AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई ते पुणे – हैदराबाद बुलेट ट्रेनचे नेटवर्क, दक्षिण भारतात बुलेट ट्रेनचा मेगा प्लान

दक्षिण भारतात एका मोठ्या हायस्पीड रेल नेटवर्कची योजना समोर आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अमरावती, हैदराबाद, चेन्नई, बंगळूर, पुणे आणि मुंबई या शहरांना जोडणाऱ्या हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कचा आराखडा सादर केला आहे

मुंबई ते पुणे - हैदराबाद बुलेट ट्रेनचे नेटवर्क, दक्षिण भारतात बुलेट ट्रेनचा मेगा प्लान
Bullet Train Project
| Updated on: Apr 28, 2026 | 5:11 PM
Share

Bullet Train: मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. ५०८ किमीचे हे अंतर अवघ्या २ ते ३ तासात कापले जाणार आहे. या महत्वाकांक्षी मार्गासोबत देशातील दक्षिण भारतात देखील बुलेट ट्रेनचे जाळे विणले जाणार आहे. या प्रस्तावित हायस्पीड रेल्वे नेटवर्कमध्ये दक्षिण भारतातील महत्वाची शहरे जोडली जाणार आहेत.मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरीडॉर ज्या प्रकारे पश्चिम भारतात नवीन आर्थिक वेग आणणार आहे. तसेच दक्षिण भारतात ‘हाय स्पीड डायमंड’ तयार केला जाईल. यात आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्र सारख्या राज्यांमध्ये कनेक्टिव्हीटी जोडली जाणार आहे.

कोणत्या शहरांना हायस्पीड नेटवर्कने जोडणार

प्रस्तावित हायस्पीड नेटवर्कमध्ये अमरावती, हैदराबाद, चेन्नई, बेंगलुरु, पुणे आणि मुंबई सारख्या प्रमुख शहरांना जोडणारे मार्ग आखले जाणार आहेत. ही योजना जर कागदावर उतरली तर अनेक शहरातील प्रवासाचा वेग खूपच कमी होईल.

अमरावती ते हैदराबाद – केवळ 70 मिनिटे

अमरावती ते चेन्नई – 112 मिनिटे

हैदराबाद ते पुणे – 1 तास 55 मिनिटे

पुणे ते मुंबई – 48 मिनिटे

चेन्नई ते बंगलुरु – 73 मिनिटे

हैदराबाद से बेंगलुरु – सुमारे 2 तास 8 मिनिटे

काय होणार फायदा ?

हाय-स्पीड रेल केवळ प्रवासाचे साधन राहणार नाही तर आर्थिक बदलाचे इंजिन होणार आहे. जेव्हा मोठी शहरे एकमेकांना हायस्पीड रेलनेटवर्कने जोडली जातील तेव्हा उद्योग, व्यापार, पर्यटन, शिक्षण आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की उदा. मुंबई ते अहमदाबाद बुलेट प्रकल्पामुळे मुंबई, सुरत, वडोदरा आणि अहमदाबाद एक आर्थिक क्षेत्र बनतील. तशाच प्रकारे दक्षिण भारतातील शहरांचे विकास मॉडेल तयार केले जाईल.

आंध्र प्रदेशाला मिळणार मोठी भेट

रेल्वे मंत्र्यांनी घोषणा केली की प्रदीर्घकाळापासून प्रतिक्षित असलेल्या साऊथ कोस्ट रेल्वेने झोनला १ जून २०२६ रोजी अधिसूचित केले जाईल.हा आंध्रप्रदेशसाठी एक मोठा प्रशासकीय आणि राजकीय उपलब्धी मानली जाणार आहे. तसेच कोलकाता ते चेन्नईपर्यंत सध्याचा दुपदरी रेल्वे मार्गाला चौपदरी केले जाणार आहे. यामुळे सुमारे ५०० नवीन ट्रेनचे संचलन करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ज्यात मालगाडी आणि प्रवासी गाड्या दोन्हींचा समावेश आहे.

रेल्वे बजेट आणि इंफ्रास्ट्रक्चरमध्ये वाढ

आंध्रप्रदेश आणि तेलंगणाचे संयुक्त रेल्वे बजेट आधी ८८६ कोटी रुपयांचे होते.आता एकट्या आंध्रप्रदेशाला १०,१३४ कोटी रुपये मिळणार आहेत. राज्यात सध्या १.०६ लाख कोटी रुपयांहून अधिक रेल्वे योजनांवर काम सुरु आहे. याशिवाय ७४ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण देखील केले जाणार आहे.

Follow Us
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच