AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार यांना निमंत्रण मिळाले का? विश्व हिंदू परिषदेने दिले उत्तर

ram mandir pran pratishtha | अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. यावरुन राज्यातील राजकारण तापले होते. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना निमंत्रण दिले नसल्यावरुन संजय राऊत संतापले होते. आता यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेने स्पष्टीकरण दिले आहे.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार यांना निमंत्रण मिळाले का? विश्व हिंदू परिषदेने दिले उत्तर
| Updated on: Dec 29, 2023 | 9:57 AM
Share

संदीप राजगोळकर, नवी दिल्ली, दि.29 डिसेंबर | अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्येत युद्ध पातळीवर तयारी सुरु आहे. परंतु या सोहळ्यावरुन महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. या सोहळ्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना निमंत्रण पाठवले नसल्याचे आरोप होत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. अयोद्धेत राम मंदिरासाठी निमंत्रण पाठवणारे भाजप कोण? आम्ही भाजपचे हे पॉलिटीकल इव्हेंट संपल्यानंतर अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेऊ, असे म्हटले. त्याचवेळी विश्व हिंदू परिषदेकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रित दिले आहे.

कोणाला पाठवले निमंत्रण

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कामांचे वाटप केले गेले आहे. त्यानुसार रामजन्मभूमी मंदिर न्यास व विश्व हिंदू परिषदेच्याकडे देशभरातील व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण पाठवण्याची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे, शरद पवार याशिवाय समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही निमंत्रित विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष अलोक कुमार यांनी सांगितले. या सोहळ्यासाठी आम्ही सर्व प्रमुख नेत्यांना निमंत्रित दिले आहे. कोणालाही टाळलेले नाही. सर्वांनी सोहळ्याला यावे. यात राजकारण करू नये, असे अलोक कुमार यांनी म्हटले आहे.

संजय राऊत आणि गिरीश महाजन यांच्यात जुंपली

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना राम मंदिर सोहळ्यासाठी निमंत्रण मिळाले नसल्यामुळे भाजपवर जोरदार टीका केली होती. आम्ही राम मंदिरासाठी एक कोटी रुपये दिले असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर भाजपचा हा पॉलिटीकल इव्हेंट संपल्यानंतर आम्ही अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेऊ, असे त्यांनी म्हटले. संजय राऊत यांच्या या टीकेवर भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले होते. राज ठाकरे यांना निमंत्रण दिले आहे. परंतु उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाही. यावर गिरीश महाजन म्हणाले होती की, अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांचे योगदान काय आहे. घरात बसून भूमिका घेणे आणि प्रत्यक्ष कारसेवा करणे यात फरक आहे. उद्धव ठाकरे साधे आमदार आहे, असे गिरीश महाजन यांनी म्हटले होते. परंतु आता विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानंतर या प्रकरणावर पडदा पडणार आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.