AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलांची चाकूने भोसकून हत्या, बिहारमधील धक्कादायक घटना

बिहारच्या गया जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गया जिल्ह्यातील खिजरसराय परिसरात एका युवकानं अल्पवयीन मुलीचा शेतात जाताना विनयभंग केला. यानंतर मुलीच्या घरच्यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी युवकानं पीडित मुलीच्या घरुन आलेल्या दोन महिलांची चाकूने भोकून हत्या केली. या घटनेनंतर परिसरात काहीकाळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

Crime : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलांची चाकूने भोसकून हत्या, बिहारमधील धक्कादायक घटना
विवाहितेची विहीरीत उडी मारुन आत्महत्या Image Credit source: TV9
| Edited By: Shubham Kulkarni | Updated on: Mar 13, 2022 | 11:49 AM
Share

बिहारच्या (Bihar) गया (Gaya) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गया जिल्ह्यातील खिजरसराय परिसरात एका युवकानं अल्पवयीन मुलीचा (Girl) शेतात जाताना विनयभंग केला. यानंतर मुलीनं घाबरलेल्या अवस्थेत संपूर्ण प्रकार घरी जाऊन सांगितला. विनयभंगाचा प्रकार मुलीच्या घरच्यांना कळताच त्यांनी मुकेश कुमार या युवकाच्या घरी जाऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादरम्यान, मुकेश कुमार हा प्रचंड रागात होता. यावेळी त्यानं पीडित मुलीच्या घरुन आलेल्या दोन महिलांना (Women) मारहाण आणि शिवीगाळ केली. यावेळी झालेल्या मारहाणीनंतर मुकेश यानं थेट दोन्ही महिलांवर चाकू हल्ला केला. या घटनेत महिलांना गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाल. बिहारच्या गया जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना जिल्ह्यासह बिहारमध्ये वाऱ्यासारखी पसरली आहे. या घटनेनंतर परिसरात काहीकाळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

नेमकं काय झालं?

अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी सकाळी शेतात जात होती. याचवेळी युवकानं या मुलीसोबत छेडछाड केली. यानंतर मुलीनं घाबरलेल्या अवस्थेत घर गाठलं. यावेळी विनयभंगाच्या संपूर्ण प्रकाराची माहिती घरच्यांना दिली. यानंतर घरातील दोन महिलांनी संबंधित युवकाचं घर गाठून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी विनयभंग करणारा युवक देखील घरीच होता. रागात असलेल्या युवकानं दोन्ही महिलांना शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर जोरदार चाकून भोसकून दोन्ही महिलांची युवकानं हत्या केली.

मृतांच्या नातेवाईकांचा गंभीर आरोप

मृत दोन्ही महिलांच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्न उपस्थित केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात न घेतल्यानं मृत महिलांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गया जिल्ह्यातील धक्कादायक घटनेनंतर लोजपा या पक्षाचे प्रदेश महासचिव अरविंद सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी पीडित अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन कुटुबियांचं सात्वन केलंय. यानंतर अरविंद सिंह यांनी बिहार सरकारवरच निशाणा साधत या सरकारच्या काळात काहीही होऊ शकतं, असा आरोप केलाय. दरम्यान, पोलीस आरोपीचा शोध घेत असून ठिकठिकाणी छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे.

हत्येच्या घटनेनंतर गावात तणाव

विनयभंग करणाऱ्या युवकानं दोन महिलांची हत्या केल्यानं गया जिल्ह्यातील खिजरसराय परिसरात तणाव निर्माण झाला होता. यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळ गाठले. आता आरोपीला पकडण्यासाठी पोलीस ठिकठिकाणी छापेमारी करत आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि दोन महिलांच्या हत्येमुळे गया जिल्ह्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर बिहार सरकारवरही आरोप होतायेत.

इतर बातमी

राणे बंधुच्या विरोधात मुंबई पोलिसात गुन्हा दाखल, शरद पवारांच्या विरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवणार

यूपीचा घाव वर्मी; पराभवाच्या आघातानंतर काँग्रेसमध्ये मंथन सत्र, दिवसभरात दौन बैठका

Grape Export : सांगलीतून 8 हजार टन द्राक्षाची निर्यात, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांच्या काय आहेत अपेक्षा?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली