AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रीय अनुसूची आयोगाची पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्याची शिफारस

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याने राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा अडचणी वाढू शकतात. सुप्रीम कोर्टात जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली आहे.

राष्ट्रीय अनुसूची आयोगाची पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्याची शिफारस
mamta banerjee
shailesh musale
shailesh musale | Updated on: Feb 16, 2024 | 6:01 PM
Share

कोलकाता : पश्चिम बंगालमधील परिस्थिती पाहता राष्ट्रीय अनुसूची आयोगाने राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्याची शिफारस केली आहे. NCSC ने राज्यातील घटनेची माहिती गोळा केली आहे. संदेशखळीला भेट दिल्यानंतर २४ तासांतच NCSC च्या पूर्ण खंडपीठाने राष्ट्रपती भवनाला अहवाल सादर केला आहे. बंगाल पोलीस प्रशासनाच्या असहकार, तपासात निष्काळजीपणाचे अनेक आरोप करून बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

महिलांचा लैंगिक छळ

अरुण हलदर यांनी म्हटले की, संदेशखळीमध्ये टीएमसी समर्थकांकडून महिलांच्या कथित छळप्रकरणी आयोगाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अहवाल सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्यात आलीये. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या (NCSC) शिष्टमंडळाने गुरुवारी संदेशखळीला भेट दिली होती.

अनुसूचित आयोगाचा राष्ट्रपतींना अहवाल सादर

संदेशखळी प्रकरणात तृणमूल काँग्रेसचे नेते उत्तम सरदार आणि शिवप्रसाद हाजरा उर्फ ​​शिबू यांच्यावर अनुसूचित जातीच्या महिला आणि लोकांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. अनुसूचित आयोगाच्या पथकाने या परिसराला भेट दिल्यानंतर राष्ट्रपती भवनात अहवाल सादर केलाय. अहवाल सार्वजनिक केला नसला तरी आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर म्हणाले की त्यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.

केंद्रीय दलाच्या तैनातीसाठी उच्च न्यायालयात याचिका

संदेशखळीबाबत कोलकाता उच्च न्यायालयात पुन्हा जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात खटला दाखल करण्याची परवानगी मागितली आहे. येथील परिस्थिती पाहता केंद्रीय दलाला तातडीने तैनात करण्याची विनंती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी खटला दाखल करण्यास परवानगी दिली आहे. पुढील सुनावणी सोमवारी होण्याची शक्यता आहे.

SIT तपासासाठी सुप्रीम कोर्टात याचिका

संदेशखळी घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक (एसआयटी) किंवा सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. अधिवक्ता अलख आलोक श्रीवास्तव यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यांच्या मते संदेशखळीतून समोर आलेल्या ‘भयानक’ माहितीमुळे बंगालमध्ये निष्पक्ष तपास करणे शक्य नाही.

शहाजहानची पोलिसांशी मिलीभगत

न्यायाच्या हितासाठी हे प्रकरण राज्याबाहेर नेले पाहिजे. मुख्य आरोपी शाहजहान शेख हा अद्याप फरार असल्याचे वकिलाने सांगितले. यावरून स्थानिक पोलीस प्रशासन निष्क्रिय असल्याचे समजू शकते. शहाजहान पोलिसांच्या संपर्कात असल्याचाही आरोप आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटी किंवा सीबीआयमार्फत तपास करणे आवश्यक आहे. मणिपूर हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या तीन निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन केली होती.

Follow Us
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल