AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Canada : दोन्ही देशातील संबंध बिघडले तर कोणाला बसणार अधिक फटका

India canada Tension : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचं म्हटल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. त्यांचा हा दावा भारत सरकारने फेटाळून लावला आहे. भारताने ही यावर जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.

India vs Canada : दोन्ही देशातील संबंध बिघडले तर कोणाला बसणार अधिक फटका
| Updated on: Sep 25, 2023 | 4:22 PM
Share

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील संबंध ताणले जात आहेत. कॅनडाचे पंतप्रधान यांना तीन महिन्यांनंतर या प्रकरणावर जाग आली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी निज्जर यांच्या हत्येत भारतीय यंत्रणांचा हात असल्याचा आरोप संसदेत केला होता. त्यानंतर भारताने देखील त्यांना हा दावा राजकीय हेतून प्रेरित असल्याचं म्हटलं होतं. कॅनडाच्या प्रत्येक दाव्याला भारताने जोरदार प्रत्त्यूत्तर दिले आहे.  दोन्ही देशांमध्ये 8 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्तचा व्यवसाय चालतो. पण संबंध बिघडल्यामुळे याचा फटका कोणाला अधिक बसणार आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

 1.80 लाखाहून अधिक भारतीय विद्यार्थी

गेल्या वर्षात 1.80 लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी कॅनडामध्ये राहत होते. अमेरिकेनंतर कॅनडा हा भारतीय विद्यार्थ्यांसाठी दुसरा पर्याय आहे. परदेशात शिकण्यासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांपैकी जवळपास 14 % विद्यार्थी कॅनडाला जातात. त्यामुळे भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध बिघडले तर याचा फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसू शकतो.

भारतात येणाऱ्या पर्यटकांचा आकडा ही अधिक

भारतात येणाऱ्या एकूण परदेशी पर्यटकांमध्ये कॅनडामधून येणाऱ्या पर्यटकांचा पाचवा क्रमांक लागतो. गेल्यावर्षी कॅनडातून दोन लाखाहून अधिक पर्यटक भारतात आले होते. भारतीय पर्यटकांची संख्या 8 लाख  होते. जे कॅनडात गेले होते.

कॅनडात 17.6 लाख परदेशी भारतीय राहतात. भारतीय लोकसंख्येच्या बाबतीत कॅनडाचा जगात सातवा क्रमांक लागतो. यापैकी 15.1 लाख लोकांनी कॅनडा किंवा इतर कोणत्याही देशाचे नागरिकत्व घेतले आहे. 1.8 लाख अनिवासी भारतीय म्हणजेच अनिवासी भारतीय आहेत. त्यांनी 2021 मध्ये भारतातील त्यांच्या कुटुंबांना जवळपास $4 अब्ज परत पाठवले. पैसे पाठवण्याच्या बाबतीतही कॅनडा 9व्या क्रमांकावर आहे.

भारत आणि कॅनडामध्ये व्यापार

2022-23 मध्ये भारत आणि कॅनडामधील व्यापार $8.2 अब्ज इतका आहे. भारताच्या व्यापार भागीदारांच्या यादीत कॅनडा 35 व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी कॅनडाने भारतात 5 दशलक्ष टन मसूर विकला. स्टील बनवण्यासाठी लागणारा कोकिंग कोळसा ($1 बिलियन) भारताने खरेदी केला. कॅनडातून आपल्याला खत उद्योगासाठी पोटॅशियम क्लोराईड, कागदासाठी लाकडाचा लगदा आणि न्यूजप्रिंट देखील मिळतो. त्या बदल्यात, कॅनडा भारताकडून $100 दशलक्ष किमतीचे स्मार्टफोन विकत घेतो. तसेच $200 दशलक्ष किमतीची औषधे ही घेतो.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.