AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सरकारने बुरखा आणि घुंघट दोन्हींवरही बंदी घालावी’

भोपाळ : आपल्या स्पष्ट भूमिकांसाठी ओळखले जाणारे गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी बुरखा बंदीवरही आपली भूमिका स्पष्ट केली. सरकारने बुरखा आणि राजस्थानमधील घुंघट या दोन्हींवर बंदी घालावी, अशी थेट मागणी जावेद अख्तर यांनी केली आहे. अख्तर यांनी शहीद एटीएस प्रमुख हेमंत करकरेंबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आणि भाजपच्या भोपाळमधील लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर […]

‘सरकारने बुरखा आणि घुंघट दोन्हींवरही बंदी घालावी’
| Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM
Share

भोपाळ : आपल्या स्पष्ट भूमिकांसाठी ओळखले जाणारे गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी बुरखा बंदीवरही आपली भूमिका स्पष्ट केली. सरकारने बुरखा आणि राजस्थानमधील घुंघट या दोन्हींवर बंदी घालावी, अशी थेट मागणी जावेद अख्तर यांनी केली आहे.

अख्तर यांनी शहीद एटीएस प्रमुख हेमंत करकरेंबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आणि भाजपच्या भोपाळमधील लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “काही लोक चुका करुनही स्वतःला बरोबर सिद्ध करतात. प्रज्ञा ठाकूर यांना भोपाळमधून उमेदवारी देऊन भाजपने त्यांचा पराभव स्वीकारला आहे.

‘साधूंच्या वेशात आलेल्यांवर विश्वास ठेऊ नका’

साधूंच्या वेशात आलेल्यांवर विश्वास ठेऊ नका. कारण रावणाने देखील साधूच्या वेशात येऊनच सीतेचं अपहरण केलं होतं, असे म्हणत जावेद यांनी प्रज्ञा ठाकूरवर घणाघाती टीका केली. तसेच प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी देण्यामागे नक्कीच भाजपचा काहीतरी नाईलाज असेल, असाही टोला लगावला.

‘अनेक मोदी येतील आणि जातील, मात्र देश आहे आणि असाच राहील’

“जावेद अख्तर यांनी भाजपच्या कार्यकाळातील लोकशाहीवर प्रश्न उपस्थित केले. जर कुणी आमच्यासोबत नसेल, तर ते देशद्रोही आहेत”, अशीच भाजपची विचारसरणी असल्याचे अख्तर यांनी सांगितले. तसेच अनेक मोदी येतील आणि जातील, मात्र देश आहे आणि असाच राहील, असेही नमूद केले. यावेळी अख्तर यांनी ‘चौकीदार चोर है’ ही भाषा योग्य नसून त्याचे समर्थन करत नाही, असे स्पष्ट केले.

‘ही निवडणूक भारत कोणत्या दिशेने जाणार हे ठरवेल’

“ही निवडणूक देशासाठी महत्वाची आहे. देश यापुढे कोणत्या दिशेने जाणार हे हीच निवडणूक ठरवेल,” असे जावेद अख्तर यांनी लोकसभा निवडणुकीच्या महत्वावर बोलताना सांगितले.

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.