AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चक्रिवादळानंतर का चर्चेत आले ओएनजीसी बार्ज?, जाणून घ्या याचा काय असतो उपयोग

ऑईल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC)ने याची अधिकृत पुष्टी केली आहे. या बार्जमध्ये त्यांचे 261 कर्मचारी होते, असे ओएनजीसीने म्हटले आहे. (know why ONGC barges came up in famous after the hurricane, what is uses of it)

चक्रिवादळानंतर का चर्चेत आले ओएनजीसी बार्ज?, जाणून घ्या याचा काय असतो उपयोग
चक्रिवादळानंतर का चर्चेत आले ओएनजीसी बार्ज
| Updated on: May 22, 2021 | 10:14 PM
Share

नवी दिल्ली : देशात आलेल्या तौक्ते वादळाने सर्वत्र हाहाःकार माजवला. रविवारी 16 मे रोजी हे वादळ गोव्यात धडकले. त्यानंतर कोकण, मुंबईतून सरकत गुजरातकडे गेले. वादळामुळे समुद्राला उधाण आले होते. समुद्र खवळला होता, उंचच उंच लाटा समुद्रात उसळत होत्या. या वादळात शेती, घरे, बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वदाळात ओएनजीसी कंपनीचे बार्ज P-305 ही बुडाले. ऑईल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC)ने याची अधिकृत पुष्टी केली आहे. या बार्जमध्ये त्यांचे 261 कर्मचारी होते, असे ओएनजीसीने म्हटले आहे. हे सर्वजण बॉम्बे हाय येथे ऑफशोर ड्रिलिंगसाठी गेले होते. वादळामुळे ते तिथेच अडकले आणि बार्ज बुडायला लागला. या घटनेत आतापर्यंत 49 लोकांचे मृतदेह काढण्यात आले आहेत. (know why ONGC barges came up in famous after the hurricane, what is uses of it)

सामानाची वाहतूक करण्यासाठी होतो बार्जचा वापर

बार्जचा फ्लोर पूर्णपणे सपाट असतो आणि नद्यांच्या आणि मोठ्या कालव्यांमधून जड वस्तूंच्या वाहतुकीच्या उद्देशाने ते तयार केले जाते. आजच्या काळात बार्जचा वापर मोठ्या प्रमाणात एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी माल नेण्यासाठी केला जातो. सामान पाठविण्यासाठी बार्जचा वापर केला जातो कारण ते इतर जहाजांपेक्षा अधिक स्वस्त असतात. चक्रिवादळात दुर्घटनाग्रस्त झालेले बार्ज पी -305 अपघातावेळी किनाऱ्यापासून सुमारे 70 किमी अंतरावर होते. ओएनजीसीच्या ऑईल रिग्स व प्लॅटफॉर्मवर करारावर घेतलेल्या कामगारांसाठी हे बार्ज राहण्यासाठी घेतले जातात. हे सर्व कामगार त्यावर बांधलेल्या क्वार्टरमध्ये राहत होते. बार्ज पूर्णपणे शक्तीहीन असतात आणि यामुळे टगबोटच्या मदतीने ते किना-यावर आणले जातात.

आणखी तीन लोक बार्जवर अडकले

चक्रीवादळ मुंबईत धडकल्यानंतर पश्चिम किनाऱ्यावरील चार बार्ज वाहून गेल्या. यानंतर राष्ट्रीय तटरक्षक दल (NCG) आणि भारतीय नौदलाने बचावकार्य सुरू केले. दोघांच्या मदतीने 147 जणांना बार्जमधून बाहेर काढण्यात आले. आणखी तीन बार्ज वादळाचा बळी ठरले, यात शेकडो कामगार होते. या सर्वांकडून मदतीसाठी सिग्नल पाठविण्यात आला. मंगळवारी हवामान स्वच्छ झाल्यावर हेलिकॉप्टर्स रेस्कूसाठी पाठविण्यात आले. चार बार्जवर अंदाजे 800 लोक होते.

अलर्टकडे दुर्लक्ष केले

गेल्या आठवड्यात भारतीय तटरक्षक दलाने इशारा दिला होता. या इशाऱ्यात नाविक, नौका आणि मच्छीमारांना समुद्राच्या किनाऱ्यापासून दूर राहण्यास सांगण्यात आले होते. तटरक्षक दलाचे प्रवक्ते कमांडंट आर के सिंह यांनी सांगितले की महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीप येथे हवामान सतर्कता जारी करण्यात आली आहे. नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) च्या वतीने प्रत्येक राज्यात पाच वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली होती. हवामान खात्याने चक्रीवादळ येण्यापूर्वी पाच दिवस अगोदर इशारा देखील दिला होता. यानंतरही 800 लोकांचे जीव धोक्यात घालण्यात आले. (know why ONGC barges came up in famous after the hurricane, what is uses of it)

इतर बातम्या

Hyundai Alcazar SUV ची वाट पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी, कंपनीने लाँचिंगबाबतचा निर्णय बदलला

Viral Video | देशी जुगाड! हा आगळावेगळा मास्क पाहून तुम्हीही चक्रावून जाल; एकदा व्हिडीओ पाहाच!

Follow Us
मोठी घडामोड! केंद्र सरकारने थांबवली साखर निर्यात; भाव वाढीमागचं.......
मोठी घडामोड! केंद्र सरकारने थांबवली साखर निर्यात; भाव वाढीमागचं........
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.