AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक, डोसा खाल्ल्यामुळे दोन निरागस बहिणींचा मृत्यू का? आई-वडिलांची प्रकृती नाजूक

एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. डोसा खाल्ल्यामुळे दोन लहान मुलींचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. डोसा बनवण्यासाठी त्यांनी जवळच्या डेअरीमधून खीरु आणलं होतं.

धक्कादायक, डोसा खाल्ल्यामुळे दोन निरागस बहिणींचा मृत्यू का? आई-वडिलांची प्रकृती नाजूक
Parents
| Updated on: Apr 07, 2026 | 10:06 AM
Share

डोसा हा एक अत्यंत चविष्ट पदार्थ आहे. डोशाचे वेगवेगळे प्रकार असून लोक त्यावर ताव मारताना दिसतात. घराजवळच हॉटेल किंवा एखादी डोशाची गाडी असेल तर तुम्हाला तिथे हमखास गर्दी दिसेल. डोसा हा मूळचा दक्षिणेतला खाद्यपदार्थ पण आज सगळ्या देशात प्रसिद्ध आहे. डोसा म्हटलं की अनेकांना रहावत नाही. खाण्यासाठी लोक लगेच तुटून पडतात. पण याच डोशामुळे दोन लहान निरागस मुलींचा मृत्यू झाल्याच धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. आई-वडिलांची प्रकृती गंभीर आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथील चांदखेडा भागात ही घटना घडली. डोसा खाल्ल्यानंतर ही घटना घडल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. डोशामुळेच हे घडल्याची अधिकृत पृष्टी अजून झालेली नाही.

1 एप्रिलच्या रात्री विमल यांनी घराजवळ असलेल्या आयओसी रोडवरील एका डेअरीमधून डोसा बनवण्यासाठी खीरु विकत घेतला. कुटुंबाने त्या रात्री डोसे खाल्ले. दुसऱ्यादिवशी पुन्हा त्याच खीरुन डोसे बनवले. त्यावेळी कुटुंबातील सर्व सदस्यांना उल्ट्यांचा त्रास सुरु झाला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवावं लागलं. मृत मुलींचे आजोबा गौरीशंकर प्रजापती यांनी ही माहिती दिली. कुटुंबात विमल, त्यांची पत्नी भावना आणि दोन मुली यांनी हा डोसा खाल्लेला. उपचारादम्यान 4 एप्रिलला तीन महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. 5 एप्रिलला चार वर्षाच्या मुलीने प्राण सोडले. आई-वडिलांची प्रकृती अजूनही नाजूक आहे.

..तेव्हाच मृत्यूचं खरं कारण समजेल

अहमदाबाद नगर पालिकेच्या खाद्य विभागाने तपास सुरु केला आहे. पोलिसांच्या उपस्थितीत संबंधित डेअरीमधून खीरुचे नमुने घेऊन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. फूड अधिकारी डॉक्टर तेजस शाह यांनी ही माहिती दिली. चांदखेडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून पोस्टमार्टम केलं. पोस्टमार्टम आणि एफएसएल रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण समजेल. सध्या डोसा खाल्ल्यामुळेच हे झालं असं म्हणं घाईच ठरेल असं पोलिसांनी सांगितलं.

डेअरी मालकाने काय सांगितलं?

डेअरी मालकाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितलं की, मी 100 किलोपेक्षा जास्त खीरु विकलं. पण अन्य कुठल्याही ग्राहकाने अशी तक्रार केली नाही. मी अन्य ग्राहकांशी सुद्धा संपर्क साधला. खीरुचा वापर करुन बनवलेले खाद्य पदार्थ खाल्ल्यामुळे त्यांना कुठलाही त्रास झाला नाही.

Follow Us
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा....
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन.
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल.
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन.
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट....
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय.....
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी...
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले.....
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री...
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री....