AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुःख कमी होणार नाही मात्र…; पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या संजय लेलेच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया

22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यात अनेक हिंदू शहीद झाले. त्यामधील संजय लेले यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दुःख कमी होणार नाही मात्र...; पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या संजय लेलेच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
PahalgamImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 07, 2025 | 11:17 AM
Share

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. आता भारताने या दहशतवादी हल्ल्याचा चांगलाच बदला घेतला आहे. भारताने पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली आहे. भारताने बुधवारी मध्यरात्री (7 मे) पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर भारताने ही कारवाई केली आहे. त्यामुळे संपूर्ण देशात दिवाळी साजरी केली जात आहे. दरम्यान, भारतीय सैन्य दलाकडून करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर पहलगा हल्ल्यात शहीद झालेल्या संजय लेले यांच्या कुटुंबाने प्रतिक्रिया दिली आहे.

पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या संजय लेले यांचा मुलगा हर्षद लेले यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर आनंद व्यक्त केला आहे. ‘भारतीय सैन्याच्या या कारवाईमुळे खुश आहे. दुःख कमी होणार नाही. मात्र, त्यांचा काहीतरी बंदोबस्त केला याचे समाधान आहे. पाकिस्तान हे सुधारणार नाही त्यांच्यावर सातत्याने असे अटॅक व कारवाई करत राहिली पाहिजे. यावेळ दहशतवाद्यांनी पर्यटकांना टार्गेट केले होते. 98% हिंदूंना मारलं. या लोकांवर अशी कारवाई झाली पाहिजे की ते लोक राहिलेच नाही पाहिजे’ असे हर्षद म्हणाले. वाचा: भारताचा सर्वात मोठा शत्रू दहशतवादी मसूद अजहर मारला गेला का? हल्ल्यात जैशचे टॉप कमांडर ठार

वडिलांची आठवण

पुढे ते म्हणाले, मला पुलवामा हल्ल्याच्या वेळची एक गोष्ट आठवली. जेव्हा सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला होता तेव्हा बाबांनी मला मिठी मारली होती. त्यांना खूप आनंद झाला होता. या वेळी स्वतःच्या बाबतीत हे घडलं आहे. ते जिथे कुठे असतील त्यांना खूप आनंद झाला असेल.

भारताने कोठे किती हल्ले केले?

  • मुझफ्फराबादमध्ये भारताने 2 हल्ले केले
  • बहावलपूरमध्ये तिसरा हल्ला
  • कोटलीमध्ये चौथा
  • चाक अमरूमध्ये 5 वा हल्ला
  • गुलपूरमध्ये सहावा
  • भिंबरमध्ये 7 वा हल्ला
  • मुरीदके येथे 8 वा
  • सियालकोट येथे 9 वा हल्ला

Follow Us
दादरमध्ये अमराठी टॅक्सी चालकांची पोलिसांकडून तपासणी, दंडवसुलीमुळे...
दादरमध्ये अमराठी टॅक्सी चालकांची पोलिसांकडून तपासणी, दंडवसुलीमुळे चालकांमध्ये संताप
ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! कालच बैठक घेतली अन् आज ठाकरेंच्या नगरसेवका
ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! कालच बैठक घेतली अन् आज ठाकरेंच्या नगरसेवकांनी... अखेर ज्याची भीती तेच घडलं
लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मुलांना... अभिजीत दीपके यांचा संताप
Abhijeet Dipke | लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मुलांना... अभिजीत दीपके यांचा संताप, नेमकं काय घडलं?
थोड्याच वेळात शिवसेना चिन्हावर सुनावणी, इतक्यात वकील सरोदेंचं वक्तव्य
अध्यक्षांनी साक्ष, पुरावे, प्रश्नोत्तरे सगळंच... थोड्याच वेळात शिवसेना पक्ष चिन्हावर सुनावणी, इतक्यात वकील असीम सरोदेंचं विधान चर्चेत
संजय राऊतांकडे तडजोड करण्याची मागणी, नारायण राणे मानहानी प्रकरणी...
संजय राऊतांकडे तडजोड करण्याची मागणी, नारायण राणे मानहानी प्रकरणी नेमकं काय घडलं?
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या नेत्याचं मोठं विधान
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमा
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमाईंडर नोटीस, आता...
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर?
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर? आज ठाकरेंचे वकील...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर भलत्याच चर्चांना उधाण, 3 तासांच्या बैठकीत...
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं विधान
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर