AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“भारतातील मुसलमानांनी घाबरुन जावू नये, तुम्हाला महानतेचा भाव सोडावा लागेल”, मोहन भागवत यांचा सल्ला

सर्वांना सोबत घेऊन पुढं गेलं पाहिजे. आमचं सत्य आणि तुंचं मिथ्य असं आम्ही कधीचं म्हणत नाही. तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्य आहात.

भारतातील मुसलमानांनी घाबरुन जावू नये, तुम्हाला महानतेचा भाव सोडावा लागेल, मोहन भागवत यांचा सल्ला
मोहन भागवत
| Updated on: Jan 11, 2023 | 7:04 PM
Share

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी देशातील मुस्लिमांबाबतीत वक्तव्य केलंय. त्यांनी म्हंटलं की, देशातील मुसलमानांनी घाबरण्याचं कारण नाही. परंतु, तुम्हाला महानतेचा भाव सोडावा लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ऑर्गनारझर आणि पांचजन्य येथील एका मुलाखतीत सविस्तर मत व्यक्त केलं. मोहन भागवत (Mohan Bhagwat) म्हणाले की, हे सत्य आहे की, देशातील मुसलमानांनी देशातच राहिले पाहिजे. देशातील कोणत्याही मुस्लीमांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. मुस्लीमांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. पण, मुसलमानांना आपण महान असल्याचं सांगणं सोडून दिलं पाहिजे.

मुसलमांनी हे म्हणणं सोडलं पाहिजे

मोहन भागवत मुसलमांनी संबंधित म्हणाले, आपण एका महान वंशाचे आहोत. या देशावर शासन केलं होतं. या देशावर पुन्हा शासन करू. आपला मार्ग योग्य आहे. आपण वेगळे आहोत. त्यामुळं आपण असंच राहणार. आपण सोबत राहू शकत नाही. मुस्लीमांना असं म्हणणं सोडलं पाहिजे. आपण देशात राहतो. आपण हिंदू आहोत की, कम्युनिस्ट हे सोडून दिलं पाहिजे.

मोहन भागवत म्हणाले, जगातील हिंदूंमध्ये आक्रमकता दिसत आहे. एक हजार वर्षांपासून युद्ध करणाऱ्या समाजात जागृती आली आहे. त्यांनी सांगितलं की, हिंदू समाज एक हजार वर्षांपासून युद्ध करत आहे. ही लढाई परदेशी ताबा, परदेशी प्रभाव आणि परदेशी षडयंत्र या विरोधात राहिली आहे. संघाने याला समर्थन दिलं आहे. दुसऱ्या लोकांचंही याला सहकार्य आहे.

काही लोकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. हिंदू समाजाच्या आक्रमकतेमुळं तो जागृत झाला आहे. कित्तेक वर्षांपासून लढत राहिल्यानं आक्रमकता स्वाभाविक आहे.

सर्वांना सोबत घेऊन पुढं गेलं पाहिजे

इतिहासाची गणना सुरू झाली तेव्हापासून भारत अखंड आहे. भावना कमी झाल्या तेव्हा हिंदू विखुरला गेला. त्यांनी म्हंटलं, हिंदू आपली ओळख आहे. आपली राष्ट्रीयता आहे. आपल्या सभ्यतेची विशेषता आहे.

सर्वांना सोबत घेऊन पुढं गेलं पाहिजे. आमचं सत्य आणि तुंचं मिथ्य असं आम्ही कधीचं म्हणत नाही. तुम्ही तुमच्या ठिकाणी योग्य आहात. आम्ही आमच्या ठिकाणी योग्य आहोत. यासाठी लढाई का बरं. सोबत जाऊया, हे हिंदुत्व आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.