AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धाच्या काळात भारताच्या रणनीतीने जग हैराण, टीव्ही 9 समिटमध्ये पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे'या समिटमध्ये जागतिक संघर्षावर भारताची रणनिती सांगितली. आज जग ज्या स्थितीतून जात आहे ती खूप गंभीर आहे. हे जग संघर्षाने त्रस्त असताना आणि संपूर्ण जगावर त्याची सावली असताना अशात 'India and the World' वर बोलणे प्रासंगिक आहे.

युद्धाच्या काळात भारताच्या रणनीतीने जग हैराण, टीव्ही 9 समिटमध्ये पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य
PM MODI
| Updated on: Mar 23, 2026 | 10:21 PM
Share

टीव्ही 9 नेटवर्क ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे समिट (WITT) 2026’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य पूर्वेतील संघर्षावर टिप्पणी केली. पंतप्रधान म्हणाले की जगात 28 फेब्रुवारी पासून मोठा संघर्ष सुरु आहे. भारत प्रगती आणि विकासाच्या संकल्पासह पुढे जात आहे. भारताने आपले निर्णय आणि संकटांचा निपटारा करण्याची क्षमता दाखवली आहे. जगाची विभागणी दोन भागात झाली आहे. भारताने अभूतपूर्व मैत्रीचे पुल बांधले आहेत. ग्लोबल साऊथ पासून शेजारील देशांपर्यंत भारत सर्वांचा विश्वासू पार्टनर आहे.

पंतप्रधान म्हणाले की काही लोक विचारतात की आम्ही कोणच्या सोबत आहोत. त्यांना हे उत्तर आहे की आम्ही भारता सोबत आहोत. भारताच्या हितांसोबत आहोत. शांतता आणि संवादाच्यासोबत आहोत असेही पंतप्रधान म्हणाले.

भारत आव्हानांचा सामना करतो – पी.एम. मोदी

पंतप्रधान मोदी म्हणाले की आज आम्ही भारत आणि जगाच्या संदर्भात चर्चा करत आहोत. आज जग संघर्षामुळे अडकले आहे. जेव्हा या संघर्षाचे दुष्परिणाम देखील दिसत आहेत. भारत आणि जगा संदर्भात बोलणे खूपच प्रासंगिक आहे. साल 2014 च्या आधीच्या स्थितीला सोडून भारत एक नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे. भारत आव्हानांना टाळत नाही. त्या आव्हानांशी टक्कर घेतो असेही त्यांनी सांगितले.

ते यावेळी म्हणाले की कोरोना साथीच्या नंतर आलेली आव्हाने एकामागोमाग वाढली. असे कोणतेही वर्ष नाही ज्याने भारत आणि भारतीयांची परीक्षा घेतली नाही. परंतू १४० कोटी भारतीयांच्या एकजूट प्रयत्नांनी भारताने प्रत्येक संकटाचा सामना करत पुढे जात आहे. या वेळी युद्धाची परिस्थितीत भारताची निती आणि रणनिती पाहून भारताचे सामर्थ्य पाहून जगाचे अनेक देश हैराण आहेत.

कोणताही देश युद्धाच्या परिणामापासून वाचू शकत नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की जगात जेथे युद्ध सुरु आहे. ते भारताच्या सीमेपासून दूर आहे. आजच्या काळात कोणताही देश युद्धाच्या दुष्परिणामापासून दूर राहील हे होऊ शकत नाही. अनेक देशात स्थिती गंभीर झाली आहे, राजकीय स्वार्थाने भरलेले काही पक्ष संकटाच्या या घडीतही आपली रायकीय संधी शोधत आहेत. हा वेळ संयमाचा आहे. संवेदनशीलतेचा आहे.

पीएम मोदी म्हणाले की कोरोना साथीत पाहिले की देशवासी संयमाने सामना करतात ते कसे परिणान येतात. जगातील अनेक उलाढालीतही भारताने आपली प्रगतीच्या गतीला कायम ठेवले आहे.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.