AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशमध्ये 3 बंडखोर उमेदवारांच्या हाती येऊ शकते सत्तेची चावी!

हिमाचलमध्ये तीन बंडखोर मोडू शकणार का 37 वर्षांची परंपरा?

Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशमध्ये 3 बंडखोर उमेदवारांच्या हाती येऊ शकते सत्तेची चावी!
Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशमध्ये 3 बंडखोर उमेदवारांच्या हाती येऊ शकते सत्तेची चावी!Image Credit source: Tv9
| Updated on: Dec 08, 2022 | 12:30 PM
Share

शिमला: हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज (गुरुवार) सकाळपासून मजमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीचे कल पाहता भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीचा सामना पहायला मिळाला. भाजपचे बंडखोर उमेदवार दोन जागांवर आघाडीवर आहेत. अशात जर भाजपला बहुमताच्या आकड्यापेक्षा एक किंवा दोन जागा कमी मिळत असतील तर दोन बंडखोर उमेदवारांच्या हाती सत्तेची चावी येऊ शकते.

निकालाचा कल पाहता मेंनालागढ इथून भाजपचे बंडखोर के. एल. ठाकूर आघाडीवर आहेत. तर देहरा इथून भाजपचे बंडखोर होशियार सिंह आघाडीवर आहेत. हमीरपूरमधून काँग्रेसचे बंडखोर आशिष कुमार आघाडीवर आहेत. आशिष कुमार यांना यावेळी काँग्रेसकडून तिकिट मिळालं नव्हतं. त्यामुळे नाराज होऊन त्यांनी बंडखोरी केली होती.

शिमलामध्ये भाजप नेत्यांची बैठक

यादरम्यान शिमलामध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री जयराम ठाकूर, प्रदेश प्रभारी विनोद तावडे आणि मंगल पांडेसुद्धा सहभागी आहेत. पक्ष कशाप्रकारे सरकार स्थापन करू शकेल, यावर बैठकीत चर्चा सुरू आहे. अपक्षांच्या भूमिकेवरही विचार-विनिमय केला जातोय. TV9 भारतवर्षच्या एग्झिट पोलनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये भाजपची सत्ता पुन्हा एकदा येऊ शकते. तर एबीपी-सी वोटरनुसार, भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये अटीतटीचा सामना होऊ शकतो.

सत्ताबदलाचा नियम कायम राहणार की 37 वर्षांची परंपरा मोडणार?

हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याची भाजपला अपेक्षा आहे. तर काँग्रेससाठीही या निवडणुकीतील विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसला अपयशाचा सामना करावा लागतोय. याशिवाय आम आदमी पार्टीसुद्धा हिमाचलमध्ये आपलं नशीब आजमावतंय.

जर भाजप सरकार स्थापन करण्यात यशस्वी होत असेल तर 1985 नंतर हे पहिल्यांदा असं घडणार आहे. कारण हिमाचलमध्ये 1985 नंतर कोणत्याच राजकीय पक्षाला निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळालेला नाही. दुसरीकडे काँग्रेसकडून सत्ता पुन्हा एकदा स्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

Follow Us
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....
शिवसेना- भाजपमध्ये तणाव, एकनाथ शिंदे यांची तातडीने मंत्र्यांसोबत बैठक
शिवसेना- भाजपमध्ये तणाव, एकनाथ शिंदे यांची तातडीने मंत्र्यांसोबत बैठक.
सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करा, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून आदेश
सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करा, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून आदेश.
मला अडवले, ओढत नेले... शंभुराज देसाई संतापले... विधान परिषदेत....
मला अडवले, ओढत नेले... शंभुराज देसाई संतापले... विधान परिषदेत.....
त्या सॉफ्ट टार्गेट, 9 माजी मंत्र्यांची चौकशी करा; संजय राऊत....
त्या सॉफ्ट टार्गेट, 9 माजी मंत्र्यांची चौकशी करा; संजय राऊत.....
खरातसोबत कुणाकुणाचे संबंध? संजय राऊतांनी थेट नावच घेतली
खरातसोबत कुणाकुणाचे संबंध? संजय राऊतांनी थेट नावच घेतली.
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...