AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठरलं! पाकिस्तान पाण्याच्या एक -एक थेंबासाठी तरसणार; अशी होणार ‘सिंधू’ करार स्थगितीची अंमलबजावणी, सर्वात मोठी बातमी समोर

केंद्रीय जलसंधारण मंत्री सी आर पाटील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे, या बैठकीनंतर सी आर पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

ठरलं! पाकिस्तान पाण्याच्या एक -एक थेंबासाठी तरसणार; अशी होणार 'सिंधू' करार स्थगितीची अंमलबजावणी, सर्वात मोठी बातमी समोर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 25, 2025 | 7:20 PM
Share

जम्मू- काश्मीरच्या पहलगामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, दहशतवाद्यांनी नाव विचारून गोळीबार केला, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली आहे. सिंधु नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे. सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, त्यांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच अटारी बॉडर देखील बंद करण्यात आली आहे.

दरम्यान सिंधू जल वाटप कराराला स्थगिती देण्यात आल्यानं त्याचा मोठा फटका हा पाकिस्तानला बसणार आहे. भारत सरकार सिंधू जल वाटप कराराच्या स्थगितीची अंमलबजावणी नेमकी कशी करणार यासंदर्भात आता मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय जलसंधारण मंत्री सी आर पाटील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही, सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय तीन टप्प्यात होणार आहे. जागतिक बँकेला देखील यांची संपूर्ण माहिती दिली जाणार असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

अमित शाह अ‍ॅक्शन मोडमध्ये

दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे, त्यांनी आज सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेण्याचे आदेश अमित शाह यांनी या बैठकीत मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. यादी समोर आल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढा असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. त्यांनी या सर्व पार्श्वभूमीवर बैठकींचा सपाटा लावला आहे.  दुसरीकडे उत्तर काश्मीरमध्ये रात्रीपासून राफेल विमान घिरट्या घातल आहे, राजस्थान बॉर्डरवरील बीएसएफ फैजांना देखील सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लष्कर प्रमुखांकडून नियंत्रण रेषेचा आढावा घेण्यात आला आहे, त्यामुळे काही तरी मोठं घडणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. तर दुसरीकडे मोदी सरकारच्या या निर्णयांमुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...