AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Canada : दोन्ही देशातील संबंध बिघडले तर कोणाला बसणार अधिक फटका

India canada Tension : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचं म्हटल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. त्यांचा हा दावा भारत सरकारने फेटाळून लावला आहे. भारताने ही यावर जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.

India vs Canada : दोन्ही देशातील संबंध बिघडले तर कोणाला बसणार अधिक फटका
shailesh musale
shailesh musale | Updated on: Sep 25, 2023 | 4:22 PM
Share

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील संबंध ताणले जात आहेत. कॅनडाचे पंतप्रधान यांना तीन महिन्यांनंतर या प्रकरणावर जाग आली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निज्जर यांच्या हत्येत भारतीय यंत्रणांचा हात असल्याचा आरोप संसदेत केला होता. त्यानंतर भारताने देखील त्यांना हा दावा राजकीय हेतून प्रेरित असल्याचं म्हटलं होतं. कॅनडाच्या प्रत्येक दाव्याला भारताने जोरदार प्रत्त्यूत्तर दिले आहे.  दोन्ही देशांमध्ये 8 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्तचा व्यवसाय चालतो. पण संबंध बिघडल्यामुळे याचा फटका कोणाला अधिक बसणार आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

 1.80 लाखाहून अधिक भारतीय विद्यार्थी

गेल्या वर्षात 1.80 लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी कॅनडामध्ये राहत होते. अमेरिकेनंतर कॅनडा हा भारतीय विद्यार्थ्यांसाठी दुसरा पर्याय आहे. परदेशात शिकण्यासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांपैकी जवळपास 14 % विद्यार्थी कॅनडाला जातात. त्यामुळे भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध बिघडले तर याचा फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसू शकतो.

भारतात येणाऱ्या पर्यटकांचा आकडा ही अधिक

भारतात येणाऱ्या एकूण परदेशी पर्यटकांमध्ये कॅनडामधून येणाऱ्या पर्यटकांचा पाचवा क्रमांक लागतो. गेल्यावर्षी कॅनडातून दोन लाखाहून अधिक पर्यटक भारतात आले होते. भारतीय पर्यटकांची संख्या 8 लाख  होते. जे कॅनडात गेले होते.

कॅनडात 17.6 लाख परदेशी भारतीय राहतात. भारतीय लोकसंख्येच्या बाबतीत कॅनडाचा जगात सातवा क्रमांक लागतो. यापैकी 15.1 लाख लोकांनी कॅनडा किंवा इतर कोणत्याही देशाचे नागरिकत्व घेतले आहे. 1.8 लाख अनिवासी भारतीय म्हणजेच अनिवासी भारतीय आहेत. त्यांनी 2021 मध्ये भारतातील त्यांच्या कुटुंबांना जवळपास $4 अब्ज परत पाठवले. पैसे पाठवण्याच्या बाबतीतही कॅनडा 9व्या क्रमांकावर आहे.

भारत आणि कॅनडामध्ये व्यापार

2022-23 मध्ये भारत आणि कॅनडामधील व्यापार $8.2 अब्ज इतका आहे. भारताच्या व्यापार भागीदारांच्या यादीत कॅनडा 35 व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी कॅनडाने भारतात 5 दशलक्ष टन मसूर विकला. स्टील बनवण्यासाठी लागणारा कोकिंग कोळसा ($1 बिलियन) भारताने खरेदी केला. कॅनडातून आपल्याला खत उद्योगासाठी पोटॅशियम क्लोराईड, कागदासाठी लाकडाचा लगदा आणि न्यूजप्रिंट देखील मिळतो. त्या बदल्यात, कॅनडा भारताकडून $100 दशलक्ष किमतीचे स्मार्टफोन विकत घेतो. तसेच $200 दशलक्ष किमतीची औषधे ही घेतो.

Follow Us
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?