AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहेत न्यामूर्ती बी.वी. नागरत्ना? भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होण्याचा मान मिळणार

भारताच्या सरन्यायाधीशपदी लवकरच महिला होण्याची शक्यता आहे. बी.व्ही. नागरत्ना या सरन्यायाधीश होऊ शकतात. त्यांच्याविषयी जाणून घ्या

कोण आहेत न्यामूर्ती बी.वी. नागरत्ना? भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होण्याचा मान मिळणार
b v NagratnaImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 08, 2026 | 12:04 PM
Share

भारतात सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश पद अद्याप कोणत्याही महिलेने भूषवलेले नाही. आता लवकरच भारताची 75 वर्षांची प्रतिक्षा संपुष्टात येणार आहे. कारण सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश म्हणून बी.वी. नागरत्ना यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठता क्रमानुसार विक्रम नाथ यांच्यानंतर आता न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांची नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोण आहेत नागरत्ना?

बी. व्ही. नागरत्ना यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1962 रोजी बेंगळुरूमध्ये झाला.  त्यांनी के जीसस अँड मेरी कॉलेजमध्ये बीएचे शिक्षण पूर्ण केलं. पुढे 1987 साली दिल्ली विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी 1987 साली वकिली सुरू केली. न्यायमूर्ती नागरत्ना यांचे वडील ई. एस. व्यंकटरमैया हे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश होऊन गेले आहेत. त्यांनी 19 जून 1989 ते डिसेंबर 1989 या कालावधित सरन्यायाधीश पद भूषवलं. ते सुप्रीम कोर्टाचे 19वे सरन्यायाधीश ठरले. त्यांनी सरन्यायाधीश पद भूषवल्यास, त्या अशा व्यक्ती ठरतील, ज्यांचे वडील आणि स्वत: दोघांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश पद भूषवल्याचा इतिहास होईल.

सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत सरन्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी ज्येष्ठतेवर आधारित परंपरेचं पालन केलं आहे. सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ न्यायाधीशांची पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली जाते. सुप्रीम कोर्टाच्या वेबसाइटनुसार, आता न्यायमूर्ती सूर्यकांत, पुढे न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि मग न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना असा क्रम आहे. न्यायमूर्ती नागरत्ना या सप्टेंबर 2027 रोजी सरन्यायाधीश होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 29 ऑक्टोबर 2027 रोजी सेवानिवृत्त होण्याची शक्यता आहे. त्यांचा कार्यकाळ हा 36 दिवसांचा असू शकतो.

सुप्रीम कोर्टाची 1950 साली स्थापना झाली. तेव्हापासून भारताच्या सरन्यायाधीशपदी अद्याप एकही महिला विराजमान झालेली नाही. न्यायपालिकेत महिलांची संख्या वाढताना दिसत आहे. परंतु सुप्रीम कोर्टात महिलांचे प्रतिनिधित्व मर्यादितच राहिलं आहे. सुप्रीम कोर्टात 2026 साली न्यायमूर्ती नागरत्ना, न्यायमूर्ती व्ही. मोहना यांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे महिला न्यायमूर्तींची संख्या वाढल्याचे दिसून आले. परंतु सरन्यायाधीश पदापर्यंत एकही महिला पोहोचलेली नाही. परंतु आता सुप्रीम कोर्टात महिला सरन्यायाधीश देखील होण्याची शक्यता आहे.

Follow Us
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
बिनबुडाचं गाडगं... बिना पेंदे का लोटा! गुणरत्न सदावर्तेंनी जरांगेंना डिवचलं
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut | नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल; पुढे म्हणाले, देशाचे कॅबिनेट...
श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले
Sanjay Gaikwad | श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले...
रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची...
Maratha Reservation | रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची महत्त्वाची बैठक; फडणवीसांसह...
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात