AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Himachal Pradesh: बसवर डोंगर कोसळला अन् क्षणात सगळं सपलं, 15 जणांचा जागीच मृत्यू

हिमाचल प्रदेशात मोठा अपघात झाला आहे. बिलासपूर जिल्ह्यात आज (मंगळवार) सायंकाळी भल्लू पुलावर एका बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला. या घटनेत मातीखाली दबून बसमधील पंधरा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

Himachal Pradesh: बसवर डोंगर कोसळला अन् क्षणात सगळं सपलं, 15 जणांचा जागीच मृत्यू
bilaspur bus accident
| Updated on: Oct 07, 2025 | 9:26 PM
Share

हिमाचल प्रदेशात मोठा अपघात झाला आहे. बिलासपूर जिल्ह्यात आज (मंगळवार) सायंकाळी भल्लू पुलावर एका बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला. या घटनेत मातीखाली दबून बसमधील पंधरा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर स्थानिकांनी बचावकार्य सुरू केले असू मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरु आहे. सध्या घटनास्थशी पोलीस आणि प्रशासनाचे पथकही पोहोचले असून जेसीबीच्या मदतीने माती हटवली जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बसमध्ये 30 प्रवासी होते

मंगळवारी सायंकाळी झंडुता विधानसभा मतदारसंघातील बार्थिन येथील भल्लू पुलावरून एक बस जात होती. या बसमधून जवळपास 30 प्रवासी प्रवास करत होते. बस पुलावर येताच अचानक डोंगराला तडा गेला आणि मातीचा ढिगारा बसवर पडला. यामुळे बसमधील प्रवासी ढिगाऱ्याखाली गाडले गेले. यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

ढिगारा हटवण्यासाठी जेसीबीचा वापर

या घटेनेची माहिती मिळताच पोलीसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. सध्या जेसीबीच्या मदतीने बसवरील माती हटवली जात आहे. काही जखमींना बसमधून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले आहे. घटनास्थळीच सहा प्रवाशांचा मृत्यू झाला होता. उर्वरित 9 जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बसमधून तीन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सध्या मदतकार्य सुरु आहे.

मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त

या घटनेवर मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी शोक व्यक्त केला आहे. सुखू यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी अशी प्रार्थना केली. या कठीण काळात राज्य सरकार पीडित कुटुंबांसोबत ठामपणे उभे आहे आणि त्यांना सर्वतोपरी मदत करेल असंही त्यांनी म्हटलं आहे.

बिलासपूर प्रशासनाला मदत आणि बचाव कार्याचे निर्देश

मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू हे बिलासपूर जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. सुखू यांनी मदत आणि बचाव कार्य जलद करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. तसेच जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचे आणि त्यांच्या उपचारांसाठी पुरेशी व्यवस्था करण्याचेही निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा