AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Seema Haider | सीमा सचिनसाठी भारतात आली, तर दोन मुलांची आई अंजूने नसरुल्लासाठी पाकिस्तान गाठलं

Seema Haider | भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू कोण आहे? काय आहे तिची कथा? पाकिस्तानात जाण्यासाठी तिने कसं प्लानिंग केलं? घरी नवऱ्याला तिने काय सांगितलं? तिची दोन मुलं किती वर्षाची आहेत? जाणून घ्या सर्वकाही.

Seema Haider | सीमा सचिनसाठी भारतात आली, तर दोन मुलांची आई अंजूने नसरुल्लासाठी पाकिस्तान गाठलं
Anju-seema haider
| Updated on: Jul 24, 2023 | 9:26 AM
Share

नवी दिल्ली : पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नोएडामध्ये राहणाऱ्या प्रियकर सचिन मीणासाठी ती भारतात आली. आज तिची सर्वत्र चर्चा आहे. आता अशीच एक गोष्ट समोर आलीय. पण यावेळी बॉर्डर पार करणारी प्रेमिका भारतातून आहे. राजस्थानात राहणारी दोन मुलांची आई अंजूने फेसबुक फ्रेंडसाठी बॉर्डर पार केली. अंजू आता पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये आहे.

तिथे आता अंजूच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. अंजूची कथा सुद्धा सीमाशी मिळती-जुळती आहे. हे सर्व कसं सुरु झालं, ते समजून घ्या.

कशी झाली ओळख?

अंजूचा नवरा आणि 2 मुलं भिवाडीमध्ये राहतात. अंजू काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात गेली. खैबर पख्तूनख्वामध्ये राहणाऱ्या नसरुल्लाला भेटण्यासाठी ती तिथे गेली. दोघांची फेसबुकवरुन मैत्री झाली होती. दोस्तीसाठी अंजूने सीमा ओलांडली. मूळात म्हणजे कोणालाच या बद्दल काही कळलं नाही.

अंजू काय सांगून घरातून बाहेर पडलेली?

अंजू जयपूरला जाते सांगून घरातून निघाली होती. पण ती थेट पाकिस्तानला निघून गेली. 3 दिवसानंतर तिने नवऱ्याला फोन करुन आपण पाकिस्तानात असल्याची कल्पना दिली. मैत्रिणीला भेटण्यासाठी पाकिस्तानला गेल्याचा तिने सांगितलं. ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला. आता मीडिया रिपोर्ट्समधून अंजू तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेल्याच समोर येतय. तिथे पाकिस्तानात नसरुल्ला आणि अंजूच लग्न होणार आहे.

अंजूने कसं केल प्लानिंग?

अंजूने तिच्या जुन्या पत्यावरच पासपोर्ट बनवला. अंजूने फोनवरच्या चर्चेत 3-4 दिवसात भारतात परतणार असल्याच सांगितलं. अंजूने पाकिस्तानात जाण्यासाठी एक नवीन सीम कार्ड विकत घेतलं होतं. या बद्दल कोणालाच काही माहित नव्हतं. अंजूला 15 वर्षाची मुलगी आणि 5 वर्षांचा मुलगा आहे.

पाकिस्तानी व्हिसासाठी कधीपासून अर्ज करत होती?

पाकिस्तानी मीडियामध्ये अंजू नसरुल्ला सोबत साखरपुडा करणार असल्याची चर्चा आहे. 35 वर्षाची अंजू मागच्या दोन वर्षांपासून पाकिस्तानी व्हिसासाठी अर्ज करत होती. नसरुल्लाच्या प्रेमात कशी पडली?

दोन वर्षांपूर्वी फेसबुकवरुन अंजू बरोबर ओळख झाली होती, असं नसरुल्लाने सांगितलं. दोघांची आधी मैत्री झाली, मग प्रेम झालं. प्रेमासाठी अंजूने सीमा ओलांडली.

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर