AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिसरं महायुद्ध सुरू झालं हे कसं कळणार? कोण करतं महायुद्धाची अधिकृत घोषणा?

जगभरात प्रचंड तणाव वाढला आहे, महत्त्वाचे देश युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर तिसरं महायुद्ध सुरू झालं तर ते कसं कळणार? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

तिसरं महायुद्ध सुरू झालं हे कसं कळणार? कोण करतं महायुद्धाची अधिकृत घोषणा?
| Updated on: Jun 23, 2025 | 3:00 PM
Share

सध्याच्या परिस्थितीमध्ये जगात प्रचंड तणाव वाढला आहे, एकीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे, हे युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये, तर दुसरीकडे पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष चांगलाच वाढला होता, मात्र आता युद्धविरामामुळे स्थिती नियंत्रणामध्ये आहे. त्यानंतर आता इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू झालं आहे. अमेरिकेकडून इराणवर हल्ला करण्यात आला आहे. चीन आणि तैवानमध्येमध्ये देखील संघर्ष सुरू आहे. त्यामुळे हे तिसऱ्या महायुद्धाचे संकेत आहेत का? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.

जगभरात प्रचंड तणाव वाढला आहे, महत्त्वाचे देश युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर तिसरं महायुद्ध सुरू झालं तर ते कसं कळणार? तिसरं महायुद्ध सुरू झालं आहे, अशी काही अधिकृत घोषणा होते का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे, त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

तिसरं महायुद्ध सुरू झालं हे कसं कळणार?

जेव्हा एकाचवेळी जगातील शक्तिशाली देशांमध्ये युद्ध सुरू होईल, जसं की रशिया विरोधात नाटो देश, चीन विरोधात तैवान, इरान विरोधात इस्रायल तर ते तिसऱ्या महायुद्धाचे संकेत असू शकतात. सध्या इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे, दुसरीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये देखील युद्ध सुरू आहे. मात्र या युद्धाची व्याप्ती त्या -त्या देशांपूर्तीच मर्यादीत असल्यामुळे याला महायुद्ध म्हणत नाहीत, मात्र जेव्हा जगभरातील अनेक देशांमध्ये एकाचवेळी युद्ध सुरू होईल, तेव्हा त्याला महायुद्ध असं म्हटलं जातं. महायुद्धाचे भीषण परिणाम जगाला भोगावले लागात. अन्न-धान्याची कमी, इंधनाचा तुटवडा, प्रचंड जीवितहानी, वित्तहानी, पायाभूत सुविधांनचं नुकसान असे अनेक परिणाम जगाला एकाच वेळी भोगावे लागतात.

महायुद्धाची घोषणा होते का?

कोणताही देश किंवा जागतिक संघटनेकडून महायुद्धाची घोषणा करण्यात येत नाही, किंवा कोणताही नेता यासंदर्भात घोषणा करत नाही. मात्र जेव्हा जगातील अनेक देश एकाचवेळी युद्ध सुरू करतात, अशा स्थितीमध्ये जगभरात आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा महायुद्ध सुरू असल्याचं मानलं जातं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.