AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; चार दहशतवाद्यांचा खात्मा, एक पोलीस जखमी

टोलनाक्यावर गुरुवारी पहाटे पाच वाजता दहशतवादी आणि भारतीय जवान आमनेसामने आले. | Jammu and Kashmir

काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; चार दहशतवाद्यांचा खात्मा, एक पोलीस जखमी
| Updated on: Nov 19, 2020 | 9:49 AM
Share

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. आतापर्यंत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. तर या चकमकीत एक पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाला आहे. जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बान   टोलनाक्यावर गुरुवारी पहाटे पाच वाजता दहशतवादी आणि भारतीय जवान आमनेसामने आले. यानंतर दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरु झाला. या पार्श्वभूमीवर नागरोटा परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून जम्मू-श्रीनगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. (Jammu Kashmir security force udhampur encounter terrorist)

दरम्यान गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवानांनी नगरोटा भागात जागोजागी बंदोबस्त ठेवला होता. वाहनांची तपासणी केली जात असतानाच ट्रकमधून आलेले दहशतवादी जंगलाकडे पळू लागले. यावेळी जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली.

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर झालेली ही दुसरी मोठी चकमक आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात महामार्गावर झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.

पुलवामामध्ये 12 नागरिक जखमी पुलवामा येथे बुधवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (CRPF) बंकरवर ग्रेनेड फेकून हल्ला केला होता. यामध्ये 12 नागरिक जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी फेकलेला ग्रेनेड बंकरऐवजी रस्त्यावर जाऊन पडला. त्यामुळे नागरिक जखमी झाले.

संबंधित बातम्या:

लडाखमध्ये मायनस 40 डिग्रीतही चीनला आव्हान देणार, थंडीसाठी भारतीय सैन्याची चोख व्यवस्था

Jammu and Kashmir | पुलवाम्यात दहशतवाद्यांचा जवानांवर ग्रेनेड हल्ला, 12 नागरिक जखमी

दिल्लीत मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; ‘जैश’च्या दोन दहशतवाद्यांना अटक

(Jammu Kashmir security force udhampur encounter terrorist)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.