AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Voting : बोगस मतदानाला लवकरच आळा, निवडणूक आयोगाचे महत्वपूर्ण पाऊल, या उपायामुळे मतदानात येईल अधिक पारदर्शकता

Voting : बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाचा हा फंडा रामबाण ठरणार आहे.

Voting : बोगस मतदानाला लवकरच आळा, निवडणूक आयोगाचे महत्वपूर्ण पाऊल, या उपायामुळे मतदानात येईल अधिक पारदर्शकता
जालीम उपायImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Dec 09, 2022 | 7:40 PM
Share

नवी दिल्ली : भारतात निवडणुकांचा उत्सव उत्साहाने साजरा होतो. वर्षातून कोणती ना कोणती निवडणूक होतेच. पण बोगस मतदान (Bogus Voting) ही खरी समस्या आहे. यावर भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) रामबाण उपाय शोधला आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमुळे (EVM) निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यात काही प्रमाणात यश आले आहे. पण आयोग गैरप्रकारांना 100% लगाम घालण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आयोगाने कंबर कसली आहे.

निवडणुक आयोगाने मतदार यादीतील बोगस आणि डुप्लिकेट मतदारांचा पत्ता कट करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. अनेकदा असे समोर आले आहे की, एकच व्यक्ती वेगवेगळ्या पत्त्यांवर, विविध शहरात, राज्यात एकाहून अधिक मतदार यादीत नोंदणीकृत असतो.

विविध ठिकाणी नोंदणीचा फायदा घेत हा मतदार विविध ठिकाणी मतदान करतो. त्यामुळे त्याचा सर्वत्र संचार राहतो आणि तो वेगवेगळ्या भागात मतदान करतो. त्याचा परिणाम मतदान प्रक्रियेवर होतो. निवडणूक आयोग आता या बोगस आणि डुप्लिकेट मतदारांना आळा घालणार आहे.

निवडणूक आयोगाने मतदार यादी शुद्ध करण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी आता निवडणूक ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. देशात आतापर्यंत 56 कोटींहून अधिक मतदार ओळखपत्र (Voter ID) आधार कार्डशी लिंक (Aadhaar Card Link) करण्यात आले आहे.

भारतीय निवडणूक आयोग मतदान यादीतील बोगस मतदारांना आळा घालण्यासाठी व्यापक मोहिम राबविणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यासाठी मोहिम राबविण्यात येईल. त्यामुळे एकाच मतदाराचे दोन-तीन ठिकाणी नाव असेल तर ते हुडकून बंद करण्यात येईल.

गेल्या दोन वर्षांपासून निवडणूक आयोगाकडून आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्राशी लिंक करण्याचे काम सुरु आहे. हे लिंक करण्याचे काम सध्या स्वेच्छेने करण्यात येत आहे. त्यासाठी कुठलाही दबाव नाही. अथवा हे काम अनिवार्य करण्यात आलेले नाही.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.