AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्यापासून, किती टप्प्यात होणार मतदान

lok sabha election 2024 declaration | शुक्रवारी निवडणूक आयोगाची बैठक झाली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला. लोकसभा निवडणुका उद्या दुपारी तीन वाजता जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर आचरसंहिता लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता उद्यापासून, किती टप्प्यात होणार मतदान
| Updated on: Mar 15, 2024 | 1:54 PM
Share

नवी दिल्ली | 15 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाची बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीत 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शनिवारी दुपारी 3 वाजता आदर्श आचारसंहिता लागणार आहे. देशभरात सात किंवा आठ टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्रातील 48 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीचे मतदान एकूण सात टप्प्यात झाले होते. पहिल्या टप्प्याचे मतदान 11 एप्रिलला तर शेवटच्या टप्प्यासाठी 19 मे रोजी मतदान झाले. 23 मे रोजी निकाल लागले होते.

काय आहे आदर्श आचारसंहिता

  • निवडणूक आयोगाकडून निवडणुकांच्या तारखा होत असतानाच आदर्श आचारसंहिता लागू होते. त्यानंतर आचारसंहिता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत असते.
  • लोकसभा निवडणुकीमुळे आता संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू असणार आहे.
  • आचारसंहिता कोणत्याही कायद्याचा आधार घेऊन तयार केली गेली नाही. सर्वच राजकीय पक्षांची मत आणि तज्ज्ञांचे मत घेऊन तयार केली आहे. त्यामध्ये वेळोवेळी बदलही होत असतात.
  • देशात पहिली आचारसंहिता 1960 मध्ये झाली होती. केरळ विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान ही लागू करण्यात आली होती.

असे कारणे आचारसंहितेचे उल्लंघन

निवडणूक आचारसंहिते दरम्यान मतदारांना पैसे वाटणे, भेटवस्तू देणे, लालूच दाखवणे, आमिष देणे म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. तसेच सरकारला विकासकामांची किंवा मतदारांवर प्रभाव पडले, अशी कोणताही घोषणा करता येत नाही.तसेच शासकीय अधिकाऱ्याची बदली करता येत नाही. अन्यथा ते आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन ठरते.

आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कारवाई

एखाद्या राजकीय पक्षाकडून किंवा कोणत्याही उमेदवाराकडून आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाते. निवडणूक आयोग फौजदारी खटला दाखल करु शकतो किंवा निवडणूक लढवण्यापासून थांबवू शकतो. आचारसंहितेच्या उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्या तुरुंगवासाची शिक्षा होते. या काळात मतदारांवर दबाब आणणे, त्यांना धमक्या देणे ही बाबी आदर्श आचारसंहितेचा भंग करणाऱ्या आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.