AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राज ठाकरे यांना बोलवले, उद्धव ठाकरे यांना ‘फुली’

ram mandir pran pratishtha | अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांचे योगदान काय आहे. घरात बसून भूमिका घेणे आणि प्रत्यक्ष कारसेवा करणे यात फरक आहे. राम मंदिरासाठी शिवसेना उबाठा पक्षाने एक कोटी रुपये दिले होते. परंतु राम मंदिरासाठी एक कोटी रुपये भरपूर लोकांनी दिले आहेत, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राज ठाकरे यांना बोलवले, उद्धव ठाकरे यांना 'फुली'
uddav and raj thackeray Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Dec 26, 2023 | 1:32 PM
Share

विनायक डावरूंग, मुंबई, दि.26 डिसेंबर | अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरु आहे. व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या सोहळ्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवण्यात आले नाही. राज ठाकरे यांना मात्र निमंत्रण मिळाले आहे. त्यावरुन खासदार संजय राऊत सातत्याने टीका करत आहेत. त्यांच्या टीकेला राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे हे साधे आमदार आहेत. केंद्राच्या व्हीव्हीआयपीच्या यादीत उद्धव ठाकरे नसतील. राज ठाकरे असतील. यामुळे राज ठाकरे यांना बोलावले असेल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.

उद्धव ठाकरे यांचे योगदान काय?

अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांचे योगदान काय आहे. घरात बसून भूमिका घेणे आणि प्रत्यक्ष कारसेवा करणे यात फरक आहे. आम्ही वीस, वीस दिवस कारागृहामध्ये होतो. तेव्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कुठे होते? बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेबाबत दुमत नाही. मात्र जे बोलतायेत ते आयत्या बिळावरचे नागोबा आहेत. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी कारसेवा केल्याचा एखादा फोटो दाखवावा, असे आव्हान गिरीश महाजन यांनी दिले. राम मंदिरासाठी शिवसेना उबाठा पक्षाने एक कोटी रुपये दिले होते. परंतु राम मंदिरासाठी एक कोटी भरपूर लोकांनी दिले आहेत, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

आम्ही टिकणारे आरक्षण देणार

मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणारच आहोत. हे टिकणारे आरक्षण असणार आहे, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वारंवार सांगितले आहे. या आधी आम्ही टिकणारे आरक्षण दिले होते. उच्च न्यायालयाने ते मान्य केले. परंतु सरकार बदलले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि सर्वोच्च न्यायालयात ते फेटाळले गेले. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ही पिटीशनच्या माध्यमातून नवीन आशा निर्माण झाली आहे. त्यात आम्ही मराठा समाज कसा सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे, हे सिद्ध करणार आहोत, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

दोन्ही नेत्यांनी थांबावे

मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात ज्या पद्धतीने टीका, टीपणी चालू आहे, ती खालच्या भाषेत चालू आहे. मला वाटते हे कुठेतरी थांबले पाहिजे. दोन नेत्यांमधील वाद थांबला पाहिजे. समाज, समाजात दुफळी निर्माण होता कामा नये. छनग भुजबळ यांनाही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी विनंती केली की आता हे थांबवा. मी ज्या दिवशी जरांगे पाटलांकडे गेलो त्यांनाही सांगितलं की आता हे थांबवा. पुन्हा शब्दाला शब्द होऊ नये, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.