद्ध सुरू होतं. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद करण्यात आला होता. दरम्यान आता अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झालेला असताना देखील अजूनही स्ट्रेट ऑफ होर्मूज सुरू करण्यात आलेला नाहीये. याचा मोठा फटका जगातील जवळपास सर्वच देशांना बसला आहे.

जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज आहे, त्यातील तब्बल 25 टक्के तेलाची वाहतूक एकट्या स्ट्रेट ऑफ होर्मूजमधून होते. मात्र हा मार्ग सध्या बंद असल्यामुळे जगासमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. जे देश कच्चं तेल आणि एलपीजी साठी संपूर्णपणे इतर देशांवर अवलंबून आहेत, त्या देशांना याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. यामध्ये पाकिस्तानचा देखील समावेश आहे. पाकिस्तान मोठ्या प्रमाणात इतर देशांकडून कच्च्या तेलाची आयात करतो, मात्र सध्या स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद असल्यामुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान होत आहे. देशातील कच्च्या तेलाचा साठा संपला आहे. पेट्रोल -डिझेलच्या दरात प्रचंड वाढ करण्यात आली आहे.

एवढंच नाही तर पाकिस्तानमध्ये वीजेची देखील कमतरता भासत असल्याने मोठ्या प्रमाणात लोडशेडिंगची समस्या निर्माण झाली आहे, ज्याचा थेट परिणाम हा उत्पादनावर झाला आहे. सरकारने ऊर्जेची कमतरता भरून काढण्यासाठी जी पाऊले उचलली आहेत, त्यावर देखील तेथील नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. युद्ध सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत पाकिस्तानला तब्बल 200 अब्ज रुपयांचं नुकसान झालं आहे. जर परिस्थिती आणखी काही दिवस अशीच राहील तर समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

 

Follow Us