AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जनगणनेचे चक्र बदलणार, 2025 पासून सुरु होणार जनगणना, जातीय जनगणनाही होणार का?

Census To Start In 2025: अनेक विरोधी पक्षांकडून जातीय जनगणनेची मागणी होत आहे. मात्र सरकारने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. जनगणनेत धर्म आणि वर्ग विचारले जातात. सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि जमातीची गणना केली जाते.

जनगणनेचे चक्र बदलणार, 2025 पासून सुरु होणार जनगणना, जातीय जनगणनाही होणार का?
census from 2025
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 28, 2024 | 10:20 AM
Share

Census To Start In 2025: देशात आता जनगणनेस सुरुवात होणार आहे. परंतु जनगणनेचे चक्र बदलणार आहे. नेहमी दहा वर्षांनी होणारी जनगणना यंदा 14 वर्षांनी होणार आहे. 2011 नंतर आता 2025 मध्ये जनगणना होणार असून त्यानंतर 2035, 2045, 2055 अशी पुन्हा दहा, दहा वर्षांनी जनगणना होणार आहे. यापूर्वी 1991, 2001, 2011 अशी जनगणना झाली होती. आता 2025 मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये संप्रदायाची माहिती घेतली जाणार आहे. 2025 मध्ये सुरु होणार जनगणना 2026 पर्यंत चालणार आहे. 2021 मध्ये कोरोनामुळे जनगणना झाली नव्हती. परंतु या जनगणनेत जातीय जनगणना होणार का? यासंदर्भात कोणताच खुलासा अजून झालेला नाही.

अनेक विरोधी पक्षांकडून जातीय जनगणनेची मागणी होत आहे. मात्र सरकारने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही. जनगणनेत धर्म आणि वर्ग विचारले जातात. सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि जमातीची गणना केली जाते. या वेळी लोकांना ते कोणत्या पंथाचे अनुयायी आहेत हे देखील विचारले जाऊ शकते.

जनगणनेत आतापर्यंत धर्म आणि वर्ग विचारला जात होता. सामन्यपणे अनुसूचित जाती आणि जनजातीची गणना केली जात होती. परंतु यंदा संप्रदाय विचारला जाणार आहे. जसे कर्नाटकात सामान्य वर्गात असलेले लिंगायत समाज स्वत: वेगळा संप्रदाय मानतात. तसेच अनुसूचित जातीत वाल्मीकी, रविदासी सारखा संप्रदाय आहे. म्हणजेच आता धर्म, वर्ग सोबत संप्रदाय गणनेचा आधार असणार आहे. त्याबाबत सरकारचा विचार सुरु आहे.

जातीय जनगणना होणार का?

2026 मध्ये जनगणना पूर्ण झाल्यानंतर लोकसभेच्या जागांचे सीमांकन सुरू होणार आहे. त्यानंतर हे काम 2028 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. काँग्रेससह अनेक विरोध पक्ष आणि एनडीएमधील काही पक्षांनी जातीय जनगणनेची मागणीही केली आहे. मात्र केंद्र सरकारने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही.

जनगणनेचा इतिहास असा

भारतातील पहिली जनगणना 1872 मध्ये गव्हर्नर-जनरल लॉर्ड मेयो यांच्या काळात झाली. भारताची पहिली संपूर्ण जनगणना 1881 मध्ये आयुक्त डब्ल्यू.सी. प्लॉडेन यांनी केली होती. त्यानंतर हे दर 10 वर्षांनी एकदा जनगणना होत आली. मात्र, त्यातही काही वेळा अंतर दिसून आले.

  • 1872
  • 1881
  • 1891
  • 1901
  • 1911
  • 1921
  • 1931
  • 1941

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली जनगणना 1951 मध्ये झाली.

  • 1951
  • 1961
  • 1971
  • 1991
  • 2001
  • 2011

Follow Us
काँग्रेसमध्ये मोठं बंड? सपकाळ यांच्या हटवणीसाठी दिल्लीत मोर्चेबांधणी
Harshwardhan Sapkal | काँग्रेसमध्ये मोठं बंड? हर्षवर्धन सपकाळ यांच्या हटवणीसाठी थेट दिल्लीत मोर्चेबांधणी
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे...
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे निंबाळकर स्पष्टच बोलले...
शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल
Nagpur | शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल; भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा!
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप नेत्याची जोरदार टीका
रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक
Sakshana Salgar | रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक, पंढरपुरात पेटला नवा राजकीय वाद!
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; चाकणकरांच्या
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; रुपाली चाकणकरांच्या जागी या नावाची चर्चा, राजकारणात मोठं घडणार?
राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
Sanjay Raut UNCUT | ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय
Uddhav Thackeray | Eknath Shinde | ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय घडणार?
तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान
Sanjay Raut | 'तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान इतकं चर्चात का? राजकारणात मोठी खळबळ
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक?
Mumbai Water Shortage | मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक पुढच्या आठवड्यापासून मोठी पाणीकपात?