AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ‘या’ दिवशी भारतीय व्यक्ती चंद्रावर जाणार, सरकारने संसदेत दिली माहिती

भारतीय अंतराळवीर चंद्रावर कधी उतरणार याबाबत चर्चा सुरु आहे. अशातच आज सरकारने लोकसभेत याबाबत माहिती दिली आहे.

मोठी बातमी! 'या' दिवशी भारतीय व्यक्ती चंद्रावर जाणार, सरकारने संसदेत दिली माहिती
India-in-Space
| Updated on: Aug 18, 2025 | 6:05 PM
Share

आज लोकसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बिहारमधील मतदार यादीच्या दुरुस्तीच्या मुद्द्यावरून गोंधळ घातला. याच दरम्यान दुपारी 2 वाजता भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (आयएसएस) भेटीवर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी 2040 मध्ये एक भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरेल अशी माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पुढे बोलताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी, ‘संपूर्ण देश शुभांशू यांच्या यशस्वी अंतराळ मोहिमेचा आनंद साजरा करत आहे. मात्र विरोधी पक्ष गोंधळ घालत आहेत, ते सभागृहात चर्चेसाठी तयार नाहीत. विरोधी पक्ष अंतराळवीरावर कसा नाराज असू शकतो? असा सवाल उपस्थित केला आहे.

विरोधकांच्या गोंधळानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले होते. दुपारी 2 वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ‘2047 पर्यंत विकसित भारतासाठी अंतराळ कार्यक्रमाची महत्त्वाची भूमिका’ या विषयावर विशेष चर्चा सुरू केली. यावेळी बोलताना विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ‘2040 मध्ये एक भारतीय अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल अशी माहिती दिली. 2047 पर्यंत भारताला एक विकसित देश बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचे हे यश असेल.’

विरोधकांवर निशाणा साधला

जितेंद्र सिंह यांनी संसदेत गोंधळ घालणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधला. ‘देशात उत्सवाचे वातावरण आहे, देश अंतराळ क्षेत्रातील कामगिरीचा उत्सव साजरा करत आहे, मात्र विरोधक अवकाश क्षेत्रातील तज्ञांचेही अभिनंदन करण्यास तयार नाहीत. विरोधक सरकार आणि भाजप, एनडीएवर नाराज असू शकतात, परंतु ते अंतराळवीरावर, गगनयान प्रवाशावरही नाराज कसे काय असू शकतात? विरोधकांची ही नाराजी स्वतःवरील राग व्यक्त करते कारण ते त्यांच्या सर्व योजनांमध्ये अपयशी ठरले हे यातून सिद्ध होते.

जगाने भारताची ताकद मान्य केली

ऑपरेशन सिंदूर दरम्यान अवकाशात भारताच्या ताकदीचे प्रदर्शन पाहून संपूर्ण जगाने भारताची ताकद मान्य केली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान अंतराळ विभागाने महत्वाची भूमिका बजावली. यासाठी गेल्या 10 वर्षात तंत्रज्ञान विकसित करण्यात आले होते असंही जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.