AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मौलानाच्या वक्तव्यानंतर संतापले धर्मगुरु, सोडले जमियतचे व्यासपीठ,पाहा काय म्हणाले धर्मगुरु

जेव्हा श्रीराम, ब्रह्मा,शिव... कोणीही नव्हते, तेव्हा मनू कुणाची पूजा करत होता? कुणी म्हणाले, महादेवाची पूजा करत होता. तर काही जण मनुने ओमची पूजा केल्याचा दावा करतात.

मौलानाच्या वक्तव्यानंतर संतापले धर्मगुरु, सोडले जमियतचे व्यासपीठ,पाहा काय म्हणाले धर्मगुरु
मौलाना अर्शद मदनी
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 12, 2023 | 3:05 PM
Share

नवी दिल्ली : दिल्लीतील रामलीला मैदानावर जमियत उलेमा-ए-हिंदच्या अधिवेशनात रविवारी चांगलाच गोंधळ झाला. मौलाना अर्शद मदनी यांनी मोहन भागवत यांच्यावर टीका केली. परंतु ते येथेच थांबले नाही पुढे जाऊन त्यांनी अल्लाह आणि ओम एक असल्याचे म्हटले. जैन गुरु लोकेश मुनी यांनी यावर आक्षेप घेतला. जैन गुरू लोकेश मुनी यांनी मंचावर उभे राहून निषेध व्यक्त केला आणि म्हणाले की सर्वांना जोडण्याच्या या कार्यक्रमात आक्षेपार्ह गोष्टी का? त्यानंतर त्यांच्यांसह सर्वच धर्मगुरूंनी मंच सोडला.

मौलाना मदनी म्हणाले की, मी मोठ मोठ्या धर्मगुरुंना विचारले की, जेव्हा श्रीराम, ब्रह्मा,शिव… कोणीही नव्हते, तेव्हा मनू कुणाची पूजा करत होता? कुणी म्हणाले, महादेवाची पूजा करत होता. तर काही जण मनुने ओमची पूजा केल्याचा दावा करतात. ओम कोण आहे? अनेकांनी सांगितले की, ओम एक हवा असल्याचे अनेक जण सांगतात. त्याला कोणतेही रूप किंवा रंग नाही. तो जगात सर्वत्र आहेत. अरे बाबा, याला आपण अल्लाह म्हणतो. तुम्ही त्याला देव म्हणता.

जैन मुनींची हरकत

मौलाना मदनी यांच्या विधानावर जैन मुनी लोकेश यांनी तीव्र हरकत नोंदवली. ते म्हणाले की, हे अधिवेशन माणसे जोडण्यासाठी आयोजित केले आहे. त्यामुळे अशा विधानाचे कोणतेही औचित्य नाही, असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी कार्यक्रम स्थळ सोडले. त्यांच्यानंतर अन्यही काही धार्मिक संतांनी या कार्यक्रमातून काढता पाय घेतला. ख्रिश्चन लोक गॉड म्हणतात.

भाजप अन् संघ

जमियत उलेमा-ए-हिंदच्या 34 व्या अधिवेशनात मौलाना अर्शद मदनी यांनी म्हटले की, भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसशी आमचे शत्रुत्व नाही, पण धर्माच्या आधारावर भेदभाव होता कामा नये. आमच्यात वैचारिक मतभेद आहेत. RSS संस्थापकाच्या Bunch of Thoughts या पुस्तकात अनेक प्रश्न मांडले आहेत, पण सध्याच्या RSS प्रमुखांच्या अलीकडच्या विधानांकडेही दुर्लक्ष करता कामा नये.

अनेक प्रस्ताव संमत

जमियतच्या या अधिवेशनात देशाची एकता आणि अखंडता तसेच धार्मिक बंधुता मजबूत करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. अधिवेशनात भारताच्या कानाकोपऱ्यातील मौलवींनी जातीयवादाच्या विरोधात आवाज उठवला. यासोबतच जमातने तरुणांना आवाहन केले की, तथाकथित संघटना इस्लामच्या नावावर जिहादचा चुकीचा अर्थ लावून दहशतवाद आणि हिंसाचाराचा प्रचार करतात. ते ना देशाच्या हिताचे आहे ना इस्लामच्या.

Follow Us
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका फोटोत ओमराजेंसह...
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले.
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले...
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारण
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर