AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तेथील मुस्लिमांना हिंदू नकोच’, हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांची मागणी काय?

"हिंदुंच्याच पैशावर तेथील अर्थकारण आणि स्पष्ट सांगायचं तर जिहाद पोसला जात आहे आणि वर केंद्र परत कोटींची भिख त्यांना देत आहे. यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या तरच हे गप्प राहतील" असं वक्तव्य आनंद दवे यांनी केलं.

'तेथील मुस्लिमांना हिंदू नकोच', हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांची मागणी काय?
jammu & kashmir firing on air force
Follow us
| Updated on: Jul 10, 2024 | 3:00 PM

केंद्रात नरेंद्र मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येताच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. मागच्या महिन्यात रियासी येथे यात्रेकरुंच्या बसवर हल्ला झाला होता. जम्मूमध्ये हा हल्ला झालेला. या हल्ल्यात 9 यात्रेकरुंचा मृत्यू झाला. 33 जण जखमी झाले. त्यानंतर आता दोन दिवसांपूर्वी सोमवारी कठुआ येथे दहशतवाद्यांनी घात लावून भारतीय सैन्य ताफ्यावर हल्ला केला. यात पाच जवान शहीद झाले. अन्य 5 जवान जखमी झाले. डोंगरावर असताना सैन्याच्या ट्रकवर दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला. त्यानंतर हाय टेक मशीन गनने सतत फायरिंग केली. या वाढत्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी काश्मीर वर आर्थिक बहिष्कार टाकण्याची मागणी केलीय.

‘काश्मीर सहली बंद करा, काश्मीर वर आर्थिक बहिष्कार टाका’ अशी मागणी हिंदू महासंघाने केलीय. “काश्मीरच नव्हे, तर जम्मूमध्ये सुद्धा अतिरेकी हल्ले वाढले आहेत. मागील 3 महिन्यात 20 हल्ले आणि 70 हिंदुंच्या हत्या झालेल्या आहेत. त्यात सैनिक सुद्धा ठरवून मारले जात आहेत” असं आनंद दवे यांनी म्हटलं आहे. “हे अतिरेकी हल्ले करणारे कोण आहेत? कोठे लपलेत? हे सर्व स्थानिकांना माहित असते पण तेथील स्थानिक या बाबत गप्प राहतात” असा दावा आनंद दवे यांनी केला.

‘यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या तरच हे गप्प राहतील’

“काश्मीरमधील मुस्लिमांना हिंदू नकोच आहेत. तुम्ही या, फिरा आम्हाला पैसे द्या आणि परत जा एवढ्यासाठीच त्यांना हिंदू हवे आहेत. हिंदुंच्याच पैशावर तेथील अर्थकारण आणि स्पष्ट सांगायचं तर जिहाद पोसला जात आहे आणि वर केंद्र परत कोटींची भिख त्यांना देत आहे. यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या तरच हे गप्प राहतील” हे वक्तव्य आनंद दवे यांनी केलं. “आम्ही महाराष्ट्रामधील सर्व टुरिस्ट कंपन्या, गाईड यांना आपण काश्मीर सहली रद्द कराव्यात असं पत्र पाठवत असून लोकांना सुद्धा काश्मीरला न जाण्याची विनंती करत आहोत” असं आनंद दवे यांनी म्हटलं आहे. “आपल्याच पैशाने आपल्यावरच हल्ला होण्यासाठी शस्त्रे घेतली जाणार नाही, याची काळजी आत्ता हिंदूंनींच घेणं आवश्यक आहे” असं आनंद दवे म्हणाले.

भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी
भास्कर जाधवांची ठाकरेंच्या सेनेवर नाराजी? निवृत्ती घेणार? जाहीर नाराजी.
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला
इराण-इस्त्रायल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुप्रकल्पांवर बॉम्बरनं हल्ला.
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक...
वारीवरून आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, रस्ता जाम होतोय अन् जाणीवपूर्वक....
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान
राज यांनी समजून घेतलं पाहिजे, हिंदी सक्तीवरून भाजप नेत्यानं टोचले कान.
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ
वाहत्या धबधब्या खाली सेल्फी काढायला गेला अन्.., थरारक व्हिडीओ.
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं
मातोश्री बाहेर नितेश राणेंसाठी बॅनरबाजी, राजकीय वातावरण तापलं.
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा
अमेरिकेच्या हल्लाआधीच युरेनियम सुरक्षितस्थळी ठेवलं; इराणचा दावा.
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका
मुख्यमंत्री फडणवीस यांची अबू आझमींवर सडकून टीका.
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे
राऊतांच्या 'त्या' विधानावरून भास्कर जाधवांचा घरचा आहे.
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद
मला मंत्रिपद का मिळायला नको? भास्कर जाधवांनी व्यक्त केली खदखद.