चक्रिवादळानंतर का चर्चेत आले ओएनजीसी बार्ज?, जाणून घ्या याचा काय असतो उपयोग

ऑईल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC)ने याची अधिकृत पुष्टी केली आहे. या बार्जमध्ये त्यांचे 261 कर्मचारी होते, असे ओएनजीसीने म्हटले आहे. (know why ONGC barges came up in famous after the hurricane, what is uses of it)

चक्रिवादळानंतर का चर्चेत आले ओएनजीसी बार्ज?, जाणून घ्या याचा काय असतो उपयोग
चक्रिवादळानंतर का चर्चेत आले ओएनजीसी बार्ज
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 10:14 PM

नवी दिल्ली : देशात आलेल्या तौक्ते वादळाने सर्वत्र हाहाःकार माजवला. रविवारी 16 मे रोजी हे वादळ गोव्यात धडकले. त्यानंतर कोकण, मुंबईतून सरकत गुजरातकडे गेले. वादळामुळे समुद्राला उधाण आले होते. समुद्र खवळला होता, उंचच उंच लाटा समुद्रात उसळत होत्या. या वादळात शेती, घरे, बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वदाळात ओएनजीसी कंपनीचे बार्ज P-305 ही बुडाले. ऑईल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC)ने याची अधिकृत पुष्टी केली आहे. या बार्जमध्ये त्यांचे 261 कर्मचारी होते, असे ओएनजीसीने म्हटले आहे. हे सर्वजण बॉम्बे हाय येथे ऑफशोर ड्रिलिंगसाठी गेले होते. वादळामुळे ते तिथेच अडकले आणि बार्ज बुडायला लागला. या घटनेत आतापर्यंत 49 लोकांचे मृतदेह काढण्यात आले आहेत. (know why ONGC barges came up in famous after the hurricane, what is uses of it)

सामानाची वाहतूक करण्यासाठी होतो बार्जचा वापर

बार्जचा फ्लोर पूर्णपणे सपाट असतो आणि नद्यांच्या आणि मोठ्या कालव्यांमधून जड वस्तूंच्या वाहतुकीच्या उद्देशाने ते तयार केले जाते. आजच्या काळात बार्जचा वापर मोठ्या प्रमाणात एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी माल नेण्यासाठी केला जातो. सामान पाठविण्यासाठी बार्जचा वापर केला जातो कारण ते इतर जहाजांपेक्षा अधिक स्वस्त असतात. चक्रिवादळात दुर्घटनाग्रस्त झालेले बार्ज पी -305 अपघातावेळी किनाऱ्यापासून सुमारे 70 किमी अंतरावर होते. ओएनजीसीच्या ऑईल रिग्स व प्लॅटफॉर्मवर करारावर घेतलेल्या कामगारांसाठी हे बार्ज राहण्यासाठी घेतले जातात. हे सर्व कामगार त्यावर बांधलेल्या क्वार्टरमध्ये राहत होते. बार्ज पूर्णपणे शक्तीहीन असतात आणि यामुळे टगबोटच्या मदतीने ते किना-यावर आणले जातात.

आणखी तीन लोक बार्जवर अडकले

चक्रीवादळ मुंबईत धडकल्यानंतर पश्चिम किनाऱ्यावरील चार बार्ज वाहून गेल्या. यानंतर राष्ट्रीय तटरक्षक दल (NCG) आणि भारतीय नौदलाने बचावकार्य सुरू केले. दोघांच्या मदतीने 147 जणांना बार्जमधून बाहेर काढण्यात आले. आणखी तीन बार्ज वादळाचा बळी ठरले, यात शेकडो कामगार होते. या सर्वांकडून मदतीसाठी सिग्नल पाठविण्यात आला. मंगळवारी हवामान स्वच्छ झाल्यावर हेलिकॉप्टर्स रेस्कूसाठी पाठविण्यात आले. चार बार्जवर अंदाजे 800 लोक होते.

अलर्टकडे दुर्लक्ष केले

गेल्या आठवड्यात भारतीय तटरक्षक दलाने इशारा दिला होता. या इशाऱ्यात नाविक, नौका आणि मच्छीमारांना समुद्राच्या किनाऱ्यापासून दूर राहण्यास सांगण्यात आले होते. तटरक्षक दलाचे प्रवक्ते कमांडंट आर के सिंह यांनी सांगितले की महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीप येथे हवामान सतर्कता जारी करण्यात आली आहे. नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) च्या वतीने प्रत्येक राज्यात पाच वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली होती. हवामान खात्याने चक्रीवादळ येण्यापूर्वी पाच दिवस अगोदर इशारा देखील दिला होता. यानंतरही 800 लोकांचे जीव धोक्यात घालण्यात आले. (know why ONGC barges came up in famous after the hurricane, what is uses of it)

इतर बातम्या

Hyundai Alcazar SUV ची वाट पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी, कंपनीने लाँचिंगबाबतचा निर्णय बदलला

Viral Video | देशी जुगाड! हा आगळावेगळा मास्क पाहून तुम्हीही चक्रावून जाल; एकदा व्हिडीओ पाहाच!

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.