AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मलाही वाटतं मिलिंद देवरासारख्या नेत्यांनी काँग्रेस सोडावी; राहुल गांधी यांचं मोठं विधान

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा देशव्यापी दौरा सुरू केला आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांची न्याय यात्रा सुरू झाली आहे. त्यांच्या यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक ठिकाणी राहुल गांधी यांचं जंगी स्वागत केलं जात आहे. अनेक लोक राहुल गांधी यांना भेटून त्यांच्या व्यथा, वेदना सांगताना दिसत आहेत. तर काही लोक केंद्र सरकारवर संतापही व्यक्त करताना दिसत आहेत.

मलाही वाटतं मिलिंद देवरासारख्या नेत्यांनी काँग्रेस सोडावी; राहुल गांधी यांचं मोठं विधान
RAGA Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Feb 02, 2024 | 8:20 PM
Share

बहरामपूर | 2 फेब्रुवारी 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगालमध्ये आहे. यावेळी त्यांनी पक्षातून गेलेल्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. हिंमत बिस्वा सरमा आणि मिलिंद देवरासारख्या नेत्यांनी पार्टी सोडलीच पाहिजे. तसं मला वाटतं. कारण ते विचारधारेशी सहमत नाहीत, असं मोठं विधान राहुल गांधी यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. हिमंत बिस्वा सरमा यांनी 2014मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. आज ते आसामचे मुख्यमंत्री आहेत. तर मिलिंद देवरा यांनी गेल्या महिन्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

डिजिटल मीडिया योद्धांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी हे विधान केल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेसने जे नियम घालून दिलेत त्याचं संरक्षण केलं पाहिजे. सिद्धांतांचं पालन केलं पाहिजे. मला वाटतं हिमंत बिस्वा सरमा आणि मिलिंद देवरा सारख्या लोकांनी काँग्रेसमधून निघून जावं. मी या मतावर येऊन ठेपलो आहे. हिमंत हे एका विशेष प्रकारच्या राजकारणाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. हे काँग्रेसचं राजकारण नाही, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा सुरू आहे. 25 जानेवारी रोजी ही यात्रा आसाममध्ये आली. तिथून ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये पोहोचली. आता पुढच्या टप्प्यात ही यात्रा झारखंडमध्ये जाणार आहे.

अन् काँग्रेसचं सरकार गेलं

मिलिंद देवरा यांनी काँग्रेससोडून शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटाची भाजपसोबत युती आहे. त्यामुळे आता देवरा यांचा भाजपसोबतचा नवा प्रवास सुरू झाला आहे. तर हिमंत बिस्वा यांनी थेट भाजपमध्येच प्रवेश केला होता. 2014 मध्येच हिमंत बिस्वा हे भाजपमध्ये आले. आज ते आसामचे मुख्यमंत्री आहेत. तर पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही पक्षांतर्गत वादाला कंटाळून काँग्रेस सोडली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार आलं होतं.

कुणीकुणी काँग्रेस सोडली

देशात भाजपचं सरकार आल्यापासून काँग्रेसला अनेक दिग्गज नेत्यांनी सोडचिठ्ठी दिली. कपिल सिब्बल, ज्योतिरादित्य सिंधिया, जितिन प३साद, सुनील जाखड, प्रियंका चतुर्वेदी, हार्दिक पटेल, सुष्मिता देव आणि आरपीएन सिंह आदी नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. काँग्रेस सोडताना प्रत्येकांनी वेगवेगळी कारणे दिली होती.

इंडिया आघाडी धोक्यात

दरम्यान, भाजपला पराभूत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या इंडिया आघाडीचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. नितीशकुमार यांनी भाजपची साथ धरली आहे. तर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला अधिक जागा देण्यास नकार दिला आहे. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनीही काँग्रेसला अधिक जागा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचं अस्तित्व निवडणुकीआधीच संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत.

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...