युद्ध झाल्यास राज्यांना रणगाडे खरेदी करायला सांगणार का? लसीवरुन केजरीवाल भडकले

जर पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला तर राज्यांनी आपआपले रणगाडे खरेदी करायचे का? असा सवाल अरविंद केजरीवालांनी केंद्र सरकारला विचारला.

युद्ध झाल्यास राज्यांना रणगाडे खरेदी करायला सांगणार का? लसीवरुन केजरीवाल भडकले
अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 5:48 PM

नवी दिल्ली : कोरोना संकटादरम्यान दिल्लीत आजपासून ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन (Drive in vaccination Delhi) अभियान सुरु झालं आहे. त्यानुसार आता दिल्लीकरांना त्यांच्या कारमध्ये बसूनच कोरोना लस दिली जाणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांच्या हस्ते ड्राईव्ह इन लसीकरण अभियानाला सुरुवात झाली. यावेळी पत्रकार परिषदेत केजरीवालांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.  जर पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला तर राज्यांनी आपआपले रणगाडे खरेदी करायचे का? असा सवाल अरविंद केजरीवालांनी केंद्र सरकारला विचारला. (In case of a war, should Delhi come up with a nuclear bomb, UP come up with a tank ?’ asks CM Arvind Kejriwal during drive-in vaccination center launched )

केजरीवालांचा केंद्रावर घणाघात

केंद्र सरकार आजही कोरोना संकटात गंभीर नसल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. तुमचे तुम्ही लसीची सोय करा असं केंद्राने राज्यांना सांगितलंय. लसींबाबत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे, मात्र अजूनही कोणत्याही राज्याला एक लसही मिळवता आली नाही. लस बनवणाऱ्या कंपन्या केंद्राकडे बोट दाखवत आहे. सर्व टेंडर फेल होत आहेत. मग अशा परिस्थितीत राज्यांनी करायचं काय? केंद्र सरकार देशासाठी लस का खरेदी करत नाही? असा सवाल केजरीवालांनी विचारला.

टीम इंडिया बनून काम करणे गरजेचं

सध्याच्या परिस्थितीत टीम इंडिया बनून काम करणे गरजेचं आहे. जर युद्धासारखी परिस्थिती असेल तर त्यावेळी तुम्ही राज्यांना तुमचं तुम्ही बघून घ्या म्हणाल का? जर पाकिस्तानने भारताविरुद्ध युद्ध छेडलं तर तुम्ही राज्यांना रणगाडे खरेदी करायला सांगणार का असा सवाल केजरीवालांनी विचारला.

ही वेळ भारताला एकत्र येऊन काम करण्याची आहे, टीम इंडिया म्हणून या संकटाला तोंड द्यायला हवं असं केजरीवाल म्हणाले. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री शिपायाप्रमाणे लढा देत आहेत, मात्र केंद्राचं काम आम्ही कसं करु, असंही केजरीवालांनी नमूद केलं.

कोरोनाविरुद्ध आपली लढाई सुरु आहे. या युद्धावेळी सर्व राज्यांनी आपआपलं बघावं असं म्हणून शकत नाही. पाकिस्तानने युद्ध केल्यास उत्तर प्रदेशने तुमचे रणगाडे खरेदी करा, दिल्लीने आपआपली हत्यारे खरेदी करा असं म्हणणार का, असा हल्लाबोल केजरीवालांनी केला.

संबंधित बातम्या  

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला 50 हजार, कर्ता माणूस गेल्यास 2500 पेन्शन, ‘या’ राज्याची मोठी घोषणा

पहिल्यांदा लसीकरण नंतर बारावीच्या परीक्षा,’या’ राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी सुनावलं

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.