AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi Exclusive Interview : महिला मुख्यमंत्री असतानाही महिलांचा छळ ही बंगालमधील महत्वाची समस्या : पंतप्रधान मोदी

Narendra Modi TV9 Interview : देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क TV9 ला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर जोरदार हल्ला चढवला. राज्यात महिला (मुख्यमंत्री) असूनही बंगालमधील परिस्थिती पाहून महिला निराश आहेत, पुरूषही निराश आहेत. बंगालमध्ये मोठं परिवर्तन होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

PM Modi Exclusive Interview : महिला मुख्यमंत्री असतानाही महिलांचा छळ ही बंगालमधील महत्वाची समस्या : पंतप्रधान मोदी
| Updated on: May 03, 2024 | 10:01 AM
Share

Tv9 नेटवर्क च्या 5 संपादकांना दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील कायदा-सुव्यवस्था, संदेशखली येथे महिलांचे शोषण आणि घोटळ्यांबाबत बोलत ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवलला. संदेशखली येथे महिला अत्याचाराबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, बंगालमध्ये एक महिला (मुख्यमंत्री) असतानाही महिलांवर होणारा अत्याचार ही एक मोठी समस्या आहे. एक महिला सत्तेत असतानाही तिथे उपद्रव होत असले तर जनता याचं प्रत्युत्तर नक्की देईल. पश्चिम बंगालमध्ये मोठा बदल होईल, फक्त योग्य वेळ येणं बाकी आहे, असं पंतप्रधान म्हणाले.

संदेशखली येथे महिलांवरील अत्याचाराच्या घटनेनंतर भारतीय जनता पक्षाने बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून रेखा पात्रा यांना उमेदवारी दिली आहे. रेखा पात्रा यांच्याशी स्वत: पंतप्रधान मोदींनी फोनवर संवाद साधला. याचा खुलासाही त्यांनी मुलाखतीत केला. बंगालमधील एका महिलेवर होत असलेल्या अत्याचाराला महिला शक्ती प्रत्युत्तर देईल, असे मला वाटते. राज्यात एक महिला सत्तेत असूननही महिलांचं शोषण होत आहे, बंगालमधील परिस्थिती पाहून महिला निराश आहेत, त्यांना दु:ख होत आहे. पुरुष देखील निराश आहेत. बंगालमध्ये यावेळी मोठ परिवर्तन होणार आहे., असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बंगालमध्ये होणाऱ्या घुसखोरीवरूनही पंतप्रधानांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. एकेकाळी घुसखोरांच्या विरोधात संसदेत ममता बॅनर्जी यांनी कागद उडवले होते. वादळ निर्माण केलं होतं. मात्र आज त्याच ममतादीदींसाठी घुसखोर हे सोन्याची थाळी झालेत. त्या आता त्यांच्याच संरक्षणासाठी त्या काम करत आहेत. त्यांची वेल्फेअर स्किम सब का साथ सबका विकासवाली नाही. फक्त व्होट बँक सांभाळणारी आहे. त्यांच्या लोककल्याणकारी योजनाही व्होट बँक डोळ्यासमोर ठेवून आहेत अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

महिला सशक्तीकरणाबद्दल पंतप्रधान म्हणाले

या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदी वारंवार महिला सक्षमीकरणाबद्दल बोलत होते. भारताच्या विकासात भारताची 50 टक्के लोकसंख्या सहभागी झाली तर देशाच्या विकासाचा मार्ग आणखी सुकर होईल, असे ते म्हणाले. महिलांना सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपल्या देशातील महिलांमध्ये देश बदलण्याची ताकद आहे. ते म्हणाले की, मी गुजरातचा मुख्यमंत्री असतानाही महिलांना महत्त्व दिले. अमूल असो किंवा लिज्जत पापड, हे कोणत्याही मोठ्या ब्रँडशी स्पर्धा करतात. दोन्ही संस्था महिलांकडून चालवल्या जातात. आतापर्यंत आपण समजत होतो की महिला केवळ छोटी कामे करून सक्षम होतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले . मानसिक अडथळे दूर व्हावेत असे मी म्हटले नाही. त्यामुळेच मी ड्रोन दीदी प्रकल्प स्वीकारला. खेड्यापाड्यातील लोक जेव्हा महिलांना ड्रोन चालवताना पाहतील तेव्हा त्यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, असे त्यांनी नमूद केले.

व्होटबँकेच्या राजकारणावरही साधला निशाणा

पश्चिम बंगाल पुन्हा एकदा जगाच्या दरबारात सर्वोत्तम स्थान मिळवू शकेल, पण त्यासाठी बंगालला व्होट बँकेच्या राजकारणातून बाहेर काढावे लागेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले. भारताच्या विकासात बंगाल महत्त्वाची भूमिका बजावेल. भारताला जागतिक व्यासपीठावर नेण्यात बंगालची भूमिका निर्विवाद आहे. दुर्दैवाने ही महान परंपरा आधी लाल जनतेने आणि आता टीएमसी स्तरावरील लोकांनी नष्ट केली आहे. देशाला पुढे न्यायचं असेल तर बंगालमध्ये नव्या प्रबोधनाची गरज आहे. पण ते व्होटबँकेचे राजकारण करत आहे, ही खेदाची बाब आहे. ‘भाजपला कितीही शिव्या दिल्या तरी चलनी नोटा कुठे लपवणार?’ असा सवाल त्यांनी विचारला. संपूर्ण देशभरात द्वेषाचे वातावरण आहे. मोदी सरकार पूर्ण ताकदीने भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.

Tv9 नेटवर्क च्या 5 संपादकांना दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील कायदा-सुव्यवस्था, संदेशखली येथे महिलांचे शोषण आणि घोटळ्यांबाबत बोलत ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवलला. संदेशखली येथे महिला अत्याचाराबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, बंगालमध्ये एक महिला (मुख्यमंत्री) असतानाही महिलांवर होणारा अत्याचार ही एक मोठी समस्या आहे. एक महिला सत्तेत असतानाही तिथे उपद्रव होत असले तर जनता याचं प्रत्युत्तर नक्की देईल. पश्चिम बंगालमध्ये मोठा बदल होईल, फक्त योग्य वेळ येणं बाकी आहे, असं पंतप्रधान म्हणाले.

संदेशखली येथे महिलांवरील अत्याचाराच्या घटनेनंतर भारतीय जनता पक्षाने बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून रेखा पात्रा यांना उमेदवारी दिली आहे. रेखा पात्रा यांच्याशी स्वत: पंतप्रधान मोदींनी फोनवर संवाद साधला. याचा खुलासाही त्यांनी मुलाखतीत केला. बंगालमधील एका महिलेवर होत असलेल्या अत्याचाराला महिला शक्ती प्रत्युत्तर देईल, असे मला वाटते. राज्यात एक महिला सत्तेत असूननही महिलांचं शोषण होत आहे, बंगालमधील परिस्थिती पाहून महिला निराश आहेत, त्यांना दु:ख होत आहे. पुरुष देखील निराश आहेत. बंगालमध्ये यावेळी मोठ परिवर्तन होणार आहे., असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बंगालमध्ये होणाऱ्या घुसखोरीवरूनही पंतप्रधानांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. एकेकाळी घुसखोरांच्या विरोधात संसदेत ममता बॅनर्जी यांनी कागद उडवले होते. वादळ निर्माण केलं होतं. मात्र आज त्याच ममतादीदींसाठी घुसखोर हे सोन्याची थाळी झालेत. त्या आता त्यांच्याच संरक्षणासाठी त्या काम करत आहेत. त्यांची वेल्फेअर स्किम सब का साथ सबका विकासवाली नाही. फक्त व्होट बँक सांभाळणारी आहे. त्यांच्या लोककल्याणकारी योजनाही व्होट बँक डोळ्यासमोर ठेवून आहेत अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

महिला सशक्तीकरणाबद्दल पंतप्रधान म्हणाले

या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदी वारंवाक महिला सक्षमीकरणाबद्दल बोलत होते. भारताच्या विकासात भारताची 50 टक्के लोकसंख्या सहभागी झाली तर देशाच्या विकासाचा मार्ग आणखी सुकर होईल, असे ते म्हणाले. महिलांना सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपल्या देशातील महिलांमध्ये देश बदलण्याची ताकद आहे. ते म्हणाले की, मी गुजरातचा मुख्यमंत्री असतानाही महिलांना महत्त्व दिले. अमूल असो किंवा लिज्जत पापड, हे कोणत्याही मोठ्या ब्रँडशी स्पर्धा करतात. दोन्ही संस्था महिलांकडून चालवल्या जातात. आतापर्यंत आपण समजत होतो की महिला केवळ छोटी कामे करून सक्षम होतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले . मानसिक अडथळे दूर व्हावेत असे मी म्हटले नाही. त्यामुळेच मी ड्रोन दीदी प्रकल्प स्वीकारला. खेड्यापाड्यातील लोक जेव्हा महिलांना ड्रोन चालवताना पाहतील तेव्हा त्यांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, असे त्यांनी नमूद केले.

व्होटबँकेच्या राजकारणावरही साधला निशाणा

पश्चिम बंगाल पुन्हा एकदा जगाच्या दरबारात सर्वोत्तम स्थान मिळवू शकेल, पण त्यासाठी बंगालला व्होट बँकेच्या राजकारणातून बाहेर काढावे लागेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले. भारताच्या विकासात बंगाल महत्त्वाची भूमिका बजावेल. भारताला जागतिक व्यासपीठावर नेण्यात बंगालची भूमिका निर्विवाद आहे. दुर्दैवाने ही महान परंपरा आधी लाल जनतेने आणि आता टीएमसी स्तरावरील लोकांनी नष्ट केली आहे. देशाला पुढे न्यायचं असेल तर बंगालमध्ये नव्या प्रबोधनाची गरज आहे. पण ते व्होटबँकेचे राजकारण करत आहे, ही खेदाची बाब आहे. ‘भाजपला कितीही शिव्या दिल्या तरी चलनी नोटा कुठे लपवणार?’ असा सवाल त्यांनी विचारला. संपूर्ण देशभरात द्वेषाचे वातावरण आहे. मोदी सरकार पूर्ण ताकदीने भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.

बंगालच्या गौरवाला दिला उजाळा

भारताचा विकास करायचा असेल तर देशातील काही राज्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. देशाला पुढे नेण्याची सर्वाधिक ताकद असलेल्या राज्यांपैकी बंगाल हे एक राज्य आहे. भारताच्या इतिहासावर नजर टाकल्यास बंगालने सामाजिक प्रगती केल्याचे दिसून येते, असे ते म्हणाले. भारताच्या क्रांतिकारी चळवळीत आणि स्वातंत्र्य चळवळीत बंगाल आघाडीवर होते. बंगालचं मोठं योगदान आहे. जगभरात भारताचे नाव पोहोचवण्यात बंगालचा महत्वपूर्ण वाटा आहे. यामध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्यासह स्वामी विवेकानंद, जगदीशचंद्र बोस यांची नावं घेऊ शकता. पण बंगालची ही परंपरा डाव्या विचारसरणीने संपवली आहे. देशाला पुढे जायचे असेल तर बंगालचे पुनरजागृती झाली पाहिजे असे मोदी म्हणाले.

Follow Us
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची...
ठाकरे गटाला धक्का देत शिंदेंनी सचिन अहिरांना दिली उपसभापती पदाची उमेदवारी; बिनविरोध निवड होताच केलं मोठं विधान
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा
राज ठाकरे आले... फक्त 15 मिनिटे बोलले, भाजपला दिला सणसणीत इशारा; म्हणाले, आजचं फोडाफोडीचं...
शिंदे सेनेत प्रवेश...थेट उपसभापती! अहिरांच्या नावावर शिक्कामोर्तब
Vidhanparishad | शिंदे सेनेत प्रवेश... आणि थेट उपसभापती! सचिन अहिरांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात
ठाकरे गटाला पुन्हा मोठा दणका? विश्वासू नेत्यासह... राज्यातील राजकारणात मोठी खळबळ
शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
Sachin Ahir | मी गेल्याशिवाय कळणार नाही...शिंदेंच्या सेनेत जाण्याआधीच सचिन अहिरांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदे
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील... राजकारणातील हालचाली वाढल्या
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप