AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेश नरमला, थेट तोंडावर पडताच बदलले सूर, अखेर भारताच्या..

भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांत तणावात आहेत. त्यातच आता बांगलादेशला भारताची मैत्री आठवली आहे. भारताबद्दलचे सूर बांगलादेशचे पुन्हा एकदा बदलल्याचे बघायला मिळतंय.

बांगलादेश नरमला, थेट तोंडावर पडताच बदलले सूर, अखेर भारताच्या..
River treaty issue
| Updated on: Aug 18, 2026 | 5:19 PM
Share

बांगलादेश सध्या इतका खतरनाक अडकला आहे की, ना तो भारतासोबत पंगे घेऊ शकतो ना भारतासोबत चांगले नाते ठेऊ शकतो. तीस्ता जल करार कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना करायचा आहे. भारताच्या हातात हा संपूर्ण करार आहे. यासोबतच आता त्यांनी दिल्लीला विनंती केली की, त्यांनी बांगलादेशाच्या हिताचा विचार करावा. बांगलादेशचे जल संसाधन मंत्री शाहिदुद्दीन चाैधरी यांनी पोर्टल टीबीएस न्यूज हॉट नेटला म्हटले की, शेजारी देश मित्र देश आहे. त्यांनी हा विचार केला पाहिजे की, जसे त्यांचे हित आहे, तसे आमचेही हित आहे. एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या हिताचा विचार केला पाहिजे. आम्हाला कधीच वाटत नाही की, त्यांचे आणि आमचे नाते खराब व्हावे. तीस्ता नदीची समस्या कोणत्याही परिस्थितीमध्ये दूर व्हावी, ही त्यांची इच्छा आहे.

जर हा करार भारताने व्यवस्थित केला नाही तर मोठे संकट बांगलादेशात येऊ शकते. यादरम्यान त्यांनी पुढे म्हटले की, उत्तर बांगलादेशच्या पाच ते सहा जिल्ह्यांना याकडून खूप जास्त अपेक्षा आहेत, हे लोक गेल्या कित्येक वर्षांपासून नदीच्या पाण्याची समस्या आणि अन्य समस्यांना सामोरे जात आहेत. जर आम्हाला यात अपयश आले तर त्या क्षेत्रातील कुटुंबियांना मोठे नुकसान सहन करावे लागेल.

त्यांच्या समस्येत मोठी वाढ होईल. आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये हा करार हवा आहे. शेख हसीना यांना भारताने आश्रय दिल्याने भारत आणि बांगलादेशचे संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात होती. मात्र, भारतासोबत जल करार करायचा असल्याने बांगलादेशाकडे काही गत्येंतर नाही. त्यामुळे पुन्हा बांगलादेशला आपली मैत्री आठवली आहे.

काही दिवसांपूर्वीच बांगलादेशाने आपल्या लष्कर अधिकाऱ्यांना सरावासाठी पाकिस्तानमध्ये पाठवले. यासोबतच काही गोष्टींमध्ये बांगलादेश भारताविरोधात भूमिका घेत आहे. आता करार कोणत्याही परिस्थितीमध्ये करावा लागणार असल्याने पुन्हा भारताबाबतची त्यांची भाषा पूर्णपणे बदलल्याचे बघायला मिळतंय. शेख हसीना पुन्हा बांगलादेशात परतणार असल्याची तूफान चर्चा ही रंगतान दिसत आहे.

Follow Us
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात