AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोफत रेशनबाबत सरकारचा सर्वात मोठा निर्णय, गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी इतक्या वर्षांसाठी वाढवला

मोफत धान्य योजना कोरोना संकट काळात राबवण्यात आली होती. त्या योजनेत गरीबांना रेशनवर मोफत धान्य मिळण्यास सुरुवात झाली होती. या योजनेला वेळोवेळी मुदतवाढ मिळाली आहे.

मोफत रेशनबाबत सरकारचा सर्वात मोठा निर्णय, गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी इतक्या वर्षांसाठी वाढवला
| Updated on: Nov 03, 2025 | 6:38 PM
Share

केंद्र सरकारने देशाच्या कोट्यवधी गरीब आणि कमजोर वर्गांसाठी मोठी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला (PMGKAY) पुढच्या पाच वर्षांसाठी मुदतवाढ दिलेली आहे. आता या योजनेंतर्गत 81.35 कोटी लाभार्थ्यांना डिसेंबर 2028 पर्यंत मोफत अन्न मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा उद्देश देशातील कोणताही गरीब उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली जाते.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना काय ?

ही केंद्र सरकारची सर्वात मोठी खाद्य सुरक्षा योजना आहे. ज्याची सुरुवात कोरोना साथीच्या वेळी मार्च 2020 रोजी झाली होती. याचा उद्देश्य लॉकडाऊन आणि आर्थिक संकटात गरीब आणि मजूरांना पुरेसे अन्न मिळावे यासाठी केली होती. सुरुवातीला काही महिन्यांसाठीच ही योजना राबवण्यात आली होती. नंतर याची गरज पाहून या योजनेला वेळोवेळी मुदतवाढ दिली आहे.

योजनेत काय लाभ मिळतात ?

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी केवळ मोफत अन्न नाही तर अनेक फायदेही मिळतात.

मोफत अन्न : या योजनेचा सर्वात मोठा आणि मु्ख्य लाभ आहे

प्रायोरिटी हाऊसहोल्ड (PHH) रेशन कार्ड धारकांना दर महिन्याला प्रति व्यक्ती पाच किलो धान्य ( गहू किंवा तांदुळ ) मोफत दिले जाते.

अंत्योदय अन्न योजना (AAY) अंतर्गत येणाऱ्या कुटुंबांना प्रति कुटुंबांना 35 किलो अन्न दर महिन्याला मोफत दिले जाते.

ही मोफत अन्नधान्य योजना राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम (NFSA)अंतर्गत मिळणाऱ्या सबसिडीवाल्या रेशनच्या अतिरिक्त नाही. त्याऐवजी आता NFSA अंतर्गत मिळणाऱ्या धान्यालाच पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत पुढच्या पाच वर्षांसाठी संपूर्णपणे मोफत केलेले आहे.

आर्थिक मदत आणि अन्य लाभ ( जे या साथीदरम्यान पॅकेजचा भाग होते ) : जेव्हा 2020 या योजनेला एक मोठ्या पॅकेजच्या रुपात लाँच केले गेले होते,तेव्हा यात थेट कॅश ट्रान्सफर सारखे लाभ देखील सामील केले होते.

गरीब महिलांच्या जन-धन खात्यात थेट रोख रक्कम पाठवली होती. ज्येष्ठांना, विधवांना आणि दिव्यांगाना देखील अतिरिक्त आर्थिक मदत दिली होती.शेतकऱ्यांना पीएम-किसान योजनेंतर्गत आगाऊ हप्ता देण्यात आला होता आणि आणि मनरेगा कामगारांच्या वेतनात वाढ करण्यात आली.

या योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत येणाऱ्या सर्वांना लाभ देते. यामध्ये प्रामुख्याने हे घटक समाविष्ट आहे:

1) अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्रायोरिटी हाऊस होल्डचे (PHH) रेशन कार्डधारक

2) भूमिहीन शेतमजूर, सीमांत शेतकरी, ग्रामीण कारागीर (उदा. कुंभार, विणकर, लोहार).

3) शहरात राहणारे झोपडीधारक, रोजंदारीवर कामगार (उदा. कुली, रिक्षाचालक, कचरा वेचणारे).

4 ) सर्व पात्र बीपीएल (दारिद्र्यरेषेखालील) कुटुंबे.

या योजनेचा लाभ कसा उठवायचा ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक वैध रेशन कार्ड हवे. ‘वन नेशन, वन राशन कार्ड’ योजनेंतर्गत देशातील कोणत्याही सरकारी रेशन दुकानात मोफत धान्य घेऊ शकता. यासाठी दुकानात बायोमेट्रीक ओळख पटवावी लागते. सरकारच्या निर्णयाने पुढच्या पाच वर्षांसाठी गरीबांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न मिटला आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
‘अभी भी जिंदा हूं’ सोनम वांगचूक यांचा रुग्णालयातून पहिला व्हिडीओ समोर, सरकारला काय म्हटलं?.

‘अभी भी जिंदा हूं’ सोनम वांगचूक यांचा रुग्णालयातून पहिला व्हिडीओ समोर, सरकारला काय म्हटलं?

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी