AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railway: रेल्वे झाली लेट? प्रवाशांना मोफत भोजनासह तिकीट रिफिंडपर्यंत, जाणून घ्या महत्त्वाचा नियम

Indian Railways: राजधानी, शताब्दी आणि दुरंतो सारख्या प्रीमियम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ट्रेन दोन तास अथवा त्यापेक्षा अधिक विलंब झाल्यास मोफत जेवणासह इतर सुविधा मिळतात. रेल्वेला उशीर झाल्यास जाणून घ्या महत्त्वाचा नियम. प्रवाशांना मिळतो काय काय फायदा? काय सांगतो रेल्वेचा नियम?

Indian Railway: रेल्वे झाली लेट? प्रवाशांना मोफत भोजनासह तिकीट रिफिंडपर्यंत, जाणून घ्या महत्त्वाचा नियम
रेल्वे झाली लेट? प्रवाशांना मोफत भोजनासह तिकीट रिफिंडपर्यंत
| Updated on: Jul 28, 2026 | 3:08 PM
Share

रेल्वे प्रवासादरम्यान ट्रेनला उशीर झाला तर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना असुविधांना सामोरे जावे लागते. पण भारतीय रेल्वेने प्रीमियम ट्रेनच्या प्रवाशांसाठी काही खास सुविधा पुरवल्या आहेत. IRCTC च्या भोजनासंबंधी निर्देशानुसार, राजधानी, शताब्दी आणि दुरुंतो सारख्या प्रीमियम रेल्वे जर दोन तास अथवा त्यापेक्षा अधिक विलंबाने धावली तर प्रवाशांना भोजन उपलब्ध करून देण्यात येते. त्यासाठी प्रवाशांकडून कोणतेही पैसे आकारले जात नाही. वेळेनुसार, प्रवाशांना नाष्टा, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण, चहा आणि स्नॅक्स द्यावे लागते.

प्रवाशांना देण्यात येतात कोणत्या सुविधा?

प्रवासाच्या सुरुवातीला प्रवाशांना बिस्किट देण्यात येतात. त्यासोबतच चहा आणि कॉफी देण्यात येते. प्रवाशांना साखरयुक्त आणि साखरविरहीत पाऊच देण्यात येतात. मिल्क क्रीमर किट देण्यात येते. नाष्टा अथवा संध्याकाळच्यावेळी पांढऱ्या अथवा ब्राऊन बेडचे स्लाईस, चहा, लोणी आणि 200 मिलीलिटर फ्रूट ज्यूस अथवा चहा-कॉफी देण्यात येते. दुपारी आणि रात्री संतुलित आहार देण्यात येतो. त्यामध्ये भात, राजमा, वरण अथवा इतर पदार्थ देण्यात येतात. याशिवाय पुरी, मिक्स भाजी, लोणचं, मीठ आणि मिर्ची पाकिट देण्यात येते. त्यावेळी उपलब्ध जेवण देण्यात येते. एखादा गोड पदार्थ पण असू शकतो.

तीन तासाच्या उशीरानंतर तिकिटाचे पैसे परत

ट्रेन जर तीन तासांपेक्षा अधिक उशीरा धावत असेल अथवा तिच्या मार्गात बदल करण्यात येत असेल तर प्रवाशांचे तिकिट तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येते. प्रवाशाला संपूर्ण तिकिटाचे पैसे परत करण्यात येतात. रेल्वे काऊंटरवरून खरेदी करण्यात आलेले तिकीट जमा करून ते रद्द करण्यात येते. त्याची संपूर्ण रक्कम प्रवाशाला परत करण्यात येते.

जास्त उशीर झाल्यास रेल्वे देते अतिरिक्त सुविधा

ट्रेनला तीन तासापेक्षा अधिक उशीर होत असल्यास भारतीय रेल्वे प्रवाशांना अधिक सुविधा देते. यामध्ये प्रवाशांना प्रतिक्षा कक्ष कोणतेही शुल्क न आकारता उपलब्ध करून देण्यात येते. खाद्यपदार्थांचे स्टॉल मध्यरात्रीपर्यंत उघडी ठेवली जातात. यामुळे प्रवाशांना कोणतीही असुविधा होत नाही. तर अशावेळी स्टेशनवर अनुचित प्रकार घडू नये, प्रवाशांसाच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलाची अतिरिक्त तुकडी तैनात ठेवण्यात येते.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार