AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UP Murder : उत्तर प्रदेशात अवघ्या 500 रुपयांसाठी केली 13 वर्षीय मुलाची हत्या; मित्राने दिली गुन्ह्याची कबुली

बांदा शहरात मूळचंद्र कुशवाह यांनी चहाचा स्टॉल लावला आहे. मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांनी मुलगा संदीप कुशवाह (13) याला 500 रुपये देऊन दुकानातील सामान आणण्यासाठी नगरला पाठवले होते, मात्र तेथून संदीप परत आला नाही. रात्री उशिरापर्यंत त्याचा कोणताही सुगावा न लागल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली.

UP Murder : उत्तर प्रदेशात अवघ्या 500 रुपयांसाठी केली 13 वर्षीय मुलाची हत्या; मित्राने दिली गुन्ह्याची कबुली
बहिणीच्या लग्नाची धामधूम, भावाचा ह्र्दयविकाराने मृत्यूImage Credit source: टीव्ही9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Apr 07, 2022 | 2:14 AM
Share

लखनौ : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात वडिलांकडून 500 रुपये घेऊन वस्तू खरेदी करण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय मुलाची हत्या (Murder) करण्यात आली. नंतर त्या मुलाचा मृतदेह शहरातच पुलाखाली पाण्यात फेकण्यात आला. केवळ 500 रुपये हिसकावून घेण्यासाठी त्याची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही तासांतच मृताच्या मित्राला अटक (Arrest) केली. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी निष्काळजीपणा दाखविल्याचा आरोप मृत संदीपच्या पालकांनी केला आहे. त्यामुळे मुलाचे बेपत्ता होणे व नंतर त्याची हत्या होणे या सर्व प्रकारावरून मातौंध पोलिसही चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत. (In Uttar Pradesh, a 13-year-old boy was killed for only 500 rupees)

सुरुवातीला पोलिसांचा तपासात सुस्त कारभार

बांदा शहरात मूळचंद्र कुशवाह यांनी चहाचा स्टॉल लावला आहे. मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांनी मुलगा संदीप कुशवाह (13) याला 500 रुपये देऊन दुकानातील सामान आणण्यासाठी नगरला पाठवले होते, मात्र तेथून संदीप परत आला नाही. रात्री उशिरापर्यंत त्याचा कोणताही सुगावा न लागल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यावर पोलिसांनी त्या माहितीच्या आधारे गांभीर्याने तपास सुरु केला नव्हता. बुधवारी सकाळी संदीपचा मृतदेह जीआयसीजवळील पुलाखाली पाण्याने साचलेल्या खड्ड्यात आढळला.

कसून चौकशीदरम्यान आरोपीकडून हत्येच्या गुन्ह्याची कबुली

घटनेची खबर मिळताच पोलीस अधीक्षक अभिनंदन यांनीही घटनास्थळी पोहोचून चौकशी केली. त्यांनी शहरातील मिठाईच्या दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची बारकाईने झडती घेतली. त्यावरून संदीपने शहरातील इचोली चौकात असलेल्या दुकानात मोमोज खाल्ल्याचे उघड झाले. त्याआधारे पोलिसांनी मोमोज दुकानदाराचीही चौकशी केली. श्वान पथकही घटनास्थळी पोहोचले. एसओजीचे पथकही तपासात व्यस्त झाले होते. याचदरम्यान काही तासांतच एसओजी आणि मातौंध पोलिसांनी मृत संदीपचा मित्र 18 वर्षीय धीरू उर्फ ​​टोटू पुत्र कामटा याला अटक केली. त्याने पोलिसांच्या कसून चौकशीनंतर हत्येचा गुन्हा मान्य केला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मी निवास मिश्रा यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.

पैशांच्या वादातून गळा आवळून खून

आरोपीने खुनाची कबुली देतानाच यामागील धक्कादायक कारणाचाही उलगडा केला. त्याने पैशाच्या वादातून गळा आवळून खून केल्याचे सांगितले. मृत संदीपच्या खिशातून काढलेले 500 रुपयेही आरोपीकडून जप्त करण्यात आले आहेत. एसओजीचे प्रभारी मयंक चंदेल यांच्या पोलिस पथकाने या गुन्ह्याची उकल केली. पोलिसांनी सहकार्य केले नाही, असा आरोप संदीपचे वडील मूलचंद्र आणि आई मिथलेश यांनी केला आहे. पोलिसांनी सहकार्य केले असते तर मुलाचे प्राण वाचले असते, असे त्यांनी म्हटले आहे. (In Uttar Pradesh, a 13-year-old boy was killed for only 500 rupees)

इतर बातम्या

NM Bike Theft : मोटार सायकल चोरी करणाऱ्या 2 आरोपींना पनवेल गुन्हे शाखेकडून अटक

Nashik Lightning : इगतपुरीत शेतकरी दाम्पत्याचा वीज कोसळून मृत्यू, चार जण गंभीर जखमी

Follow Us
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
Priyanka Gandhi | पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार! सरकारला दिलं थेट आव्हान
प्रधानांचा राजीनामा नाही पण चर्चेची तयारी? केंद्र सरकारची भूमिका काय?
Dharmendra Pradhan News |  धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत केंद्र सराकर नेमकी काय भूमिका घेणार?