AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राज ठाकरे यांना बोलवले, उद्धव ठाकरे यांना ‘फुली’

ram mandir pran pratishtha | अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांचे योगदान काय आहे. घरात बसून भूमिका घेणे आणि प्रत्यक्ष कारसेवा करणे यात फरक आहे. राम मंदिरासाठी शिवसेना उबाठा पक्षाने एक कोटी रुपये दिले होते. परंतु राम मंदिरासाठी एक कोटी रुपये भरपूर लोकांनी दिले आहेत, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राज ठाकरे यांना बोलवले, उद्धव ठाकरे यांना 'फुली'
uddav and raj thackeray Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Dec 26, 2023 | 1:32 PM
Share

विनायक डावरूंग, मुंबई, दि.26 डिसेंबर | अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरु आहे. व्हीव्हीआयपी लोकांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या सोहळ्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवण्यात आले नाही. राज ठाकरे यांना मात्र निमंत्रण मिळाले आहे. त्यावरुन खासदार संजय राऊत सातत्याने टीका करत आहेत. त्यांच्या टीकेला राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे हे साधे आमदार आहेत. केंद्राच्या व्हीव्हीआयपीच्या यादीत उद्धव ठाकरे नसतील. राज ठाकरे असतील. यामुळे राज ठाकरे यांना बोलावले असेल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.

उद्धव ठाकरे यांचे योगदान काय?

अयोध्या येथील श्रीराम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांचे योगदान काय आहे. घरात बसून भूमिका घेणे आणि प्रत्यक्ष कारसेवा करणे यात फरक आहे. आम्ही वीस, वीस दिवस कारागृहामध्ये होतो. तेव्हा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कुठे होते? बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेबाबत दुमत नाही. मात्र जे बोलतायेत ते आयत्या बिळावरचे नागोबा आहेत. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी कारसेवा केल्याचा एखादा फोटो दाखवावा, असे आव्हान गिरीश महाजन यांनी दिले. राम मंदिरासाठी शिवसेना उबाठा पक्षाने एक कोटी रुपये दिले होते. परंतु राम मंदिरासाठी एक कोटी भरपूर लोकांनी दिले आहेत, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

आम्ही टिकणारे आरक्षण देणार

मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणारच आहोत. हे टिकणारे आरक्षण असणार आहे, हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी वारंवार सांगितले आहे. या आधी आम्ही टिकणारे आरक्षण दिले होते. उच्च न्यायालयाने ते मान्य केले. परंतु सरकार बदलले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि सर्वोच्च न्यायालयात ते फेटाळले गेले. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ही पिटीशनच्या माध्यमातून नवीन आशा निर्माण झाली आहे. त्यात आम्ही मराठा समाज कसा सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे, हे सिद्ध करणार आहोत, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

दोन्ही नेत्यांनी थांबावे

मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात ज्या पद्धतीने टीका, टीपणी चालू आहे, ती खालच्या भाषेत चालू आहे. मला वाटते हे कुठेतरी थांबले पाहिजे. दोन नेत्यांमधील वाद थांबला पाहिजे. समाज, समाजात दुफळी निर्माण होता कामा नये. छनग भुजबळ यांनाही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी विनंती केली की आता हे थांबवा. मी ज्या दिवशी जरांगे पाटलांकडे गेलो त्यांनाही सांगितलं की आता हे थांबवा. पुन्हा शब्दाला शब्द होऊ नये, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.