AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अध्यात्माचा अर्थ काय? सद्गुरूंनी सांगितली ही उत्तरे…

सद्गुरू यांनी सांगितले की, आदियोगी मूर्तींचे अविभाज्य घटक म्हणजे उत्साह, स्थिरता आणि नशा. सद्गुरु म्हणतात की जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी उत्साह आवश्यक असतो.

अध्यात्माचा अर्थ काय? सद्गुरूंनी सांगितली ही उत्तरे...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Feb 19, 2023 | 11:56 PM
Share

 नवी दिल्लीः आध्यात्मिक गुरू सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्याशी TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी खास संवाद साधला आहे. संभाषणादरम्यान, बरुण दास यांनी सद्गुरूंना अध्यात्माविषयी काही सवाल उपस्थित केले होते. आणि त्यांच्याकडून त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. टीव्ही9 नेटवर्कच्या ‘डायलॉग विथ बरुण दास’ या विशेष कार्यक्रमात बरुण दास यांनी सद्गुरूंना विचारले की अध्यात्म ही तार्किक आहे की सर्जनशील प्रक्रिया? ज्ञानाच्या मर्यादा काय आहेत? अध्यात्मिक प्रबोधनाच्या बळावर भारत जगामध्ये आपले नेतृत्व मिळवू शकेल का? या सर्व पैलूंवर सद्गुरु यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.

सद्गुरु जग्गी वासुदेव हे केवळ अध्यात्मिक गुरु नसून त्यांचे व्यक्तिमत्त्व जागतिक स्तरावर प्रभावशील राहिले आहे. सार्वजनिक वक्ता म्हणून ते वादग्रस्त राजकीय विषयांसह अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडत असतात. बरुण दास यांच्याशी झालेल्या संभाषणात त्यांनी अध्यात्मावर सर्वच गोष्टी अगदी उघडपणे सांगितल्या आहेत.

संवादाची सुरुवात अध्यात्माचा अर्थ या विषयावरील चर्चेने झाली. सद्गुरु म्हणतात की ही संकल्पना नाही किंवा मनात निर्माण होत नाही. जेव्हा तुम्ही तुमचे मन बाजूला ठेवता तेव्हा तुम्ही आध्यात्मिक बनता.

याबाबत सद्गुरु स्पष्ट करतात की अध्यात्मिक प्रक्रियेतील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्व ओळखणे. तुम्हाला तुमच्या अज्ञानाने ओळख निर्माण करायची आहे, ज्ञानाने नाही. कारण आपल्याला माहित असलेली प्रत्येक गोष्ट फक्त एक छोटा कण असते.

डायलॉग्ज विथ बरुण दास या नवीन एपिसोडमध्ये सद्गुरु यांनी सांगितले की, मानवासह बहुतेक वास्तव हे अभौतिक आहे आणि जर एखाद्याने त्यात प्रवेश केला तर भौतिकता आणि व्यवहाराच्या जगाचे त्यामध्ये इतके कौतुक होणार नाही. या एपिसोडमध्ये सद्गुरूंनी आदियोगी मूर्तीच्या विविध आयामांचा अर्थही स्पष्ट केला आहे.

सद्गुरू यांनी सांगितले की, आदियोगी मूर्तींचे अविभाज्य घटक म्हणजे उत्साह, स्थिरता आणि नशा. सद्गुरु म्हणतात की जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी उत्साह आवश्यक असतो,

परंतु स्थिरतेशिवाय उत्साह अस्थिरतेकडे नेतो. ते म्हणतात, की एखाद्याने नशा करणे आवश्यक आहे, परंतु अल्कोहोल किंवा ड्रग्सने नाही तर त्याशिवायची नशा महत्वाची.

सद्गुरु जग्गी वासुदेव यांचा समावेश असलेली ‘डायलॉग विथ बरुण दास’ ही वेब सिरीज सहा भागांची आहे. आतापर्यंत त्याचे चार भाग प्रसारित झाले आहेत. या मालिकेचे सर्व भाग पाहण्यासाठी News9Plus अॅप डाउनलोड करा.

भाग 1: स्पष्टतेची जटिलता भाग २: अध्यात्मिक फॅक्टरी SOP भाग 3: नशा भाग 4: आनंदाचे गणित

TV 9 Bharat Varsh चे MD आणि CEO बरुण दास यांनी योगाच्या प्रचारासाठी प्रसिद्ध असलेल्या सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्याशी डुओलोग कार्यक्रमात काय बोलले ते तुम्ही येथे पाहू शकता.

Follow Us
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य