AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तेथील मुस्लिमांना हिंदू नकोच’, हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांची मागणी काय?

"हिंदुंच्याच पैशावर तेथील अर्थकारण आणि स्पष्ट सांगायचं तर जिहाद पोसला जात आहे आणि वर केंद्र परत कोटींची भिख त्यांना देत आहे. यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या तरच हे गप्प राहतील" असं वक्तव्य आनंद दवे यांनी केलं.

'तेथील मुस्लिमांना हिंदू नकोच', हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांची मागणी काय?
jammu & kashmir firing on air force
| Updated on: Jul 10, 2024 | 3:00 PM
Share

केंद्रात नरेंद्र मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येताच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. मागच्या महिन्यात रियासी येथे यात्रेकरुंच्या बसवर हल्ला झाला होता. जम्मूमध्ये हा हल्ला झालेला. या हल्ल्यात 9 यात्रेकरुंचा मृत्यू झाला. 33 जण जखमी झाले. त्यानंतर आता दोन दिवसांपूर्वी सोमवारी कठुआ येथे दहशतवाद्यांनी घात लावून भारतीय सैन्य ताफ्यावर हल्ला केला. यात पाच जवान शहीद झाले. अन्य 5 जवान जखमी झाले. डोंगरावर असताना सैन्याच्या ट्रकवर दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला. त्यानंतर हाय टेक मशीन गनने सतत फायरिंग केली. या वाढत्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी काश्मीर वर आर्थिक बहिष्कार टाकण्याची मागणी केलीय.

‘काश्मीर सहली बंद करा, काश्मीर वर आर्थिक बहिष्कार टाका’ अशी मागणी हिंदू महासंघाने केलीय. “काश्मीरच नव्हे, तर जम्मूमध्ये सुद्धा अतिरेकी हल्ले वाढले आहेत. मागील 3 महिन्यात 20 हल्ले आणि 70 हिंदुंच्या हत्या झालेल्या आहेत. त्यात सैनिक सुद्धा ठरवून मारले जात आहेत” असं आनंद दवे यांनी म्हटलं आहे. “हे अतिरेकी हल्ले करणारे कोण आहेत? कोठे लपलेत? हे सर्व स्थानिकांना माहित असते पण तेथील स्थानिक या बाबत गप्प राहतात” असा दावा आनंद दवे यांनी केला.

‘यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या तरच हे गप्प राहतील’

“काश्मीरमधील मुस्लिमांना हिंदू नकोच आहेत. तुम्ही या, फिरा आम्हाला पैसे द्या आणि परत जा एवढ्यासाठीच त्यांना हिंदू हवे आहेत. हिंदुंच्याच पैशावर तेथील अर्थकारण आणि स्पष्ट सांगायचं तर जिहाद पोसला जात आहे आणि वर केंद्र परत कोटींची भिख त्यांना देत आहे. यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या तरच हे गप्प राहतील” हे वक्तव्य आनंद दवे यांनी केलं. “आम्ही महाराष्ट्रामधील सर्व टुरिस्ट कंपन्या, गाईड यांना आपण काश्मीर सहली रद्द कराव्यात असं पत्र पाठवत असून लोकांना सुद्धा काश्मीरला न जाण्याची विनंती करत आहोत” असं आनंद दवे यांनी म्हटलं आहे. “आपल्याच पैशाने आपल्यावरच हल्ला होण्यासाठी शस्त्रे घेतली जाणार नाही, याची काळजी आत्ता हिंदूंनींच घेणं आवश्यक आहे” असं आनंद दवे म्हणाले.

Follow Us
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर...
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर....
सरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत...
सरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत....
हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल, थेट विहिरीतच..
हुंड्याच्या छळाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल, थेट विहिरीतच...
नसरापूर प्रकरणातील आरोपीसह पोलिसांची मध्यरात्री घटनास्थळाची पाहणी...
नसरापूर प्रकरणातील आरोपीसह पोलिसांची मध्यरात्री घटनास्थळाची पाहणी....
राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; लाडकी बहिण योजनेवरून वाद पेटला, 65 लाख.....
राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; लाडकी बहिण योजनेवरून वाद पेटला, 65 लाख......
9 वर्षांच्या चिमुरडीवर सख्या आजोबाचीच वाईट नजर, 50 वर्षीय नराधमाच्या..
9 वर्षांच्या चिमुरडीवर सख्या आजोबाचीच वाईट नजर, 50 वर्षीय नराधमाच्या...
सत्तांतर होताच बंगालमध्ये बुलडोझर, भाजपने तृणमूलचं कार्यालय पाडलं?
सत्तांतर होताच बंगालमध्ये बुलडोझर, भाजपने तृणमूलचं कार्यालय पाडलं?.
तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, TVK ने सर्व 108 आमदार
तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, TVK ने सर्व 108 आमदार.
पायधुनीमधील चौघांच्या मृत्यूचा ससपेन्स कायम, कलिंगड की गोल्डन अवर....
पायधुनीमधील चौघांच्या मृत्यूचा ससपेन्स कायम, कलिंगड की गोल्डन अवर.....
'TMC चा पराभव नाहीच', उद्धव ठाकरेंचा ममता बॅनर्जींना कॉल, राऊतांनी...
'TMC चा पराभव नाहीच', उद्धव ठाकरेंचा ममता बॅनर्जींना कॉल, राऊतांनी....