Narendra Modi: प्रचारक म्हणून नरेंद्र मोदींच्या न ऐकलेल्या पाच गोष्टी

| Updated on: Sep 17, 2022 | 6:54 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काही किस्से असे आहेत जे बहुतेकांना माहिती नाही. एक साधा माणूस म्हणून त्यांच्यातल्या अनेक गोष्टींची कित्येकांना तर कल्पनासुद्धा नसेल.

Narendra Modi: प्रचारक म्हणून नरेंद्र मोदींच्या न ऐकलेल्या पाच गोष्टी
नरेंद्र मोदी
Image Credit source: Social Media
Follow us on

जर एखाद्याने तुम्हाला विचारले की, 17 व्या वर्षी तरुण लोक काय करतात? तर कदाचित तुमचे उत्तर गमतीशीर असेल, त्या उत्तराला हसण्यावर घेण्यात येईल, पण नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) बाबतीत याचे उत्तर अगदीच निराळे आहे. जिथे वयाच्या 17 व्या वर्षी, तरुणांचे खेळण्याचे दिवस असताना नरेंद्र मोदींनी काहीतरी विलक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. वयाच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर नरेंद्र मोदींनी घर सोडून साधे जीवन जगण्याचा निर्णय घेतला. देशाची आणि समाजाची बारकाईने माहिती व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. त्यात ते यशस्वीही झाले आणि सर्वसाधारण जनतेला जाणून घेतल्यानंतर आज ते पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी (untold story) जाणून घेऊया.

1 ‘कर्तव्य पथावर’ वर एकट्याने प्रवास

एखाद्या 17 वर्षांच्या मुलाने घर सोडायचा निर्णय घेतला तर त्याच्या पालकांची काय अवस्था होऊ शकते याचा सहज अंदाज लावल्या जाऊ शकतो. आई-वडील आपल्या मुलाला थांबविण्यासाठी अक्षरशः हात जोडून विनवणी करतात, मात्र नरेंद्र मोदींची तीव्र इच्छा पाहून त्यांच्या पालकांनी त्यांची इच्छा मान्य केली. नरेंद्र मोदी ज्या दिवशी बॅग घेऊन घराबाहेर पडणार होते, त्या दिवसाची तयारी सुरू झाली. नरेंद्र मोदींना सोबत नेता यावे म्हणून त्यांना आवडणारे पदार्थ बनवण्यात आले होते. कपाळावर टिळा लावून आई-वडिलांनी आपल्या मुलाला निरोप दिला होता.

2-चहाचे दुकान आणि RSS

दोन वर्ष देश भ्रमंती केल्यानंतर नरेंद्र मोदी स्वःगावी परतले, मात्र  फक्त 2 आठवड्यांसाठीच! या दौऱ्यात त्यांनी अधिकृतपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ते पूर्णवेळ संघात सामील झाले. असे म्हणतात की वयाच्या 8 व्या वर्षी त्यांच्या चहाच्या स्टॉलवर बसून त्यांना संघात सेवा करण्याची कल्पना रुजली होती. दिवसभर दुकानात काम केल्यानंतर ते संघाच्या शाखा आणि स्थानिक सभांना हजेरी लावत असत. याच काळात वकील साहेब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मणराव इनामदार यांचा नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर सर्वात जास्त प्रभाव पडला. वकिल साहेबांची आपल्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची भूमिका असल्याचे खुद्द मोदींनीही सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

3-वकील साहेबांची छाप

तेव्हा नरेंद्र मोदी आरएसएसमध्ये सामील होण्यासाठी अहमदाबादला पोहोचले तेव्हा ते 20 वर्षांचे होते. याच वयात नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला. त्यांचे समर्पण आणि संघटन कौशल्य वकिल साहेबांना म्हणजेच लक्ष्मणराव इनामदार यांना सर्वाधिक प्रभावित केले. परिणामी, 1972 मध्ये नरेंद्र मोदी आरएसएसचे प्रचारक बनले आणि त्यांनी आपला सर्व वेळ या संघटनेला देण्यास सुरुवात केली. या काळात त्यांच्या मेहनतीची प्रक्रिया सुरू झाली जी आजपर्यंत सुरू आहे. सहकारी प्रचारकांसोबत राहणे आणि अन्न, निवारा इत्यादी वाटून घेणे हा दैनंदिन जीवनाचा भाग बनला. पहाटे 5 वाजता सुरू झालेला दिनक्रम रात्री संपत असे. या कठोर परिश्रमात त्यांनी अभ्यासही सुरू ठेवला कारण त्यांच्यासाठी अभ्यास हा सर्वोपरि होता.

4- आणीबाणी आणि आंदोलक स्कूटर

नरेंद्र मोदींच्या भाषणांमध्ये आणीबाणीचा सर्वाधिक उल्लेख करण्यात आला आहे. त्यावेळी देशात सर्वाधिक उकाडा होता. लोकांमध्ये प्रचंड संताप होता आणि नरेंद्र मोदींना देशाची नाडी आधीच कळली असल्याने ते आणीबाणीच्या आंदोलनात मनापासून सहभागी झाले. आणीबाणीच्या काळात नरेंद्र मोदींनी अशा अनेक गोष्टी केल्या, ज्याचे वर्णन अनेकदा केले जाते. त्यावेळचा एक किस्सा खूप रंजक आहे. http://narendramodi.in नुसार,…मोदी एका ज्येष्ठ RSS कार्यकर्त्याला स्कूटरवरून सुरक्षित गृहात घेऊन गेले. त्याचप्रमाणे एकदा अटक करण्यात आलेल्या एका नेत्याने अटकेच्या वेळी अनेक महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवल्याचे समोर आले. ती कागदपत्रे कोणत्याही किंमतीत परत मिळवायची होती.

ही जबाबदारी नरेंद्र मोदी यांच्यावर सोपवण्यात आली होती की, त्यांनी पोलीस बंदोबस्तात बसलेल्या नेत्याकडून ते कागदपत्र पोलिसांची नजर चुकवून आणावे. नानाजी देशमुख यांना अटक झाली तेव्हा त्यांच्या सहानुभूतीदारांचे पत्ते असलेले पुस्तक त्यांच्याकडे होते. नरेंद्र मोदींनी त्या प्रत्येकाला अशा सुरक्षित स्थळी नेण्याची व्यवस्था केली की, त्यांच्यापैकी एकही जण पोलिसांच्या हाती लागला नाही.

5-सबका साथ, सबका विकास

ही कथा गुजरातमधील साधना भंडारी या कामगाराशी संबंधित आहे. गुजरातमधील एका आश्रमात एक सामाजिक कार्यक्रम सुरू होता. हा कार्यक्रम तीन दिवसांचा होता. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी गेले होते. भंडारी म्हणतात, ‘आम्ही 4-5 लोक बोलत होतो जेव्हा मोदीजींनी मला विचारले की तुमचे डोळे पिवळे का आहेत. ते म्हणाले की, तुमची तब्येत बरी नसल्याचे दिसते. साधना भंडारी म्हणाल्या, दुसऱ्या दिवशी कार्यक्रम सुरू झाल्यावर मुख्यमंत्री मोदींनी डॉक्टरांना भेटायला पाठवले.

त्यांना हिमोग्लोबिन तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भंडारी म्हणाले, पण त्यांनी एकाही डॉक्टरला बोलावले नाही. त्यानंतर भंडारी यांनी डॉक्टरांना त्यांची फी विचारली. यावर ज्योतिंद्र नावाच्या डॉक्टरने सांगितले की, मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना हिमोग्लोबिन तपासण्यासाठी पाठवले आहे. तपासात साधना भंडारी यांची हिमोग्लोबिन पातळी 6.5 ते 7 ग्रॅम/डेसीएल असल्याचे समोर आले. ही पातळी चिंताजनक होती. भंडारी यांच्या म्हणण्यानुसार, ‘मोदीजींना माझ्या तब्येतीची साहजिकच काळजी वाटत होती. दुसऱ्या दिवशी त्यांनी माझ्या घरी फोन केला आणि कुटुंबीय मला घेऊन गेले. ते म्हणाले की आधी विश्रांती घ्या, हिमोग्लोबिनची पातळी वाढवा आणि मग कामाचा विचार करा.