Nashik Lightning : इगतपुरीत शेतकरी दाम्पत्याचा वीज कोसळून मृत्यू, चार जण गंभीर जखमी

घटनेची माहिती समजताच तलाठी यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. हे सर्व जण इगतपुरी तालुक्यातील मालुंजेवाडी येथील रहिवासी असून पिंपळगाव घाडगा येथे लग्नासाठी गेले होते.

Nashik Lightning : इगतपुरीत शेतकरी दाम्पत्याचा वीज कोसळून मृत्यू, चार जण गंभीर जखमी
इगतपुरीत शेतकरी दाम्पत्याचा वीज कोसळून मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 1:13 AM

नाशिक : वीज कोसळल्याने शेतकरी आदिवासी दाम्पत्याचा मृत्यू (Death) झाल्याची घटना इगतपुरी तालुक्यात घडली आहे. अन्य चार जण गंभीर जखमी (Injured) झाले आहे. जखमींना उपचारासाठी एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच तलाठी यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. हे सर्व जण इगतपुरी तालुक्यातील मालुंजेवाडी येथील रहिवासी असून पिंपळगाव घाडगा येथे लग्नासाठी गेले होते. तेथून घरी परतत असताना अचानक जोरदार वादळी वारा व वीजांचा कडकडाट सुरू झाल्यामुळे ते झाडाखाली थांबले असताना ही दुर्घटना घडली. (A farmer couple was killed and four others were seriously injured in a lightning strike in Igatpuri)

लग्न समारंभाहून घरी परतत असताना घडली दुर्घटना

दशरथ दामू लोते (35), सुनिता दशरथ लोते (30) अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत. इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात बुधवारी सकाळपासून पावसाचे सावट दिसून येत होते. हे दाम्पत्य इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथे लग्नसमारंभासाठी गेले होते. लग्न समारंभ आटोपून घरी परतत असताना अचानक जोरदार वारे वाहू लागले. वीजांचाही कडकडाट सुरू झाल्यामुळे सदर दाम्पत्य व दोन मुली रस्त्यावरील एका झाडाखाली थांबले. यावेळी अचानक वीजेचा लोळ अंगावर येत सदर दाम्पत्य जागीच ठार झाले. तर तेजस्वी दशरथ लोते (7), सोनाली दशरथ लोते (5) यांच्यासह अन्य एक महिला व एक पुरुष गंभीर जखमी झाले असून सदर जखमींना एसएमबीटी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी वीज पडून ठार झालेल्या दाम्पत्याच्या व कुटुंबांना भरपाई देण्यात यावी तसेच जखमींना देखील शासकीय मदत करण्यात यावी अशी मागणी उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी केली.

नैसर्गिक आपत्ती दरम्यान नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

अवकाळी पावसामुळे वातावरणात अचानक बदल होत असून नागरिकांनी सावधानता बाळगत वादळी वारे सुरू असताना वीजेच्या खांबाजवळ उभे राहू नये. तसेच झाडाखाली उभे राहू नये. वीजवाहक तारा यापासून दूर उभे राहावे. त्याचप्रमाणे मोबाईल स्वीच ऑफ करून ठेवावा. तसेच घरातील वीज उपकरणे बंद स्थितीतच ठेवावे. अशा सूचना शासनाच्या वतीने देण्यात आल्या असून ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (A farmer couple was killed and four others were seriously injured in a lightning strike in Igatpuri)

इतर बातम्या

Shocking : जेवणाच्या पैशांवरुन तुफान राडा, 17 जणांकडून जीवघेणा हल्ला! कामोठ्यातील धक्कादायक घटना

अनिल देशमुखांची 11 एप्रिलपर्यंत CBI कोठडीत रवानगी, चौकशी दिल्ली की मुंबईतच होणार?

Non Stop LIVE Update
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.