AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Voting : बोगस मतदानाला लवकरच आळा, निवडणूक आयोगाचे महत्वपूर्ण पाऊल, या उपायामुळे मतदानात येईल अधिक पारदर्शकता

Voting : बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाचा हा फंडा रामबाण ठरणार आहे.

Voting : बोगस मतदानाला लवकरच आळा, निवडणूक आयोगाचे महत्वपूर्ण पाऊल, या उपायामुळे मतदानात येईल अधिक पारदर्शकता
जालीम उपायImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Dec 09, 2022 | 7:40 PM
Share

नवी दिल्ली : भारतात निवडणुकांचा उत्सव उत्साहाने साजरा होतो. वर्षातून कोणती ना कोणती निवडणूक होतेच. पण बोगस मतदान (Bogus Voting) ही खरी समस्या आहे. यावर भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) रामबाण उपाय शोधला आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमुळे (EVM) निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यात काही प्रमाणात यश आले आहे. पण आयोग गैरप्रकारांना 100% लगाम घालण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आयोगाने कंबर कसली आहे.

निवडणुक आयोगाने मतदार यादीतील बोगस आणि डुप्लिकेट मतदारांचा पत्ता कट करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. अनेकदा असे समोर आले आहे की, एकच व्यक्ती वेगवेगळ्या पत्त्यांवर, विविध शहरात, राज्यात एकाहून अधिक मतदार यादीत नोंदणीकृत असतो.

विविध ठिकाणी नोंदणीचा फायदा घेत हा मतदार विविध ठिकाणी मतदान करतो. त्यामुळे त्याचा सर्वत्र संचार राहतो आणि तो वेगवेगळ्या भागात मतदान करतो. त्याचा परिणाम मतदान प्रक्रियेवर होतो. निवडणूक आयोग आता या बोगस आणि डुप्लिकेट मतदारांना आळा घालणार आहे.

निवडणूक आयोगाने मतदार यादी शुद्ध करण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी आता निवडणूक ओळखपत्र आधार कार्डशी जोडण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. देशात आतापर्यंत 56 कोटींहून अधिक मतदार ओळखपत्र (Voter ID) आधार कार्डशी लिंक (Aadhaar Card Link) करण्यात आले आहे.

भारतीय निवडणूक आयोग मतदान यादीतील बोगस मतदारांना आळा घालण्यासाठी व्यापक मोहिम राबविणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यासाठी मोहिम राबविण्यात येईल. त्यामुळे एकाच मतदाराचे दोन-तीन ठिकाणी नाव असेल तर ते हुडकून बंद करण्यात येईल.

गेल्या दोन वर्षांपासून निवडणूक आयोगाकडून आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्राशी लिंक करण्याचे काम सुरु आहे. हे लिंक करण्याचे काम सध्या स्वेच्छेने करण्यात येत आहे. त्यासाठी कुठलाही दबाव नाही. अथवा हे काम अनिवार्य करण्यात आलेले नाही.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.