AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये कसा मिळतो प्रवेश, पाहा काय आहेत निकष

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अनेक मोठ्या लोकांची मुले शिकतात. अनेक खेळाडू, अभिनेते आणि उद्योगपतींची मुले या शाळेतच शिकतात. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी काय निकष आहे. या शाळेत प्रवेश कसा मिळवायचा जाणून घ्या.

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये कसा मिळतो प्रवेश, पाहा काय आहेत निकष
AMBANI SCHOOL
shailesh musale
shailesh musale | Updated on: Dec 18, 2023 | 4:21 PM
Share

मुंबई : धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अनेक सेलिब्रिटींचे मुले शिकतात. या शाळेची स्थापना रिलायन्स इंडस्ट्रीजने २००३ मध्ये केली होती. एलकेजी पासून ते बारावीपर्यंतचे शिक्षण या शाळेत घेता येते. अनेक क्रिकेटपटू आणि उद्योगपती यांची मुले धीरूभाई अबानी शाळेत शिकतात. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलचा जगातील टॉप 20 आणि भारतातील टॉप 10 शाळांमध्ये समावेश आहे. देशभरातील मुले येथे प्रवेशासाठी अर्ज करतात. मात्र मोजक्याच मुलांना प्रवेश मिळतो.

शाळेत प्रवेशाचे निकष

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर यासाठी अनेक अटी आणि नियम आहेत. जन्मतारीख, प्रवेश मूल्यांकन, मुलाखत, मार्क आणि जागांची संख्या या आधारे या शाळेत प्रवेश दिला जातो.

एलकेजीमध्ये प्रवेश हवा असल्यास मुलगा 1 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान जन्मलेला असावा. इयत्ता 8 वी मध्ये प्रवेशासाठी त्याने सातवीत चांगले गुण संपादित केलेले असावे तर 11वीत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याने चांगल्या मार्काने 10वी उत्तीर्ण केलेली असावी.

प्रवेश प्रक्रिया कशी आहे

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. ज्यासाठी प्रवेश परीक्षा आयोजित केली जाते. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. त्यानंतर मुलांची निवड होते.

अर्ज कसा करावा?

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या अधिकृत साईटवर भेट द्यावी लागेल.

अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर एक मेल येतो. अर्ज करताना पासपोर्ट आकाराचा फोटो आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. अर्ज करण्यासाठी, 5000 रुपये निश्चित अर्ज शुल्क ऑनलाइन भरावे लागते.

शाळेत कोणत्या सुविधा उपलब्ध

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अनेक मोठ्या लोकांची मुले शिकतात. त्यामुळे येथे सुविधा ही तशाच दिल्या जातात. या शाळेच्या ग्रंथालयात सुमारे 40,000 पुस्तके आहेत. शाळेत एकूण 60 वर्गखोल्या आहेत. मुलांसाठी वेगवेगळ्या खेळांसाठी 2.3 एकरचे मैदान आहे. या शिवाय शाळेत डिजीटल सुख सुविधा आहेत.

शाळेची फी किती आहे?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एलकेजी ते सातवीपर्यंतची वार्षिक फी एक लाख सत्तर हजार रुपये आहे. म्हणजेच महिन्याला 14 हजार रुपये. इयत्ता 8 वी ते 10 वी वार्षिक फी 1,85,000 रुपये इतकी आहे. इयत्ता 8 ते 10 साठी फी 5.9 लाख रुपये इतकी आहे. इयत्ता 11 आणि 12 वी साठी वार्षिक फी 9.65 लाख रुपये इतकी आहे.

Follow Us
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात