AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UP Crime : 11 वर्षीपूर्वी घडलेल्या सामूहिक हत्याकांडात 16 जणांना जन्मठेप; मारेकऱ्यांनी आठ जणांचा घेतला होता जीव

11 जुलै 2011 रोजी ऊस समितीचे माजी अध्यक्ष उदयवीर सिंग, गौरववीर सिंग, समरवीर सिंग, श्यामवीर सिंग, दिव्या, प्रणव, भोला आणि कल्पना अशी एकूण आठ जणांची एकाचवेळी हत्या करण्यात आली होती.

UP Crime : 11 वर्षीपूर्वी घडलेल्या सामूहिक हत्याकांडात 16 जणांना जन्मठेप; मारेकऱ्यांनी आठ जणांचा घेतला होता जीव
यूपीत 11 वर्षीपूर्वी घडलेल्या सामूहिक हत्याकांडात 16 जणांना जन्मठेपImage Credit source: tv9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jul 05, 2022 | 2:28 AM
Share

मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात घडलेल्या सामूहिक हत्याकांड (Murder) प्रकरणात न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. 11 वर्षे घडलेल्या या प्रकरणात आठ जणांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या 16 जणांना न्यायालयाने जन्मठेपे (Life Imprisonment)ची शिक्षा सुनावली आहे. तसेच सर्व आरोपींना प्रत्येकी 60 हजार रुपयांचा दंड (Penalty)ही ठोठावण्यात आला आहे. हे प्रकरण 11 जुलै 2011 रोजी घडले होते. नगर कोतवाली परिसरातील बडकाली गावाजवळ ऊस समितीचे माजी अध्यक्ष उदयवीर सिंग यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील आठ जणांची ट्रकने धडक मारून निर्घृण हत्या करण्यात आली होती.

पूर्ववैमनस्यातून घडलेल्या हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले होते!

11 जुलै 2011 रोजी ऊस समितीचे माजी अध्यक्ष उदयवीर सिंग, गौरववीर सिंग, समरवीर सिंग, श्यामवीर सिंग, दिव्या, प्रणव, भोला आणि कल्पना अशी एकूण आठ जणांची एकाचवेळी हत्या करण्यात आली होती. पूर्ववैमनस्यातून मारेकऱ्यांनी अख्खे कुटुंब संपवले होते. या प्रकरणी पश्चिम उत्तर प्रदेशातील कुख्यात माजी ब्लॉक प्रमुख विक्की त्यागी यांची पत्नी मीनू त्यागीसह 16 जणांना न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेसह प्रत्येकी 60 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

एकूण 37 साक्षीदारांनी न्यायालयात दिली साक्ष

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश छोटेलाल यांच्या पोक्सो न्यायालय क्र. 2 मध्ये या खटल्याची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने एडीजी किरण पाल कश्यप यांनी युक्तिवाद केला, तर बचाव पक्षाच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल जिंदाल यांनी बाजू मांडली. एकूण 37 साक्षीदारांनी न्यायालयात हजेरी राहून साक्ष दिली. त्या आधारे 16 आरोपींचे दोषत्व सिद्ध झाले. या प्रकरणातील मुख्य आरोपी मीनू त्यागी ही सध्या जिल्हा कारागृहात आहे. ती न्यायालयात हजर न राहिल्याने तिला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिक्षा सुनावण्यात आली.

बदकाली रोहणा मार्गावर घडले होते हत्याकांड

2011 मध्ये झालेल्या या घटनेत मृत उदयवीर सिंहचा भाऊ ब्रजवीर सिंह याने 20 जणांची नावे सांगितली होती. हा खटला दीर्घकाळ चालू राहिला. त्यादरम्यान 16 फेब्रुवारी 2015 रोजी न्यायालयाच्या आवारातच विकी त्यागीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणातील दोन आरोपींचा मृत्यू झाला. तसेच एका आरोपीला न्यायालयाने अल्पवयीन घोषित केले होते. अखेर खटला पूर्णत्वास गेला त्यावेळी न्यायालयाने मीनू त्यागीसह ममता, अनिल, शुभम, लोकेश, प्रमोद, मनोज, मोहित, धर्मेंद्र, रवींद्र, विनोद, विदित, बबलू, बॉबी उर्फ ​​विनीत शर्मा, बॉबी उर्फ ​​विनीत त्यागी आणि हरवीर अशा 16 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या आरोपींनी बदकाली रोहणा मार्गावर गाडीखाली आठ जणांना चिरडून त्यांची हत्या केली होती. (In Uttar Pradesh 16 people were sentenced to life imprisonment in a murder case)

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?