UP Murder : उत्तर प्रदेशात अवघ्या 500 रुपयांसाठी केली 13 वर्षीय मुलाची हत्या; मित्राने दिली गुन्ह्याची कबुली

बांदा शहरात मूळचंद्र कुशवाह यांनी चहाचा स्टॉल लावला आहे. मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांनी मुलगा संदीप कुशवाह (13) याला 500 रुपये देऊन दुकानातील सामान आणण्यासाठी नगरला पाठवले होते, मात्र तेथून संदीप परत आला नाही. रात्री उशिरापर्यंत त्याचा कोणताही सुगावा न लागल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली.

UP Murder : उत्तर प्रदेशात अवघ्या 500 रुपयांसाठी केली 13 वर्षीय मुलाची हत्या; मित्राने दिली गुन्ह्याची कबुली
बहिणीच्या लग्नाची धामधूम, भावाचा ह्र्दयविकाराने मृत्यूImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 2:14 AM

लखनौ : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात वडिलांकडून 500 रुपये घेऊन वस्तू खरेदी करण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय मुलाची हत्या (Murder) करण्यात आली. नंतर त्या मुलाचा मृतदेह शहरातच पुलाखाली पाण्यात फेकण्यात आला. केवळ 500 रुपये हिसकावून घेण्यासाठी त्याची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही तासांतच मृताच्या मित्राला अटक (Arrest) केली. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी निष्काळजीपणा दाखविल्याचा आरोप मृत संदीपच्या पालकांनी केला आहे. त्यामुळे मुलाचे बेपत्ता होणे व नंतर त्याची हत्या होणे या सर्व प्रकारावरून मातौंध पोलिसही चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत. (In Uttar Pradesh, a 13-year-old boy was killed for only 500 rupees)

सुरुवातीला पोलिसांचा तपासात सुस्त कारभार

बांदा शहरात मूळचंद्र कुशवाह यांनी चहाचा स्टॉल लावला आहे. मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांनी मुलगा संदीप कुशवाह (13) याला 500 रुपये देऊन दुकानातील सामान आणण्यासाठी नगरला पाठवले होते, मात्र तेथून संदीप परत आला नाही. रात्री उशिरापर्यंत त्याचा कोणताही सुगावा न लागल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यावर पोलिसांनी त्या माहितीच्या आधारे गांभीर्याने तपास सुरु केला नव्हता. बुधवारी सकाळी संदीपचा मृतदेह जीआयसीजवळील पुलाखाली पाण्याने साचलेल्या खड्ड्यात आढळला.

कसून चौकशीदरम्यान आरोपीकडून हत्येच्या गुन्ह्याची कबुली

घटनेची खबर मिळताच पोलीस अधीक्षक अभिनंदन यांनीही घटनास्थळी पोहोचून चौकशी केली. त्यांनी शहरातील मिठाईच्या दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची बारकाईने झडती घेतली. त्यावरून संदीपने शहरातील इचोली चौकात असलेल्या दुकानात मोमोज खाल्ल्याचे उघड झाले. त्याआधारे पोलिसांनी मोमोज दुकानदाराचीही चौकशी केली. श्वान पथकही घटनास्थळी पोहोचले. एसओजीचे पथकही तपासात व्यस्त झाले होते. याचदरम्यान काही तासांतच एसओजी आणि मातौंध पोलिसांनी मृत संदीपचा मित्र 18 वर्षीय धीरू उर्फ ​​टोटू पुत्र कामटा याला अटक केली. त्याने पोलिसांच्या कसून चौकशीनंतर हत्येचा गुन्हा मान्य केला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मी निवास मिश्रा यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.

पैशांच्या वादातून गळा आवळून खून

आरोपीने खुनाची कबुली देतानाच यामागील धक्कादायक कारणाचाही उलगडा केला. त्याने पैशाच्या वादातून गळा आवळून खून केल्याचे सांगितले. मृत संदीपच्या खिशातून काढलेले 500 रुपयेही आरोपीकडून जप्त करण्यात आले आहेत. एसओजीचे प्रभारी मयंक चंदेल यांच्या पोलिस पथकाने या गुन्ह्याची उकल केली. पोलिसांनी सहकार्य केले नाही, असा आरोप संदीपचे वडील मूलचंद्र आणि आई मिथलेश यांनी केला आहे. पोलिसांनी सहकार्य केले असते तर मुलाचे प्राण वाचले असते, असे त्यांनी म्हटले आहे. (In Uttar Pradesh, a 13-year-old boy was killed for only 500 rupees)

इतर बातम्या

NM Bike Theft : मोटार सायकल चोरी करणाऱ्या 2 आरोपींना पनवेल गुन्हे शाखेकडून अटक

Nashik Lightning : इगतपुरीत शेतकरी दाम्पत्याचा वीज कोसळून मृत्यू, चार जण गंभीर जखमी

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.