AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लष्करानं या गोष्टीचा नक्की विचार करावा…’, पहलगाम हल्ल्यानंतर बुलडोझर कारवाईवर मेहबूबा मुफ्ती यांचं मोठं वक्तव्य

पहलगाम हल्ल्यानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घर उद्ध्वस्त केली जात आहेत, यावर प्रतिक्रिया देताना मेहबूबा मुफ्ती यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

'लष्करानं या गोष्टीचा नक्की विचार करावा...', पहलगाम हल्ल्यानंतर बुलडोझर कारवाईवर मेहबूबा मुफ्ती यांचं मोठं वक्तव्य
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 28, 2025 | 3:56 PM
Share

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारत सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आलं आहे. जम्मू काश्मीरच्या विविध भागांमध्ये असलेल्या दहशतवाद्यांचे घर जमीनदोस्त करण्यात येत आहेत, काहींचे घर बॉम्बनं उडून देण्यात आले आहेत, तर काहींच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आलं आहे.भारतीय सुरक्षा दलाकडून दहा पेक्षा अधिक दहशतवाद्यांची घरं पाडण्यात आली आहेत. सैन्याकडून सुरू असलेल्या या कारवाईसंदर्भात जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सैनिकांची दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे, मात्र त्यांनी सतर्कता बाळगावी असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या मुफ्ती?

कारवाई सुरू असताना निरपराध व्यक्ती आणि दहशतवादी यांच्यामधील अंतर स्पष्ट करण्याची गरज आहे, ज्यामुळे देशाची अखंडता कायम राहील, नागरिक बंड करणार नाहीत. मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, सध्या काश्मीरमध्ये लोकांची धरपकड सूरू आहे. हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांसोबत सामान्य नागरिक देखील भरडले जात आहेत. ज्या घरांचं नुकसान झालं आहे, त्या घरांमध्ये काही निरपराध लोकांची देखील घरं होती, असा दावा मुफ्ती यांनी केला आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने सावधानी बाळगावी, दहशतवादी आणि नागरिक यामधील अतंर स्पष्ट करणं गरजेचं आहे, ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली, त्यात काही निर्दोष लोक देखील आहेत. अशा बातम्या समोर येत आहेत की हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे, दहशतवाद्यांसोबतच सामान्य लोकांची घर देखील उद्ध्वस्त करण्यात आली आहेत.मी सरकारला विनंती करते की त्यांनी सैन्यांना असे आदेश द्यावेत की, दहशतवादी लोकांवर कारवाई करताना काश्मीरच्या सामान्य जनतेला त्रास नाही झाला पाहिजे, असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर आता सरकारनं जम्मू -काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली आहे. अनेकांची चौकशी सुरू आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.