AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! ‘या’ दिवशी भारतीय व्यक्ती चंद्रावर जाणार, सरकारने संसदेत दिली माहिती

भारतीय अंतराळवीर चंद्रावर कधी उतरणार याबाबत चर्चा सुरु आहे. अशातच आज सरकारने लोकसभेत याबाबत माहिती दिली आहे.

मोठी बातमी! 'या' दिवशी भारतीय व्यक्ती चंद्रावर जाणार, सरकारने संसदेत दिली माहिती
India-in-Space
| Updated on: Aug 18, 2025 | 6:05 PM
Share

आज लोकसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बिहारमधील मतदार यादीच्या दुरुस्तीच्या मुद्द्यावरून गोंधळ घातला. याच दरम्यान दुपारी 2 वाजता भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (आयएसएस) भेटीवर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी 2040 मध्ये एक भारतीय अंतराळवीर चंद्रावर उतरेल अशी माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पुढे बोलताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी, ‘संपूर्ण देश शुभांशू यांच्या यशस्वी अंतराळ मोहिमेचा आनंद साजरा करत आहे. मात्र विरोधी पक्ष गोंधळ घालत आहेत, ते सभागृहात चर्चेसाठी तयार नाहीत. विरोधी पक्ष अंतराळवीरावर कसा नाराज असू शकतो? असा सवाल उपस्थित केला आहे.

विरोधकांच्या गोंधळानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले होते. दुपारी 2 वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ‘2047 पर्यंत विकसित भारतासाठी अंतराळ कार्यक्रमाची महत्त्वाची भूमिका’ या विषयावर विशेष चर्चा सुरू केली. यावेळी बोलताना विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ‘2040 मध्ये एक भारतीय अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल अशी माहिती दिली. 2047 पर्यंत भारताला एक विकसित देश बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचे हे यश असेल.’

विरोधकांवर निशाणा साधला

जितेंद्र सिंह यांनी संसदेत गोंधळ घालणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधला. ‘देशात उत्सवाचे वातावरण आहे, देश अंतराळ क्षेत्रातील कामगिरीचा उत्सव साजरा करत आहे, मात्र विरोधक अवकाश क्षेत्रातील तज्ञांचेही अभिनंदन करण्यास तयार नाहीत. विरोधक सरकार आणि भाजप, एनडीएवर नाराज असू शकतात, परंतु ते अंतराळवीरावर, गगनयान प्रवाशावरही नाराज कसे काय असू शकतात? विरोधकांची ही नाराजी स्वतःवरील राग व्यक्त करते कारण ते त्यांच्या सर्व योजनांमध्ये अपयशी ठरले हे यातून सिद्ध होते.

जगाने भारताची ताकद मान्य केली

ऑपरेशन सिंदूर दरम्यान अवकाशात भारताच्या ताकदीचे प्रदर्शन पाहून संपूर्ण जगाने भारताची ताकद मान्य केली आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान अंतराळ विभागाने महत्वाची भूमिका बजावली. यासाठी गेल्या 10 वर्षात तंत्रज्ञान विकसित करण्यात आले होते असंही जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.